शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

सांगली मार्केट यार्डात दररोज अडीच कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:37 IST

पूरस्थिती गंभीरच बनत चालल्याने व्यापाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे. अनेक अडचणींवर मात करत वाटचाल करत असलेली सांगलीची बाजारपेठ आता दहा वर्षे मागे गेल्याची भावना व्यापारी वर्ग हतबलपणे व्यक्त करत आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांत अस्वस्थता : पुरामुळे बाजारपेठ ठप्प; रस्ते-व्यवहार बंदचा परिणाम

सांगली : महापुराचा सामना करत असलेल्या सांगली शहराच्या आर्थिक नाडीचे केंद्र असलेल्या प्रमुख बाजारपेठा पाण्यात राहिल्या. परिणामी मार्केट यार्डातील दैनंदिन अडीच कोटींचे नुकसान होत असून, पूरस्थिती गंभीरच बनत चालल्याने व्यापाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे. अनेक अडचणींवर मात करत वाटचाल करत असलेली सांगलीची बाजारपेठ आता दहा वर्षे मागे गेल्याची भावना व्यापारी वर्ग हतबलपणे व्यक्त करत आहे.

सांगली शहराला पूर नवा नाही; मात्र तीन दिवसांवर पाणी राहिल्याचे ऐकीवात नसल्याचे व्यापारी सांगतात. यावेळी मात्र आठवडा होऊनही पाणी कमी झाले नव्हते. त्यामुळे बाजारपेठेची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.

शहरातील व्यापाराचे केंद्र असलेल्या गणपती पेठ, हरभट रोड, मारुती रोड, बालाजी रोड, कापड पेठ, सराफ बाजार परिसरात सोमवारपर्यंत पाणी होते, तर दुसरे महत्त्वाचे केंद्र असलेल्या मार्केट यार्डात पाणी नसले तरी, उलाढाल थांबली होती

मार्केट यार्डात दैनंदिन दोन ते अडीच कोटींची उलाढाल होत असते. हळद, गूळ, बेदाण्यासह इतर शेतीमालाचे दररोज व्यवहार होत असतात. ज्यात देशभरातील व्यापाºयांचा सहभाग असतो व मालही संपूर्ण देशात पाठविण्यात येत असतो. जो माल आहे, तो पाठविण्यात येत नाही. तरीही व्यापाºयांनी अन्नधान्याच्या आवक-जावकला प्राधान्य दिले आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार नाही.

यापेक्षा भयावह स्थिती प्रमुख बाजारपेठेतील आहे. कपड्यांची दुकाने पाण्याखाली होती. पाणी ओसरल्यानंतर व्यापाºयांना अगोदर या मालाची तजवीज करावी लागत आहे. किराणा मालाचे होलसेल व्यापारी, आॅटोमोबाईल दुकानदारांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. या परिस्थितीत पाणी ओसरल्यानंतर दुकानांची स्वच्छता, आतील मालाची व्यवस्था आणि मग नवीन माल मागविण्यासाठी व्यापाºयांना कसरत करावी लागत आहे. नुकसानीचा केवळ अंदाज लावून व्यापाºयांना धास्ती बसली असून, लाखो रुपयांचे नुकसान सोसायचे कसे, या विवंचनेत व्यापारीवर्ग आहे. 

पुरामुळे सांगलीच्या बाजारपेठेची फार मोठी हानी झाली आहे. मार्केट यार्डाला पुराचा फटका नसला तरी, दररोज अडीच कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. प्रमुख बाजारपेठेतील व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यवहार पूर्णपणे सुरळीत होण्यास बराच कालावधी लागणार असल्याने व्यापार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.- शरद शहा, अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स 

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर