शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पूरग्रस्तांच्या जेवणाच्या बिलात लाखोंचा भ्रष्टाचार : अमित शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:29 IST

हा अत्यंत किळसवाणा प्रकार या मंडळींनी केला आहे. तरीही सांगलीचे आमदार यावर काही बोलत नाहीत. आयुक्तांनी भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी दावा दाखल करणार असल्याचा इशारा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिला.

ठळक मुद्देन्यायालयात जाणार; अधिकाऱ्यांवर कारवाई करा

सांगली : महापुराच्या काळात पूरग्रस्तांना जेवणाचा पुरवठा केल्याची बोगस बिले जोडून महापालिकेतील अधिकाऱ्यांनी ६५ लाखांचा भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्ट अधिकाºयांना आयुक्तांनी पाठीशी घालू नये, अन्यथा त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करू, असा इशारा जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले, पूरग्रस्तांच्या जेवण बिलाबाबत आयुब पटेल यांनी माहिती अधिकार कायद्याखाली माहिती घेतली असता, त्यात जेवणाच्या बिलात घोळ उघडकीस आला आहे. पूरग्रस्तांना महापालिकेने जेवण दिल्याचा दावा केला जात आहे. पण त्यासाठी सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनीच पूरग्रस्तांना जेवण दिले होते. तरी देखील ६५ लाखांचा खर्च जेवणावर दाखविला आहे. सध्या काही बिले आम्हाला माहिती अधिकारात दिली आहेत. त्यात बोगसगिरी दिसून येते. जेवणाचा पुरवठा करणाºया केटरर्सच्या लेटरहेडवर पत्ता, मोबाईल नंबर नाही. त्यांचा जीएसटी नंबरही दिसून येत नाही.

बिलाची आकडेवारी पाहता, दहा लाखांचा जीएसटी या केटरर्सनी बुडविला आहे. सर्व बिलांवर एकसारखेच शिक्के आहेत. काहींचा व्यवसाय पुरामुळे बंद आहे. तरी देखील त्यांची बिले जोडली आहेत. केटरर्सनी तीन लाख, सहा लाखाची बिले दिली आहेत. पण अंकात मात्र दहा लाखांची तफावत आहे. त्याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी जीएसटी अधिकारी, अन्न व औषध प्रशासनकडे करणार आहोत.

महापालिकेतील सत्ताधाºयांनी पूरग्रस्तांच्या मदतीवर डल्ला मारला आहे. हा अत्यंत किळसवाणा प्रकार या मंडळींनी केला आहे. तरीही सांगलीचे आमदार यावर काही बोलत नाहीत. आयुक्तांनी भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी दावा दाखल करणार असल्याचा इशारा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिला.यावेळी आयुब पटेल, जयंत जाधव, महालिंग हेगडे, सुधीर नवले, राजेंद्र पाटील, रमेश डफळापुरे, बापू कोळेकर, मयूर लोखंडे, बाबासाहेब पुणेकर आदी उपस्थित होते.‘आरएसएस’ने जाहीर खुलासा करावापूरग्रस्तांच्या पुनर्वसन केंद्रामध्ये आरएसएसने जेवणाचा पुरवठा केला असल्याची जाहिरात भाजपने केली होती. दुसरीकडे या केंद्रात महापालिकेने पूरग्रस्तांसाठी जेवण दिल्याचे सांगून बिले अदा केली आहेत. मग महापालिकेचे अधिकारी खोटे बोलतात, की आरएसएस? याबाबत आता नागरिकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे आरएसएसने याबाबतचा जाहीर खुलासा करावा, असे आव्हान अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिले.

टॅग्स :Sangliसांगलीfraudधोकेबाजी