शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘डोंगरवाडी’चे पाणी ठरले मृगजळ !

By admin | Updated: August 14, 2015 00:01 IST

शेतकरी संकटात : सोनी परिसरात खरीप पिके वाळली, विहीर व कूपनलिकाही कोरड्या

संजय जाधव - सोनीसह परिसरातील पिके पाण्यावाचून करपली असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. सलग चौथ्यावर्षी खरीप हंगामाने दगा दिल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. म्हैसाळ कालव्याचे पाणी सुरू असते तर, ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी चर्चा शेतकरी वर्गातून चालू आहे. पाण्याअभावी पिके वाळली असल्याने डोंगरवाडी योजनेचे पाणी हे मृगजळच ठरले आहे.सोनीसह परिसरातील जवळपास २२ गावांना म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजना तयार पूर्ण करावी, यासाठी सतत आंदोलने करण्यात आली. या आंदोलनाला अखेर यशही आले. या योजनेतून पाणीही सोडण्यात आले. त्यामुळे या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरीवर्ग आनंदित झाला होता; पण या आनंदावर लगेच विरजण पडले. विजेच्या थकबाकीपोटी म्हैसाळ कालवा बंद पडल्याने डोंगरवाडी योजनेतून पाणी सोडणे कठीण झाले. पाण्याच्या आशेवर मान्सूनचा थोडाफार पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी जवळपास ७० टक्के पूर्ण झाली आहे; पण पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची गरज आहे; पण पाऊसच नसल्याने विहीर व कूपनलिकांना पाणी नाही. त्यामुळे पाणी नाही. पाण्याअभावी पिके करपली असून, सलग चौथ्यावर्षी खरीप वाया जाण्याची भीती असून, खरिपाचे पीक नसल्याने गरीब शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजनेतून पाणी सोडले असते, तर अशी परिस्थिती झाली नसती. सोनीसह परिसरात द्राक्षबागेचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप लांबून पाईपलाईन करून स्वखर्चाने पाणी आणले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची गरज येथील शेतकरी चांगला जाणतो आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका या शेतकऱ्यालाही बसला आहे. त्यातच या पावसाने दडी मारल्याने पाणी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पाणी मागणी अर्ज भरण्यास शेतकऱ्यांनी दाखवलेली निराशा व पाटबंधारे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे पाणी बंदच असून, पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी खात्याकडून कठोर निर्णयाची गरज आहे. पाटबंधारे खात्याचा भोंगळ कारभारसोनी येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार सतीश जाधव यांनी सांगितले की, पाणी मागणी अर्ज भरण्यास शेतकऱ्यांनी केलेली टाळाटाळ व पाटबंधारे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे पाणी बंदच आहे. सोनी परिसरातील पिके पाण्याअभावी करपली असून, डोंगरवाडी योजनेचे पाणी मिळाले असते तरी, शेतकऱ्यांना नक्कीच फायदा झाला असता. पावसाने अशीच दडी मारली तर, द्राक्षबागेच्या छाटणीसाठीही पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे.