शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

गाय पाळीव प्राणी मग बैल जंगली कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:33 IST

सांगली : केंद्र सरकार व एनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाने बैलाचा समावेश पाळीव प्राण्याच्या यादीतून वगळून जंगली प्राण्यांच्या ...

सांगली : केंद्र सरकार व एनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाने बैलाचा समावेश पाळीव प्राण्याच्या यादीतून वगळून जंगली प्राण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केला आहे. गाय पाळीव व बैल जंगली प्राणी कसा होऊ शकतो, असा सवाल करीत बैलाचाही पाळीव प्राण्यात समावेश करावा, बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी, या मागणीसाठी २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढणार असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व पश्चिम महाराष्ट्र खिलार गाय व बैल बचाव समितीचे ॲड. विक्रमसिंह भोसले यांनी सांगितले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील खिलार या गोवंशाचा सांभाळ शर्यतीसाठी लागणाऱ्या खोंडांची पैदास करण्यासाठी केला जातो. बैलगाडी शर्यती बंदी झाल्याने बैलांची ही संपूर्ण प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र शासनाने बैलाचा जंगली प्राण्याच्या यादीत समावेश केला आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयानेही बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे.

शर्यंतबंदीचा परिणाम होऊन या खेळाशी संबंधित अनेक घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे.

त्यामुळे बैल हा जंगली प्राणी यादीतून वगळून पाळीव प्राण्यांच्या यादीत समाविष्ट करावा, खिलार प्रजाती लुप्त होण्यापासून वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून संरक्षण मिळावे, बैलगाडी शर्यती पूर्ववत सुरू व्हावी या मागण्यासाठी २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

भाजपची नौटंकी

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. पण त्याचा परिणाम सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यावरही होणार आहे. वास्तविक केंद्रात सात वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. बैलाचा समावेश पाळीव प्राण्याच्या यादीत झाल्यास सर्वच अडचणी दूर होती. बैलगाडी शर्यतीवरून भाजपची नौटंकी सुरू असल्याची टीका तानाजी सावंत यांनी केली.