शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पेठ-सांगली रस्त्याची दुरवस्था पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर पेटला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 11:44 IST

पेठ-सांगली रस्त्यावर रविवारी मध्यरात्री रस्त्यातील खड्डा चुकविताना झालेल्या पाच वाहनांच्या अपघातानंतर सोमवारी सोशल मीडियावर पुन्हा या रस्त्याचा वाद पेटला. अनेकांनी शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर टीका सुरू केली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली असून, २७ आॅक्टोबरला सर्वच खराब रस्त्यांच्या प्रश्नावर त्यांनी बैठक आयोजित केली आहे.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आंदोलनांची दखल २७ आॅक्टोबरला बैठकीचे आयोजनखराब रस्त्याच्या प्रश्नावर सोशल मीडियावर नाराजी

सांगली ,दि. २४ : पेठ-सांगली रस्त्यावर रविवारी मध्यरात्री रस्त्यातील खड्डा चुकविताना झालेल्या पाच वाहनांच्या अपघातानंतर सोमवारी सोशल मीडियावर पुन्हा या खराब रस्त्याचा वाद पेटला. अनेकांनी शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर टीका सुरू केली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली असून, २७ आॅक्टोबरला सर्वच खराब रस्त्यांच्या प्रश्नावर त्यांनी बैठक आयोजित केली आहे.

पेठ-सांगली रस्त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. याच मार्गावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवे लावून खड्ड्यांवर प्रकाश टाकण्यात आला. या आंदोलनाला पाचच दिवस झाले नाहीत, तोपर्यंत रविवारी मध्यरात्री या रस्त्यावर खड्डा चुकविण्याच्या नादात पाच वाहनांचा अपघात झाला.

या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी, एक मोठा अपघात टळला. त्यामुळे या अपघाताचा संदर्भ देत सर्वपक्षीय कृती समितीचे सदस्य सतीश साखळकर यांनी सोशल मीडियावर याप्रश्नी आवाज उठविला.

हा रस्ता जीवघेणा ठरत असतानाच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. त्यांना या रस्त्याच्या प्रश्नाची साधी चौकशीही करावीशी वाटत नाही. प्रशासनही याप्रश्नी गप्प आहे, असा संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी रस्त्याच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

जिल्ह्याधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरच या चर्चेला पूर्णविराम देत, २७ आॅक्टोबर रोजी बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले. याप्रश्नी निश्चितपणे मार्ग काढणार असल्याचा दिलासाही त्यांनी दिला. रस्त्याची जिल्ह्याधिकाऱ्यांनी दखल घेतल्याने या गोष्टीचे कौतुकही अनेक घटकांनी केले. दिवसभर रस्त्याचा हा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सर्वच रस्त्यांबाबत चर्चा

पेठ-सांगली रस्त्याच्या दुरवस्थेबरोबरच जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनिय आहे. या सर्व महत्त्वाच्या खराब रस्त्यांबाबत सोशल मिडीयामधून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यामुळे या सर्वच रस्त्यांच्या स्थितीबाबत चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार व रस्त्याची मालकी असलेल्या संबंधित विभागाचे अधिकारी यांना बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत काही तरी निर्णय होणार, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSangliसांगली