शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
4
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
5
दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
6
दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
7
पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
8
SIP द्वारे कोट्यधीश व्हायचंय? '१०-७-१०' हा फॉर्म्युला येईल कामी; श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
9
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
10
खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...
11
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
12
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
13
सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली गिरीजा ओक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली...
14
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
15
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
16
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
17
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
18
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
19
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
20
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?

कॉटन मिल, रेल्वे बंदचा गावाला फटका

By admin | Updated: June 23, 2016 01:46 IST

विकास ठप्प होण्याची पूर्वसूचना : वैभव लोप पावू लागले, उद्योग-व्यवसायाला बसली खीळ -- बदलते माधवनगर२

गजानन साळुंखे - माधवनगर  विविध अंगांनी विकसित होत गेले. आर्थिक सुबत्ता आली. अनेकांच्या हाताला काम मिळाले. कामगार चळवळींमुळे घडामोडी वाढल्या. गावाचे ‘ग्रामीण’पण संपत जाऊन नागरीकरणाचा खुणा दिसू लागल्या होत्या. त्याचवेळी सत्तरच्या दशकात माधवनगर रेल्वे बंद झाल्याने गावाला पहिला दणका बसला. माधवनगर रेल्वे स्थानक बंद होऊन गावातील मार्ग बाहेरून गेला. त्यापाठोपाठ गावाचे वैभवही लोप पावू लागले. गावाचा विकास ठप्प होण्याची ही पूर्वसूचना होती.माधवनगर रेल्वे स्थानकामुळे गावात वर्दळ होती. छोटे-मोठे व्यवसाय टिकून होते. मिलसाठी कच्च्या-पक्क्या मालाची वाहतूक होत होती. त्यामुळे माधवनगर व आसपासच्या गावांना फायदा होत होता, पण स्थानक बंद झाल्याचे पडसाद हळूहळू उमटू लागले. नव्वदच्या काळात गावाला कॉटन मिलमधील संघर्षाचा फटका जाणवू लागला. कामगार संघटना आणि मिल मालक यांच्यात खटके उडू लागले. त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर झाला. कामगार संघटनांमुळे डाव्या विचारसरणीचा वावर होताच. त्याचबरोबर कॉँग्रेस, जनसंघही प्रभाव राखून होते. १९९०-९१ पासून मिलमधील संघर्षने उग्र रूप धारण केले, त्याचा परिणाम सप्टेंबर १९९४ दि माधवनगर कॉटन मिल बंद होण्यावर झाला. कॉटन मिलची चिमणी विझली आणि कामगारांच्या जीवनात अंधार पसरला. मिल सुरू होण्यासाठी विविध पातळीवर व्यापक प्रयत्न झाले.या काळात गावात सातत्याने मोर्चा, बैठका होत. कामगार एकजुटीच्या घोषणा दिल्या जात. पण त्याला यश आले नाही. मिल अखेर कायमची बंद पडली. तिच्यामुळे कामगार उघड्यावर पडलाच पण गावाचा विकासही ठप्प झाला. त्यावर अवलंबून असणारे इतर उद्योगही बंद पडू लागले. बेरोजगारांची संख्या वाढत होती. गावाला बकाल अवस्था आली. मिल पुन्हा सुरू होण्यासाठी लढणारे कामगार शेवटी देणी मिळण्यासाठी झगडू लागले. बॅँका व वित्तीय संस्थांचे कर्ज, कामगारांचे थकित पगार, फंड वाढत होते. मात्र मिल कायमची बंद झाल्याने हे पैसे मिळण्याबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले.दि. २२ आॅगस्ट २००३ ला मिलचा लिलाव झाला. कोट्यवधीची मालमत्ता कवडीमोल भावाने विकली गेली. पैसे मिळवण्यासाठीचा संघर्ष रस्त्यावरून न्यायालयात गेला होता. ग्रामस्थांची व कामगारांची एक पिढी या कालावधीत खर्ची पडली. गावाची आर्थिक प्रगती थंडावली. यंत्रमाग बंद पडू लागले, त्याची जागा ‘आॅटोलूम’ने घेतली. पुन्हा कामगार कपात सुरू झाली. व्यावसायिक मंदीचाही परिणाम कापड उद्योगावर झाला. कामगारांनी संसारोपयोगी वस्तू विकून घर चालवले. याचा परिणाम गावाच्या विकासावर झाला. मिलमुळे मोठा महसूल बंद झाल्याने आणि उद्योग-व्यवसायही ठप्प झाल्याने ग्रामपंचायत दुबळी बनली. अनेक विद्यार्थी पैशाअभावी शिक्षण सोडून मजुरी करू लागले. या दरम्यान गावासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उग्र रूप धारण करू लागला. कुपवाड औद्योगिक वसाहत व तत्कालीन सांगली नगरपालिका येथे पाणीपुरवठा करत होती. मिलमुळे येणाऱ्या महसुलातून ग्रामपंचायत पाणीपट्टी भरू शकत होती, पण गावाची आर्थिक अवस्था बिकट झाल्याने कोट्यवधीची पाणीपट्टी थकली. त्यावेळी सहा हजार लोकसंख्या असणारे, पण पाणीपट्टीचे दोन कोटी थकबाकी असणारे गाव अशी वेगळी ओळख माधवनगरची होती! मिलमुळे गावात कामासाठी आलेल्या लोकांच्या राहण्याची समस्याही निर्माण झाली होती. या आखीव व रेखीव गावात निवाऱ्याची समस्या उद्भवली. रेल्वे बंद झाल्याने गावात मोकळी जागा झाली. त्यावर छोट्या-छोट्या झोपड्या उभ्या राहू लागल्या.अहिल्यानगर, राजगुरुनगर, अवचितनगर अशा मोठ्या झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. बंद पडलेल्या रेल्वे स्थानक परिसरातील झोपड्या गावाचाच भाग बनल्या. त्यापैकी अवचितनगर, गांधीनगर, कर्नाळरस्ता झोपडपट्टी शासनाने नियमित केली, पण बाकीच्या ठिकाणांचा प्रश्न बिकट आहे. (क्रमश:)