शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महामार्गाच्या दुर्दशेची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल - लोकमतचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:49 IST

महापालिका क्षेत्रातील बाहेरून येणाºया महामार्गाच्या दुर्दशेबद्दल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाºयांबरोबर याबाबत चर्चा करून आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले

ठळक मुद्देअधिकाºयांना सूचना : आंदोलनकर्त्यांना दिले कार्यवाही करण्याचे आश्वासन, दिलेल्या अल्टिमेटमवर नागरिक जागृती मंचचे कार्यकर्ते ठाम

सांगली : महापालिका क्षेत्रातील बाहेरून येणाºया महामार्गाच्या दुर्दशेबद्दल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाºयांबरोबर याबाबत चर्चा करून आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी नागरिक जागृती मंचला दिली आहे.

‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांपासून महामार्गांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर याप्रश्नी नागरिक जागृती मंचतर्फे आंदोलनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. येत्या २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीला सांगली-तुंग रस्त्यावरील सर्व खड्ड्यांना नेत्यांची व अधिकाºयांची नावे देऊन तसे फलक झळकविण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणासह मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाºयांसहीत सर्व आमदार, खासदारांनाही पत्रे पाठविली आहेत. पत्र प्राप्त होताच जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी त्यास प्रतिसाद दिला. सांगली-तुंग रस्त्याच्या रखडलेल्या कामाबद्दल संबंधित विभागाच्या अधिकाºयांना बोलावून याबाबत चर्चा करण्याचे तसेच निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले आहे.

याप्रश्नी आता नागरिकांमधूनही संताप व्यक्त होत असून, आंदोलनासाठी विविध पक्ष, संघटना आणि नागरिकही एकवटत आहेत. सांगली-तुंग रस्त्याप्रमाणेच सांगली-अंकली, मिरज-म्हैसाळ या रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दलही लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येत्या काही दिवसांमध्ये महामार्गांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर आंदोलनांचे सत्र सुरू होणार आहे. सांगली-तुंग आणि सांगली-अंकली या मार्गावर गेल्या दहा वर्षांत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अजूनही असे अपघात होतच आहेत.गांधी जयंतीपर्यंत महामार्गाचे काम सुरू करा!नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर म्हणाले की, जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी याप्रश्नी दखल घेतल्यामुळे हा प्रश्न सुटेल, याबाबत आशावादी आहोत. त्यांनी नेहमीच सांगलीच्या विविध प्रश्नांबाबत सतर्कता दाखविली आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही, तर ठरल्याप्रमाणे आम्ही महात्मा गांधी जयंतीला खड्डे नामांतराचा कार्यक्रम करण्यावर ठाम आहोत. याकामी हलगर्जीपणा झालेला दिसून येतो. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर कारवाईबाबतही निर्णय घेण्यात यावा, अन्यथा हे काम तातडीने पूर्ण करावे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा