शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

कॉटन मिल, रेल्वे बंदचा गावाला फटका

By admin | Updated: June 23, 2016 01:46 IST

विकास ठप्प होण्याची पूर्वसूचना : वैभव लोप पावू लागले, उद्योग-व्यवसायाला बसली खीळ -- बदलते माधवनगर२

गजानन साळुंखे - माधवनगर  विविध अंगांनी विकसित होत गेले. आर्थिक सुबत्ता आली. अनेकांच्या हाताला काम मिळाले. कामगार चळवळींमुळे घडामोडी वाढल्या. गावाचे ‘ग्रामीण’पण संपत जाऊन नागरीकरणाचा खुणा दिसू लागल्या होत्या. त्याचवेळी सत्तरच्या दशकात माधवनगर रेल्वे बंद झाल्याने गावाला पहिला दणका बसला. माधवनगर रेल्वे स्थानक बंद होऊन गावातील मार्ग बाहेरून गेला. त्यापाठोपाठ गावाचे वैभवही लोप पावू लागले. गावाचा विकास ठप्प होण्याची ही पूर्वसूचना होती.माधवनगर रेल्वे स्थानकामुळे गावात वर्दळ होती. छोटे-मोठे व्यवसाय टिकून होते. मिलसाठी कच्च्या-पक्क्या मालाची वाहतूक होत होती. त्यामुळे माधवनगर व आसपासच्या गावांना फायदा होत होता, पण स्थानक बंद झाल्याचे पडसाद हळूहळू उमटू लागले. नव्वदच्या काळात गावाला कॉटन मिलमधील संघर्षाचा फटका जाणवू लागला. कामगार संघटना आणि मिल मालक यांच्यात खटके उडू लागले. त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर झाला. कामगार संघटनांमुळे डाव्या विचारसरणीचा वावर होताच. त्याचबरोबर कॉँग्रेस, जनसंघही प्रभाव राखून होते. १९९०-९१ पासून मिलमधील संघर्षने उग्र रूप धारण केले, त्याचा परिणाम सप्टेंबर १९९४ दि माधवनगर कॉटन मिल बंद होण्यावर झाला. कॉटन मिलची चिमणी विझली आणि कामगारांच्या जीवनात अंधार पसरला. मिल सुरू होण्यासाठी विविध पातळीवर व्यापक प्रयत्न झाले.या काळात गावात सातत्याने मोर्चा, बैठका होत. कामगार एकजुटीच्या घोषणा दिल्या जात. पण त्याला यश आले नाही. मिल अखेर कायमची बंद पडली. तिच्यामुळे कामगार उघड्यावर पडलाच पण गावाचा विकासही ठप्प झाला. त्यावर अवलंबून असणारे इतर उद्योगही बंद पडू लागले. बेरोजगारांची संख्या वाढत होती. गावाला बकाल अवस्था आली. मिल पुन्हा सुरू होण्यासाठी लढणारे कामगार शेवटी देणी मिळण्यासाठी झगडू लागले. बॅँका व वित्तीय संस्थांचे कर्ज, कामगारांचे थकित पगार, फंड वाढत होते. मात्र मिल कायमची बंद झाल्याने हे पैसे मिळण्याबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले.दि. २२ आॅगस्ट २००३ ला मिलचा लिलाव झाला. कोट्यवधीची मालमत्ता कवडीमोल भावाने विकली गेली. पैसे मिळवण्यासाठीचा संघर्ष रस्त्यावरून न्यायालयात गेला होता. ग्रामस्थांची व कामगारांची एक पिढी या कालावधीत खर्ची पडली. गावाची आर्थिक प्रगती थंडावली. यंत्रमाग बंद पडू लागले, त्याची जागा ‘आॅटोलूम’ने घेतली. पुन्हा कामगार कपात सुरू झाली. व्यावसायिक मंदीचाही परिणाम कापड उद्योगावर झाला. कामगारांनी संसारोपयोगी वस्तू विकून घर चालवले. याचा परिणाम गावाच्या विकासावर झाला. मिलमुळे मोठा महसूल बंद झाल्याने आणि उद्योग-व्यवसायही ठप्प झाल्याने ग्रामपंचायत दुबळी बनली. अनेक विद्यार्थी पैशाअभावी शिक्षण सोडून मजुरी करू लागले. या दरम्यान गावासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उग्र रूप धारण करू लागला. कुपवाड औद्योगिक वसाहत व तत्कालीन सांगली नगरपालिका येथे पाणीपुरवठा करत होती. मिलमुळे येणाऱ्या महसुलातून ग्रामपंचायत पाणीपट्टी भरू शकत होती, पण गावाची आर्थिक अवस्था बिकट झाल्याने कोट्यवधीची पाणीपट्टी थकली. त्यावेळी सहा हजार लोकसंख्या असणारे, पण पाणीपट्टीचे दोन कोटी थकबाकी असणारे गाव अशी वेगळी ओळख माधवनगरची होती! मिलमुळे गावात कामासाठी आलेल्या लोकांच्या राहण्याची समस्याही निर्माण झाली होती. या आखीव व रेखीव गावात निवाऱ्याची समस्या उद्भवली. रेल्वे बंद झाल्याने गावात मोकळी जागा झाली. त्यावर छोट्या-छोट्या झोपड्या उभ्या राहू लागल्या.अहिल्यानगर, राजगुरुनगर, अवचितनगर अशा मोठ्या झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. बंद पडलेल्या रेल्वे स्थानक परिसरातील झोपड्या गावाचाच भाग बनल्या. त्यापैकी अवचितनगर, गांधीनगर, कर्नाळरस्ता झोपडपट्टी शासनाने नियमित केली, पण बाकीच्या ठिकाणांचा प्रश्न बिकट आहे. (क्रमश:)