शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
3
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
4
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
5
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
6
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
7
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
8
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
9
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
10
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
11
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
12
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
13
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
14
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
15
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
16
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
17
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
18
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
19
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
20
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
Daily Top 2Weekly Top 5

कॉटन मिल, रेल्वे बंदचा गावाला फटका

By admin | Updated: June 23, 2016 01:46 IST

विकास ठप्प होण्याची पूर्वसूचना : वैभव लोप पावू लागले, उद्योग-व्यवसायाला बसली खीळ -- बदलते माधवनगर२

गजानन साळुंखे - माधवनगर  विविध अंगांनी विकसित होत गेले. आर्थिक सुबत्ता आली. अनेकांच्या हाताला काम मिळाले. कामगार चळवळींमुळे घडामोडी वाढल्या. गावाचे ‘ग्रामीण’पण संपत जाऊन नागरीकरणाचा खुणा दिसू लागल्या होत्या. त्याचवेळी सत्तरच्या दशकात माधवनगर रेल्वे बंद झाल्याने गावाला पहिला दणका बसला. माधवनगर रेल्वे स्थानक बंद होऊन गावातील मार्ग बाहेरून गेला. त्यापाठोपाठ गावाचे वैभवही लोप पावू लागले. गावाचा विकास ठप्प होण्याची ही पूर्वसूचना होती.माधवनगर रेल्वे स्थानकामुळे गावात वर्दळ होती. छोटे-मोठे व्यवसाय टिकून होते. मिलसाठी कच्च्या-पक्क्या मालाची वाहतूक होत होती. त्यामुळे माधवनगर व आसपासच्या गावांना फायदा होत होता, पण स्थानक बंद झाल्याचे पडसाद हळूहळू उमटू लागले. नव्वदच्या काळात गावाला कॉटन मिलमधील संघर्षाचा फटका जाणवू लागला. कामगार संघटना आणि मिल मालक यांच्यात खटके उडू लागले. त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर झाला. कामगार संघटनांमुळे डाव्या विचारसरणीचा वावर होताच. त्याचबरोबर कॉँग्रेस, जनसंघही प्रभाव राखून होते. १९९०-९१ पासून मिलमधील संघर्षने उग्र रूप धारण केले, त्याचा परिणाम सप्टेंबर १९९४ दि माधवनगर कॉटन मिल बंद होण्यावर झाला. कॉटन मिलची चिमणी विझली आणि कामगारांच्या जीवनात अंधार पसरला. मिल सुरू होण्यासाठी विविध पातळीवर व्यापक प्रयत्न झाले.या काळात गावात सातत्याने मोर्चा, बैठका होत. कामगार एकजुटीच्या घोषणा दिल्या जात. पण त्याला यश आले नाही. मिल अखेर कायमची बंद पडली. तिच्यामुळे कामगार उघड्यावर पडलाच पण गावाचा विकासही ठप्प झाला. त्यावर अवलंबून असणारे इतर उद्योगही बंद पडू लागले. बेरोजगारांची संख्या वाढत होती. गावाला बकाल अवस्था आली. मिल पुन्हा सुरू होण्यासाठी लढणारे कामगार शेवटी देणी मिळण्यासाठी झगडू लागले. बॅँका व वित्तीय संस्थांचे कर्ज, कामगारांचे थकित पगार, फंड वाढत होते. मात्र मिल कायमची बंद झाल्याने हे पैसे मिळण्याबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले.दि. २२ आॅगस्ट २००३ ला मिलचा लिलाव झाला. कोट्यवधीची मालमत्ता कवडीमोल भावाने विकली गेली. पैसे मिळवण्यासाठीचा संघर्ष रस्त्यावरून न्यायालयात गेला होता. ग्रामस्थांची व कामगारांची एक पिढी या कालावधीत खर्ची पडली. गावाची आर्थिक प्रगती थंडावली. यंत्रमाग बंद पडू लागले, त्याची जागा ‘आॅटोलूम’ने घेतली. पुन्हा कामगार कपात सुरू झाली. व्यावसायिक मंदीचाही परिणाम कापड उद्योगावर झाला. कामगारांनी संसारोपयोगी वस्तू विकून घर चालवले. याचा परिणाम गावाच्या विकासावर झाला. मिलमुळे मोठा महसूल बंद झाल्याने आणि उद्योग-व्यवसायही ठप्प झाल्याने ग्रामपंचायत दुबळी बनली. अनेक विद्यार्थी पैशाअभावी शिक्षण सोडून मजुरी करू लागले. या दरम्यान गावासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उग्र रूप धारण करू लागला. कुपवाड औद्योगिक वसाहत व तत्कालीन सांगली नगरपालिका येथे पाणीपुरवठा करत होती. मिलमुळे येणाऱ्या महसुलातून ग्रामपंचायत पाणीपट्टी भरू शकत होती, पण गावाची आर्थिक अवस्था बिकट झाल्याने कोट्यवधीची पाणीपट्टी थकली. त्यावेळी सहा हजार लोकसंख्या असणारे, पण पाणीपट्टीचे दोन कोटी थकबाकी असणारे गाव अशी वेगळी ओळख माधवनगरची होती! मिलमुळे गावात कामासाठी आलेल्या लोकांच्या राहण्याची समस्याही निर्माण झाली होती. या आखीव व रेखीव गावात निवाऱ्याची समस्या उद्भवली. रेल्वे बंद झाल्याने गावात मोकळी जागा झाली. त्यावर छोट्या-छोट्या झोपड्या उभ्या राहू लागल्या.अहिल्यानगर, राजगुरुनगर, अवचितनगर अशा मोठ्या झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. बंद पडलेल्या रेल्वे स्थानक परिसरातील झोपड्या गावाचाच भाग बनल्या. त्यापैकी अवचितनगर, गांधीनगर, कर्नाळरस्ता झोपडपट्टी शासनाने नियमित केली, पण बाकीच्या ठिकाणांचा प्रश्न बिकट आहे. (क्रमश:)