शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या दुर्दशेची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल - लोकमतचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:49 IST

महापालिका क्षेत्रातील बाहेरून येणाºया महामार्गाच्या दुर्दशेबद्दल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाºयांबरोबर याबाबत चर्चा करून आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले

ठळक मुद्देअधिकाºयांना सूचना : आंदोलनकर्त्यांना दिले कार्यवाही करण्याचे आश्वासन, दिलेल्या अल्टिमेटमवर नागरिक जागृती मंचचे कार्यकर्ते ठाम

सांगली : महापालिका क्षेत्रातील बाहेरून येणाºया महामार्गाच्या दुर्दशेबद्दल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाºयांबरोबर याबाबत चर्चा करून आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी नागरिक जागृती मंचला दिली आहे.

‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांपासून महामार्गांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर याप्रश्नी नागरिक जागृती मंचतर्फे आंदोलनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. येत्या २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीला सांगली-तुंग रस्त्यावरील सर्व खड्ड्यांना नेत्यांची व अधिकाºयांची नावे देऊन तसे फलक झळकविण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणासह मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाºयांसहीत सर्व आमदार, खासदारांनाही पत्रे पाठविली आहेत. पत्र प्राप्त होताच जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी त्यास प्रतिसाद दिला. सांगली-तुंग रस्त्याच्या रखडलेल्या कामाबद्दल संबंधित विभागाच्या अधिकाºयांना बोलावून याबाबत चर्चा करण्याचे तसेच निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले आहे.

याप्रश्नी आता नागरिकांमधूनही संताप व्यक्त होत असून, आंदोलनासाठी विविध पक्ष, संघटना आणि नागरिकही एकवटत आहेत. सांगली-तुंग रस्त्याप्रमाणेच सांगली-अंकली, मिरज-म्हैसाळ या रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दलही लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येत्या काही दिवसांमध्ये महामार्गांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर आंदोलनांचे सत्र सुरू होणार आहे. सांगली-तुंग आणि सांगली-अंकली या मार्गावर गेल्या दहा वर्षांत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अजूनही असे अपघात होतच आहेत.गांधी जयंतीपर्यंत महामार्गाचे काम सुरू करा!नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर म्हणाले की, जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी याप्रश्नी दखल घेतल्यामुळे हा प्रश्न सुटेल, याबाबत आशावादी आहोत. त्यांनी नेहमीच सांगलीच्या विविध प्रश्नांबाबत सतर्कता दाखविली आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही, तर ठरल्याप्रमाणे आम्ही महात्मा गांधी जयंतीला खड्डे नामांतराचा कार्यक्रम करण्यावर ठाम आहोत. याकामी हलगर्जीपणा झालेला दिसून येतो. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर कारवाईबाबतही निर्णय घेण्यात यावा, अन्यथा हे काम तातडीने पूर्ण करावे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा