शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

भूजल पातळीत दीड फुटाने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:44 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात पावसाचे कमी झालेले प्रमाण व बेसुमार पाणी उपशामुळे जिल्ह्यातील भूजल ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात पावसाचे कमी झालेले प्रमाण व बेसुमार पाणी उपशामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी वेगाने घटत असल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच वर्षापासून दरवर्षीच ही पातळी घटत चालली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या अहवालानुसार जिल्ह्याच्या भूजल पातळीत सरासरी दीड फुटाने घट झाली असून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या तालुक्यातील घट वेगाने वाढत आहे.गेल्या दोन वर्षांपासून मान्सूनने दगा दिल्याने जिल्ह्यातील पर्जन्यमानातही घट जाणवत आहे. यंदाही पावसाची सरासरी गाठली नसल्याने नैसर्गिक संकट वाढत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या पाणी योजनांतून आवर्तन सुरू असून त्याचा फायदाही होत आहे. मात्र, पाऊसही कमी आणि योजनांचे पाणी न पोहोचलेल्या भागातील भूजल पातळी घटतच चालली आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात ८४ निरीक्षण विहिरींचा अभ्यास करून भूजल पातळीचा आलेख तयार करण्यात आला आहे. विभागाच्यावतीने वर्षात किमान चारवेळा भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. मार्च महिन्यातील अहवालानुसार जिल्ह्यात जत तालुक्यातील भूजल पातळीत सव्वा मीटरने घट झाली आहे. त्यानंतर आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातही हेच संकट निर्माण झाले आहे.पावसाने अथवा जलस्रोतांच्या माध्यमातून जमिनीत मुरलेल्या पाण्यापेक्षा जादा पाण्याचा वापर झाल्यानेच भूजल पातळीत घट नोंदविली आहे. ज्या भागात म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजनेचे पाणी पोहोचले आहे, त्या ठिकाणी मात्र, पाणी पातळी स्थिर असली तरी ती समाधानकारक नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पाऊस नाही, त्याच भूगर्भातील पाण्याचाही बेसुमार उपसा होत असल्यानेच हे संकट निर्माण झाले आहे. शहरात पाण्याचा बेसुमार अपव्यय होतो आहे, तर त्याचवेळी ग्रामीण भागात घागरभर पाण्यासाठी मैलोन् मैलची भटकंतीही करावी लागत आहे. प्रशासनाच्यावतीने जनजागृती करण्यात येत असली तरी नागरिकांना त्याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे.जिल्ह्याच्या पाऊसमानाचा विचार केला, तर मान्सूनवर भरवसा असला तरी त्याचेही प्रमाण घटतच चालले आहे. त्यात जत, आटपाडीसह काही भागाला परतीच्या मान्सूनवर अवलंबून राहावे लागत आहे. टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी टॅँकरसह इतर उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केल्या असल्या तरी जिथे निसर्गच कोपला आहे, तिथे प्रशासनाचीही हतबलता होत आहे. बांधबंदिस्तीकरण व जलयुक्त शिवारसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणीच निसर्गाच्या संकटाशी दोनहात करण्यास उपयोगी ठरणार आहेत.मे महिन्यातही पडताळणीविभागाच्या नियोजनाप्रमाणे वर्षातून चार वेळा पाणी पातळी निरीक्षण अहवाल तयार केला जातो. यावरच दुष्काळी उपाययोजना ठरविल्या जातात. मे महिन्यात पुन्हा पडताळणी होणार आहे.सधन तालुक्यातही भूजल पातळी घटलीजिल्ह्यातील सधन तालुका असलेल्या वाळवा तालुक्यातील भूजल पातळीत यंदाही घट झाली आहे. या भागात उसाचे क्षेत्र मोठे असून उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्याऐवजी बेसुमार वापरामुळेच हे संकट निर्माण झाले आहे. वाळवा तालुक्याबरोबरच पलूस तालुक्यातील पाणी पातळी स्थिर असली तरी, त्यातही घट जाणवली आहे. शिराळा तालुक्यातील जलस्रोत समाधानकारक आहेत.