शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमाप्रश्नी गावबंदचा ठराव

By admin | Updated: January 29, 2015 00:06 IST

ऐतवडे बुद्रुकला ग्रामसभा : कृषी कार्यालयास टाळे ठोकणार

ऐतवडे बुद्रुक : हवामान आधारित पीकविमा योजनेंतर्गत बाधित शेतकऱ्यांंना विम्याचे पैसे ३१ जानेवारीपर्यंत न मिळाल्यास गाव बंद ठेवून तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) ग्रामसभेत देण्यात आला.प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संग्राम गायकवाड होते. पीकविमा योजनेंतर्गत ऐतवडे बुद्रुकसह कुरळप मंडलातील अनेक शेतकऱ्यांना लाभ होऊन पीकविमा रक्कम मिळणे गरजेचे आहे. याबाबत ऐतवडे बु. क्र. १ सेवा सोसायटीचे अध्यक्ष शहाजी गायकवाड यांनी कृषी विभाग व संबंधित विमा कंपनी यांच्याकडे विमा रकमेबाबत वारंवार पाठपुरावा केला होता, परंतु दरवेळी केवळ आश्वासनच देण्यात येत होते. यामुळे जानेवारीपर्यंत पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास २ फेब्रुवारीला गाव बंद ठेवून तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.त्याचप्रमाणे ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर मिळावा व गावची कोरडवाहू शाश्वत शेती अभियान अंतर्गत निवड होण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील व आ. शिवाजीराव नाईक यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे या दोघांच्याही अभिनंदनाचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. ग्रामसभेस पंचायत समिती सदस्य अरविंद बुद्रुक, राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड, सूतगिरणीचे संचालक राजेंद्र दिंडे, सरपंच संग्राम गायकवाड, उपसरपंच प्रमिला कांबळे, ग्रामसेवक कुबेर कांबळे, डॉ. अनिल बुद्रुक उपस्थित होते. (वार्ताहर)