शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

आधार प्रमाणीकरणामुळे अडले कर्जमाफीचे घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 17:35 IST

आधार कार्डच्या प्रमाणीकरणाअभावी सांगली जिल्ह्यातील ३ हजार ७१0 शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने राबविलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात रेंगाळल्याने वंचित शेतकऱ्यांमधून नाराजी आहे.

ठळक मुद्देआधार प्रमाणीकरणामुळे अडले कर्जमाफीचे घोडेप्रक्रिया रेंगाळल्याने वंचित शेतकऱ्यांमधून नाराजी

सांगली : आधार कार्डच्या प्रमाणीकरणाअभावी सांगली जिल्ह्यातील ३ हजार ७१0 शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने राबविलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात रेंगाळल्याने वंचित शेतकऱ्यांमधून नाराजी आहे.शासनाच्या विविध योजना कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रेंगाळल्या आहेत. त्यात कर्जमाफी योजनेलाही फटका बसला आहे. एप्रिल २0१५ ते ३१ मार्च २0१९ पर्यंत उचल घेतलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३0 सप्टेंबर २0१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली आणि परतफेड न झालेली रक्कम २ लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांना अल्प आणि अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात २ लाखापर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील ६२ हजार शेतकऱ्यांना आजपर्यंत ३४१ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. शासनाकडून कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द कलेल्या यादीमधील ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या कर्जखात्यावर योजनेअंतर्गत लाभ दिला नाही, अशा लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता खरीप २0२0 साठी पीक कर्ज देण्यात यावे.

या शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम व शासनाकडून ही रक्कम जिल्हा बँकांना मिळेपर्यंतचे व्याज शासनाकडून मिळणार आहे. त्यामुळे बँकांसमोरील व्याजाची चिंता दूर झाली आहे. या शेतकऱ्यांना खरीप २०२० साठी पीक कर्जपुरवठा करावा, असा शासन निर्णय नुकताच झाला आहे. सहकार विभागाने २२ मे २०२० च्या शासन निर्णयानुसार कर्जमाफीची रक्कम जिल्हा बँकांना शासनाकडून नंतर मिळणार आहे. तोपर्यंतचे व्याजही देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ९0 हजार १0७ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास ५२८ कोटी रूपयांची कर्जमाफी होऊन हे शेतकरी कर्जमुक्त होतील, असा अंदाज होता. अंतिम यादीनंतर किती कर्जदारांना लाभ मिळणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSangliसांगली