शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Sangli: वेळेत उपचार न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या बालकाचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा डॉक्टरांना घेराव

By अविनाश कोळी | Updated: June 18, 2024 13:42 IST

ग्रामीण रूग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरच उपस्थित नसल्याने उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाला

दिलीप मोहितेविटा : साळशिंगे (ता. खानापूर) येथे रविवारी (दि.१६) रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात मण्यार जातीच्या विषारी सापाने समर्थ रावसाहेब कोलेनाड (वय अडीच वर्षे, सध्या रा. साळशिंगे, मूळगाव परभणी) या बालकास दंश केला. उपचारासाठी विटा ग्रामीण रूग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरच उपस्थित नसल्याने उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर सोमवारी रात्री ९ वाजता संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांना घेराव घातला.परभणी येथील रावसाहेब कोलेनाड हे साळशिंगे येथे भास्कर गायकवाड यांच्याकडे शेतमजूरीचे काम करतात. रविवारी रात्री जेवण करून झोपी गेल्यानंतर त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा समर्थ यास मध्यरात्री मण्यार जातीच्या सापाने दंश केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला वडील व स्थानिक नागरिकांनी विटा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले.परंतु, तेथे कर्तव्यास असलेले डॉ. भूषण देशचौगुले रूग्णालयात हजर नव्हते. त्यामुळे पूनम म्हेत्रे नामक परिचारिकेने समर्थ यास तातडीने मिरज शासकीय रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. खासगी रूग्णवाहिकेतून समर्थला मिरजेला पाठविण्यात आले. तोपर्यंत समर्थवर प्राथमिक उपचारही झाले नाहीत. मात्र, उपचारासाठी घेऊन जाणारी रूग्णवाहिका तासगाव येथे बंद पडल्याने रूग्णालयात पोहचण्यास आणखी पाऊण तासाचा वेळ गेला. या सर्व कालावधीत समर्थ याचा उपचाराअभावी मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच भाजपचे ब्रम्हानंद पडळकर, पंकज दबडे, निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व साळशिंगे येथील स्थानिक नागरिकांनी सोमवारी रात्री ९ वाजता विटा ग्रामीण रूग्णालयात येऊन डॉ. भूषण देशचौगुले व डॉ. विशाल नलवडे यांना घेराव घालून धारेवर धरले. परंतु, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्याशी संपर्क साधून डॉ. देशचौगुले यांना निलंबीत करून परिचारिका पूनम म्हेत्रेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.दरम्यान, परभणीहून शेतमजुरीसाठी आलेल्या गरीब कुटुंबातील समर्थचा सर्पदंशानंतर उपचाराअभावी मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व वैद्यकीय अधिकाऱ्यांविरूध्द तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

चौकशीनंतर कारवाई करु : डॉ. विक्रमसिंह कदमसाळशिंगे घटनेबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेची चौकशी सुरू आहे. त्यात दोषी आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीsnakeसापDeathमृत्यू