शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

घनकचरा प्रकल्पास डिसेंबरची मुदत

By admin | Updated: January 24, 2017 00:51 IST

हरित न्यायालयाचा आदेश : महापालिकेच्या प्रकल्पाला सशर्त मंजुरी; महासभेत सादर होणार आराखडा

सांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प आराखड्याला हरित न्यायालयाने सशर्त मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने महापालिकेला डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदत दिली असून, प्रकल्पाचे काम आराखड्यानुसार होते की नाही, याच्या निरीक्षणासाठी उच्चस्तरीय समितीही नियुक्त केली आहे. येत्या दोन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष महासभेत घनकचरा प्रकल्पाचा आराखडा सादर होणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर प्रकल्पाची निविदा काढून कामाला सुरूवात होईल. त्यामुळे महापालिकेला आठ ते दहा महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. महापालिका क्षेत्रातील घनकचराप्रश्नी जिल्हा सुधार समितीने हरित न्यायालयात धाव घेतली होती. हरित न्यायालयात याचिका दाखल होऊनही महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली नाही. अखेर न्यायालयाने पालिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढत घनकचरा प्रकल्पाला गती दिली. त्यासाठी महापालिकेने विभागीय आयुक्तांकडे ६० कोटी रुपये जमा करावेत, अन्यथा पालिका बरखास्त करू, अशा इशारा दिला होता. त्यानंतर तत्कालीन आयुक्त अजिज कारचे यांनी वित्त आयोगासह पालिकेच्या निधीतून विभागीय आयुक्तांकडे ४३ कोटी रुपये जमा केले आहेत. घनकचरा आराखडा तयार करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाने त्रिस्तरीय तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीच्या सूचनेनुसार व देखरेखीखाली प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला. या प्रकल्पाचे काम मूळ आराखड्यानुसार होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी हरित न्यायालयाने उच्चस्तरीय समितीही नियुक्त केली आहे. या समितीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी व वालचंद महाविद्यालयाच्या प्रतिनिधीचा समावेश आहे. या समितीला दर दोन महिन्यांनी प्रकल्प कामाचा अहवाल न्यायालयासमोर सादर करावा लागणार आहे.महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पापोटी ४३ कोटी विभागीय आयुक्तांकडे जमा केले आहेत. सध्याच्या प्रकल्पाची किंमत ४२ कोटी आहे. त्याशिवाय घनकचरा प्रकल्पासाठी भविष्यात शासनाकडूनही अनुदान प्राप्त होणार आहे. त्यामुळे हरित न्यायालयाने घनकचऱ्यासाठी प्राप्त निधीचा कसा विनियोग करावा, याचे आदेशही महापालिकेला दिले आहेत. यात प्रकल्प आराखड्यातील शिल्लक निधी व भविष्यात शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान यातून घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया, बायोमिशेन प्रक्रिया केंद्रांवरच खर्च करण्याची अट न्यायालयाने घातली आहे. (प्रतिनिधी)सुधार समितीचे न्यायालयाकडून कौतुकघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जिल्हा सुधार समितीने गेली दोन वर्षे हरित न्यायालयात यशस्वी लढा दिला. सुरूवातीला घनकचरा प्रकल्प राबविण्यासाठी सुधार समितीने महापालिकेला वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली. पण त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले. अखेर सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे व सहकाऱ्यांनी हरित न्यायालयात धाव घेतली. पाठपुरावा केला. समितीच्या प्रयत्नांचे हरित न्यायालयानेही कौतुक केले आहे. आम्ही प्रकल्पावर लक्ष ठेवणार आहोत, महापालिकेने आराखड्यानुसार गुणवत्तापूर्ण कामे न केल्यास न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, असे अ‍ॅड. शिंदे यांनी सांगितले.