शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

पेठ-सांगली रस्त्याची दुरवस्था पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर पेटला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 11:44 IST

पेठ-सांगली रस्त्यावर रविवारी मध्यरात्री रस्त्यातील खड्डा चुकविताना झालेल्या पाच वाहनांच्या अपघातानंतर सोमवारी सोशल मीडियावर पुन्हा या रस्त्याचा वाद पेटला. अनेकांनी शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर टीका सुरू केली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली असून, २७ आॅक्टोबरला सर्वच खराब रस्त्यांच्या प्रश्नावर त्यांनी बैठक आयोजित केली आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आंदोलनांची दखल २७ आॅक्टोबरला बैठकीचे आयोजनखराब रस्त्याच्या प्रश्नावर सोशल मीडियावर नाराजी

सांगली ,दि. २४ : पेठ-सांगली रस्त्यावर रविवारी मध्यरात्री रस्त्यातील खड्डा चुकविताना झालेल्या पाच वाहनांच्या अपघातानंतर सोमवारी सोशल मीडियावर पुन्हा या खराब रस्त्याचा वाद पेटला. अनेकांनी शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर टीका सुरू केली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली असून, २७ आॅक्टोबरला सर्वच खराब रस्त्यांच्या प्रश्नावर त्यांनी बैठक आयोजित केली आहे.

पेठ-सांगली रस्त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. याच मार्गावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवे लावून खड्ड्यांवर प्रकाश टाकण्यात आला. या आंदोलनाला पाचच दिवस झाले नाहीत, तोपर्यंत रविवारी मध्यरात्री या रस्त्यावर खड्डा चुकविण्याच्या नादात पाच वाहनांचा अपघात झाला.

या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी, एक मोठा अपघात टळला. त्यामुळे या अपघाताचा संदर्भ देत सर्वपक्षीय कृती समितीचे सदस्य सतीश साखळकर यांनी सोशल मीडियावर याप्रश्नी आवाज उठविला.

हा रस्ता जीवघेणा ठरत असतानाच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. त्यांना या रस्त्याच्या प्रश्नाची साधी चौकशीही करावीशी वाटत नाही. प्रशासनही याप्रश्नी गप्प आहे, असा संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी रस्त्याच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

जिल्ह्याधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरच या चर्चेला पूर्णविराम देत, २७ आॅक्टोबर रोजी बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले. याप्रश्नी निश्चितपणे मार्ग काढणार असल्याचा दिलासाही त्यांनी दिला. रस्त्याची जिल्ह्याधिकाऱ्यांनी दखल घेतल्याने या गोष्टीचे कौतुकही अनेक घटकांनी केले. दिवसभर रस्त्याचा हा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सर्वच रस्त्यांबाबत चर्चा

पेठ-सांगली रस्त्याच्या दुरवस्थेबरोबरच जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनिय आहे. या सर्व महत्त्वाच्या खराब रस्त्यांबाबत सोशल मिडीयामधून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यामुळे या सर्वच रस्त्यांच्या स्थितीबाबत चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार व रस्त्याची मालकी असलेल्या संबंधित विभागाचे अधिकारी यांना बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत काही तरी निर्णय होणार, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSangliसांगली