शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सांगली मार्केट यार्डात दररोज अडीच कोटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:37 IST

पूरस्थिती गंभीरच बनत चालल्याने व्यापाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे. अनेक अडचणींवर मात करत वाटचाल करत असलेली सांगलीची बाजारपेठ आता दहा वर्षे मागे गेल्याची भावना व्यापारी वर्ग हतबलपणे व्यक्त करत आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांत अस्वस्थता : पुरामुळे बाजारपेठ ठप्प; रस्ते-व्यवहार बंदचा परिणाम

सांगली : महापुराचा सामना करत असलेल्या सांगली शहराच्या आर्थिक नाडीचे केंद्र असलेल्या प्रमुख बाजारपेठा पाण्यात राहिल्या. परिणामी मार्केट यार्डातील दैनंदिन अडीच कोटींचे नुकसान होत असून, पूरस्थिती गंभीरच बनत चालल्याने व्यापाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे. अनेक अडचणींवर मात करत वाटचाल करत असलेली सांगलीची बाजारपेठ आता दहा वर्षे मागे गेल्याची भावना व्यापारी वर्ग हतबलपणे व्यक्त करत आहे.

सांगली शहराला पूर नवा नाही; मात्र तीन दिवसांवर पाणी राहिल्याचे ऐकीवात नसल्याचे व्यापारी सांगतात. यावेळी मात्र आठवडा होऊनही पाणी कमी झाले नव्हते. त्यामुळे बाजारपेठेची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.

शहरातील व्यापाराचे केंद्र असलेल्या गणपती पेठ, हरभट रोड, मारुती रोड, बालाजी रोड, कापड पेठ, सराफ बाजार परिसरात सोमवारपर्यंत पाणी होते, तर दुसरे महत्त्वाचे केंद्र असलेल्या मार्केट यार्डात पाणी नसले तरी, उलाढाल थांबली होती

मार्केट यार्डात दैनंदिन दोन ते अडीच कोटींची उलाढाल होत असते. हळद, गूळ, बेदाण्यासह इतर शेतीमालाचे दररोज व्यवहार होत असतात. ज्यात देशभरातील व्यापाºयांचा सहभाग असतो व मालही संपूर्ण देशात पाठविण्यात येत असतो. जो माल आहे, तो पाठविण्यात येत नाही. तरीही व्यापाºयांनी अन्नधान्याच्या आवक-जावकला प्राधान्य दिले आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार नाही.

यापेक्षा भयावह स्थिती प्रमुख बाजारपेठेतील आहे. कपड्यांची दुकाने पाण्याखाली होती. पाणी ओसरल्यानंतर व्यापाºयांना अगोदर या मालाची तजवीज करावी लागत आहे. किराणा मालाचे होलसेल व्यापारी, आॅटोमोबाईल दुकानदारांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. या परिस्थितीत पाणी ओसरल्यानंतर दुकानांची स्वच्छता, आतील मालाची व्यवस्था आणि मग नवीन माल मागविण्यासाठी व्यापाºयांना कसरत करावी लागत आहे. नुकसानीचा केवळ अंदाज लावून व्यापाºयांना धास्ती बसली असून, लाखो रुपयांचे नुकसान सोसायचे कसे, या विवंचनेत व्यापारीवर्ग आहे. 

पुरामुळे सांगलीच्या बाजारपेठेची फार मोठी हानी झाली आहे. मार्केट यार्डाला पुराचा फटका नसला तरी, दररोज अडीच कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. प्रमुख बाजारपेठेतील व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यवहार पूर्णपणे सुरळीत होण्यास बराच कालावधी लागणार असल्याने व्यापार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.- शरद शहा, अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स 

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर