शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

दुष्काळी जत तालुक्यातही आता कोकणातील ‘इंद्रायणी’चा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 16:02 IST

माडग्याळ : एखादी गोष्ट साकारायची जिद्द दाखवली तर, ती साध्य करताच येते. याचे उदाहरण म्हणजे सनमडी (ता. जत) येथील ...

माडग्याळ : एखादी गोष्ट साकारायची जिद्द दाखवली तर, ती साध्य करताच येते. याचे उदाहरण म्हणजे सनमडी (ता. जत) येथील शेतकरी तुकाराम बिराप्पा धायगुडे यांची शेती. कोकणातील शेती म्हणजे तांदळाचे आगर. महाराष्ट्रासह देशात कोकणच्या तांदळाला भलतीच मागणी आहे. तुकाराम धायगुडे यांनी कोकणातील इंद्रायणी भाताच्या वाणांची लागवड करून त्याचे भरघोस उत्पादन घेतले आहे.

ज्याप्रकारे कोकणात डोंगराच्या कुशीत निचरा होऊन झिरपणाऱ्या पाण्यावर भातशेती केली जाते, त्याचप्रकारे धायगुडे यांनी एक एकर क्षेत्रात भात लागवड केली. अशाप्रकारची शेती कोकणात आपल्याला दिसत होती; परंतु आता जतसारख्या दुष्काळी भागसुद्धा यामध्ये मागे राहिला नाही. धायगुडे यांनी जमिनीचा तसा पोत सुधारल्याने तांदळाचे चांगले उत्पादन मिळाले आहे.

धायगुडे हे गेल्या पाच-सहा वर्षांपासून बाजरी, तूर, ज्वारी आदी पिके घेत आहेत. परंतु जतसारख्या दुष्काळी भागात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चांगला पाऊस पडत आहे. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून कॅनॉलद्वारे घोलेश्वर, सनमडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. तसेच गेल्या दोन वर्षांत पावसाच्या अती पाण्यामुळे तूर, बाजरी ही पिो वाया गेली. त्यामुळे शेतात वेगळा प्रयोग करावा म्हणून त्यांनी भात शेती करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी भाताच्या इंद्रायणी वाणाची निवड केली.

योग्य नियोजनातून घेतले भरघोस उत्पादन

धायगुडे यांनी कशाचीही तमा न बाळगता जिद्दीने भातशेती यशस्वी करून दाखविला आहे. आता ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ते उच्चशिक्षित असून, शेतात वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. योग्य नियोजन केल्यास कोकणात पिकणारा उच्च प्रतीचा इंंद्रायणी तांदूळ जत तालुक्याच्या पूर्व भागातसुद्धा पिकवला जाऊ शकतो, हे धायगुडे यांनी सिद्ध करून दाखविले.

टॅग्स :Sangliसांगली