शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

लग्नादिवशीच नवरदेवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : लग्नाच्या अक्षतांना केवळ दोन तास राहिले असतानाच, हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे वधू आणि वराकडील नातेवाइकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला.सांगलीत खासगी बँकेत काम ...

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : लग्नाच्या अक्षतांना केवळ दोन तास राहिले असतानाच, हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे वधू आणि वराकडील नातेवाइकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला.सांगलीत खासगी बँकेत काम करणाºया रवींद्र पिसे या तरुणाचा विवाह कोल्हापूर येथील नात्यातीलच तरुणीबरोबर ठरला होता. शनिवारी सकाळी पावणेबारा वाजता लग्नाचा मुहूर्त होता. वधूसह वºहाडी मंडळींचे शुक्रवारीच आगमन झाले होते. गेले आठवडाभर पिसे कुटुंबियांची लग्नाच्या तयारीसाठी लगबग सुरू होती. शुक्रवारी टाकळी रस्त्यावरील मंगल कार्यालयात साखरपुडा व हळदी सभारंभ मित्र व नातेवाइकांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला. टेलरकाम करणारे रवींद्रचे वडील, आई, विवाहित बहिणीसह वधूकडील मंडळी सर्वजण शनिवारी होणाºया शुभकार्यासाठी आनंदात होते.श्निवारी सकाळी नऊच्या दरम्यान रवींद्रला अत्यवस्थ वाटू लागल्याने तो मंगल कार्यालयातून कोणालाही न सांगता घरी आला. घरी आल्यानंतर उलटी झाल्याने घरासमोरील खासगी डॉक्टरांनी तपासून त्याचा रक्तदाब कमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. रवींद्रची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास वॉन्लेस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तीन तास अगोदर रवींद्रच्या अकस्मात मृत्यूने लग्नासाठी जमलेल्या नातेवाईकांना व वधूकडील मंडळींना मोठा धक्का बसला. रवींद्रसोबत सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया वधूवर आभाळच कोसळले. सनई-चौघड्याचे सूर निघत होते. भोजनाचीही तयारी सुरू होती. तोच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकताच सर्वांना धक्का बसला. शुभकार्यासाठी जमलेल्या नातेवाईकांना रवींद्रवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.धावपळ लग्नाची आणि अंत्यसंस्काराचीएम. कॉम.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या रवींद्रला दोन वर्षांपूर्वी खासगी बँकेत नोकरी मिळाली. नोकरीनंतर सहा महिन्यांपूर्वी घर बांधून झाले. नोकरी व घराची व्यवस्था झाल्यानंतर रवींद्रचे लग्न जुळले. मात्र, लग्नापूर्वीच रवींद्रचा मृत्यू झाल्याने लग्नाच्या तयारीसाठी धावपळ करणाºया मित्र व नातेवाइकांना अंत्यसंस्कारासाठी धावपळ करावी लागली. नवरदेवाच्या आकस्मिक मृत्यूने लग्नासाठी जमलेल्या नातेवाइकांना व वधूकडील मंडळींना मोठा धक्का बसला. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया वधूवर तर आभाळच कोसळले.