शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

शेतकऱ्यांना अखंडित विजेसाठी सौरऊर्जा प्रकल्पाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषिपंप वीज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण जाहीर करण्यात आले आहे. बळीराजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असून शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणीही करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पाेलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याची कार्यवाही सुरू होणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ८० हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ४७३ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने एक हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत पीक कर्जमाफी दिली. जिल्ह्यातील २७ हजार ५५० शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर १३६ कोटी ८१ लाख रुपये रक्कम वर्ग करून पूरबाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात असली तरी, नागरिकांनी अजूनही आवश्यक ती खबरदारी घ्यावी. सध्या लसीकरण सुरू असले तरी अद्यापही कोरोना संपलेला नसल्याने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

चाैकट

पूरबाधितांना शासनाचा दिलासा

पालकमंत्री पाटील म्हणाले, जून ते ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमध्ये शेती, गोठा, घरांसह इतर मालमत्तेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे. यासाठी २६ कोटी १० लाख ६८ हजार रुपये रक्कम तालुक्यांना वितरित करण्यात आली. त्यापैकी शेतीपिकाची २३ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम ४९ हजार ७२० लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे, तर दुसऱ्या टप्प्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीतील शेतीपिके नुकसानीसाठी २६ कोटी ६० लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

चाैकट

लक्षवेधी संचलन

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनामध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, जिल्हा वाहतूक विभाग, अग्निशमन दल, पोलीस बँड पथक, दंगल नियंत्रण पथक, श्वानपथक, जेलकैदी पथक वाहन, बाँबशोधक पथक, निर्भया पथकाने संचलन सादर केले. त्यास उपस्थितांनी दाद दिली.