शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नादिवशीच नवरदेवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : लग्नाच्या अक्षतांना केवळ दोन तास राहिले असतानाच, हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे वधू आणि वराकडील नातेवाइकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला.सांगलीत खासगी बँकेत काम ...

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : लग्नाच्या अक्षतांना केवळ दोन तास राहिले असतानाच, हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे वधू आणि वराकडील नातेवाइकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला.सांगलीत खासगी बँकेत काम करणाºया रवींद्र पिसे या तरुणाचा विवाह कोल्हापूर येथील नात्यातीलच तरुणीबरोबर ठरला होता. शनिवारी सकाळी पावणेबारा वाजता लग्नाचा मुहूर्त होता. वधूसह वºहाडी मंडळींचे शुक्रवारीच आगमन झाले होते. गेले आठवडाभर पिसे कुटुंबियांची लग्नाच्या तयारीसाठी लगबग सुरू होती. शुक्रवारी टाकळी रस्त्यावरील मंगल कार्यालयात साखरपुडा व हळदी सभारंभ मित्र व नातेवाइकांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला. टेलरकाम करणारे रवींद्रचे वडील, आई, विवाहित बहिणीसह वधूकडील मंडळी सर्वजण शनिवारी होणाºया शुभकार्यासाठी आनंदात होते.श्निवारी सकाळी नऊच्या दरम्यान रवींद्रला अत्यवस्थ वाटू लागल्याने तो मंगल कार्यालयातून कोणालाही न सांगता घरी आला. घरी आल्यानंतर उलटी झाल्याने घरासमोरील खासगी डॉक्टरांनी तपासून त्याचा रक्तदाब कमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. रवींद्रची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास वॉन्लेस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तीन तास अगोदर रवींद्रच्या अकस्मात मृत्यूने लग्नासाठी जमलेल्या नातेवाईकांना व वधूकडील मंडळींना मोठा धक्का बसला. रवींद्रसोबत सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया वधूवर आभाळच कोसळले. सनई-चौघड्याचे सूर निघत होते. भोजनाचीही तयारी सुरू होती. तोच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकताच सर्वांना धक्का बसला. शुभकार्यासाठी जमलेल्या नातेवाईकांना रवींद्रवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.धावपळ लग्नाची आणि अंत्यसंस्काराचीएम. कॉम.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या रवींद्रला दोन वर्षांपूर्वी खासगी बँकेत नोकरी मिळाली. नोकरीनंतर सहा महिन्यांपूर्वी घर बांधून झाले. नोकरी व घराची व्यवस्था झाल्यानंतर रवींद्रचे लग्न जुळले. मात्र, लग्नापूर्वीच रवींद्रचा मृत्यू झाल्याने लग्नाच्या तयारीसाठी धावपळ करणाºया मित्र व नातेवाइकांना अंत्यसंस्कारासाठी धावपळ करावी लागली. नवरदेवाच्या आकस्मिक मृत्यूने लग्नासाठी जमलेल्या नातेवाइकांना व वधूकडील मंडळींना मोठा धक्का बसला. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया वधूवर तर आभाळच कोसळले.