शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

सांगली मार्केट यार्डात दररोज अडीच कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:37 IST

पूरस्थिती गंभीरच बनत चालल्याने व्यापाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे. अनेक अडचणींवर मात करत वाटचाल करत असलेली सांगलीची बाजारपेठ आता दहा वर्षे मागे गेल्याची भावना व्यापारी वर्ग हतबलपणे व्यक्त करत आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांत अस्वस्थता : पुरामुळे बाजारपेठ ठप्प; रस्ते-व्यवहार बंदचा परिणाम

सांगली : महापुराचा सामना करत असलेल्या सांगली शहराच्या आर्थिक नाडीचे केंद्र असलेल्या प्रमुख बाजारपेठा पाण्यात राहिल्या. परिणामी मार्केट यार्डातील दैनंदिन अडीच कोटींचे नुकसान होत असून, पूरस्थिती गंभीरच बनत चालल्याने व्यापाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे. अनेक अडचणींवर मात करत वाटचाल करत असलेली सांगलीची बाजारपेठ आता दहा वर्षे मागे गेल्याची भावना व्यापारी वर्ग हतबलपणे व्यक्त करत आहे.

सांगली शहराला पूर नवा नाही; मात्र तीन दिवसांवर पाणी राहिल्याचे ऐकीवात नसल्याचे व्यापारी सांगतात. यावेळी मात्र आठवडा होऊनही पाणी कमी झाले नव्हते. त्यामुळे बाजारपेठेची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.

शहरातील व्यापाराचे केंद्र असलेल्या गणपती पेठ, हरभट रोड, मारुती रोड, बालाजी रोड, कापड पेठ, सराफ बाजार परिसरात सोमवारपर्यंत पाणी होते, तर दुसरे महत्त्वाचे केंद्र असलेल्या मार्केट यार्डात पाणी नसले तरी, उलाढाल थांबली होती

मार्केट यार्डात दैनंदिन दोन ते अडीच कोटींची उलाढाल होत असते. हळद, गूळ, बेदाण्यासह इतर शेतीमालाचे दररोज व्यवहार होत असतात. ज्यात देशभरातील व्यापाºयांचा सहभाग असतो व मालही संपूर्ण देशात पाठविण्यात येत असतो. जो माल आहे, तो पाठविण्यात येत नाही. तरीही व्यापाºयांनी अन्नधान्याच्या आवक-जावकला प्राधान्य दिले आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार नाही.

यापेक्षा भयावह स्थिती प्रमुख बाजारपेठेतील आहे. कपड्यांची दुकाने पाण्याखाली होती. पाणी ओसरल्यानंतर व्यापाºयांना अगोदर या मालाची तजवीज करावी लागत आहे. किराणा मालाचे होलसेल व्यापारी, आॅटोमोबाईल दुकानदारांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. या परिस्थितीत पाणी ओसरल्यानंतर दुकानांची स्वच्छता, आतील मालाची व्यवस्था आणि मग नवीन माल मागविण्यासाठी व्यापाºयांना कसरत करावी लागत आहे. नुकसानीचा केवळ अंदाज लावून व्यापाºयांना धास्ती बसली असून, लाखो रुपयांचे नुकसान सोसायचे कसे, या विवंचनेत व्यापारीवर्ग आहे. 

पुरामुळे सांगलीच्या बाजारपेठेची फार मोठी हानी झाली आहे. मार्केट यार्डाला पुराचा फटका नसला तरी, दररोज अडीच कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. प्रमुख बाजारपेठेतील व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यवहार पूर्णपणे सुरळीत होण्यास बराच कालावधी लागणार असल्याने व्यापार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.- शरद शहा, अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स 

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर