शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लग्नादिवशीच नवरदेवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : लग्नाच्या अक्षतांना केवळ दोन तास राहिले असतानाच, हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे वधू आणि वराकडील नातेवाइकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला.सांगलीत खासगी बँकेत काम ...

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : लग्नाच्या अक्षतांना केवळ दोन तास राहिले असतानाच, हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे वधू आणि वराकडील नातेवाइकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला.सांगलीत खासगी बँकेत काम करणाºया रवींद्र पिसे या तरुणाचा विवाह कोल्हापूर येथील नात्यातीलच तरुणीबरोबर ठरला होता. शनिवारी सकाळी पावणेबारा वाजता लग्नाचा मुहूर्त होता. वधूसह वºहाडी मंडळींचे शुक्रवारीच आगमन झाले होते. गेले आठवडाभर पिसे कुटुंबियांची लग्नाच्या तयारीसाठी लगबग सुरू होती. शुक्रवारी टाकळी रस्त्यावरील मंगल कार्यालयात साखरपुडा व हळदी सभारंभ मित्र व नातेवाइकांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला. टेलरकाम करणारे रवींद्रचे वडील, आई, विवाहित बहिणीसह वधूकडील मंडळी सर्वजण शनिवारी होणाºया शुभकार्यासाठी आनंदात होते.श्निवारी सकाळी नऊच्या दरम्यान रवींद्रला अत्यवस्थ वाटू लागल्याने तो मंगल कार्यालयातून कोणालाही न सांगता घरी आला. घरी आल्यानंतर उलटी झाल्याने घरासमोरील खासगी डॉक्टरांनी तपासून त्याचा रक्तदाब कमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. रवींद्रची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास वॉन्लेस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तीन तास अगोदर रवींद्रच्या अकस्मात मृत्यूने लग्नासाठी जमलेल्या नातेवाईकांना व वधूकडील मंडळींना मोठा धक्का बसला. रवींद्रसोबत सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया वधूवर आभाळच कोसळले. सनई-चौघड्याचे सूर निघत होते. भोजनाचीही तयारी सुरू होती. तोच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकताच सर्वांना धक्का बसला. शुभकार्यासाठी जमलेल्या नातेवाईकांना रवींद्रवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.धावपळ लग्नाची आणि अंत्यसंस्काराचीएम. कॉम.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या रवींद्रला दोन वर्षांपूर्वी खासगी बँकेत नोकरी मिळाली. नोकरीनंतर सहा महिन्यांपूर्वी घर बांधून झाले. नोकरी व घराची व्यवस्था झाल्यानंतर रवींद्रचे लग्न जुळले. मात्र, लग्नापूर्वीच रवींद्रचा मृत्यू झाल्याने लग्नाच्या तयारीसाठी धावपळ करणाºया मित्र व नातेवाइकांना अंत्यसंस्कारासाठी धावपळ करावी लागली. नवरदेवाच्या आकस्मिक मृत्यूने लग्नासाठी जमलेल्या नातेवाइकांना व वधूकडील मंडळींना मोठा धक्का बसला. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया वधूवर तर आभाळच कोसळले.