शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

‘डोंगरवाडी’चे पाणी ठरले मृगजळ !

By admin | Updated: August 14, 2015 00:01 IST

शेतकरी संकटात : सोनी परिसरात खरीप पिके वाळली, विहीर व कूपनलिकाही कोरड्या

संजय जाधव - सोनीसह परिसरातील पिके पाण्यावाचून करपली असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. सलग चौथ्यावर्षी खरीप हंगामाने दगा दिल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. म्हैसाळ कालव्याचे पाणी सुरू असते तर, ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी चर्चा शेतकरी वर्गातून चालू आहे. पाण्याअभावी पिके वाळली असल्याने डोंगरवाडी योजनेचे पाणी हे मृगजळच ठरले आहे.सोनीसह परिसरातील जवळपास २२ गावांना म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजना तयार पूर्ण करावी, यासाठी सतत आंदोलने करण्यात आली. या आंदोलनाला अखेर यशही आले. या योजनेतून पाणीही सोडण्यात आले. त्यामुळे या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरीवर्ग आनंदित झाला होता; पण या आनंदावर लगेच विरजण पडले. विजेच्या थकबाकीपोटी म्हैसाळ कालवा बंद पडल्याने डोंगरवाडी योजनेतून पाणी सोडणे कठीण झाले. पाण्याच्या आशेवर मान्सूनचा थोडाफार पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी जवळपास ७० टक्के पूर्ण झाली आहे; पण पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची गरज आहे; पण पाऊसच नसल्याने विहीर व कूपनलिकांना पाणी नाही. त्यामुळे पाणी नाही. पाण्याअभावी पिके करपली असून, सलग चौथ्यावर्षी खरीप वाया जाण्याची भीती असून, खरिपाचे पीक नसल्याने गरीब शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजनेतून पाणी सोडले असते, तर अशी परिस्थिती झाली नसती. सोनीसह परिसरात द्राक्षबागेचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप लांबून पाईपलाईन करून स्वखर्चाने पाणी आणले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची गरज येथील शेतकरी चांगला जाणतो आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका या शेतकऱ्यालाही बसला आहे. त्यातच या पावसाने दडी मारल्याने पाणी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पाणी मागणी अर्ज भरण्यास शेतकऱ्यांनी दाखवलेली निराशा व पाटबंधारे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे पाणी बंदच असून, पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी खात्याकडून कठोर निर्णयाची गरज आहे. पाटबंधारे खात्याचा भोंगळ कारभारसोनी येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार सतीश जाधव यांनी सांगितले की, पाणी मागणी अर्ज भरण्यास शेतकऱ्यांनी केलेली टाळाटाळ व पाटबंधारे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे पाणी बंदच आहे. सोनी परिसरातील पिके पाण्याअभावी करपली असून, डोंगरवाडी योजनेचे पाणी मिळाले असते तरी, शेतकऱ्यांना नक्कीच फायदा झाला असता. पावसाने अशीच दडी मारली तर, द्राक्षबागेच्या छाटणीसाठीही पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे.