शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

पूरग्रस्तांच्या जेवणाच्या बिलात लाखोंचा भ्रष्टाचार : अमित शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:29 IST

हा अत्यंत किळसवाणा प्रकार या मंडळींनी केला आहे. तरीही सांगलीचे आमदार यावर काही बोलत नाहीत. आयुक्तांनी भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी दावा दाखल करणार असल्याचा इशारा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिला.

ठळक मुद्देन्यायालयात जाणार; अधिकाऱ्यांवर कारवाई करा

सांगली : महापुराच्या काळात पूरग्रस्तांना जेवणाचा पुरवठा केल्याची बोगस बिले जोडून महापालिकेतील अधिकाऱ्यांनी ६५ लाखांचा भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्ट अधिकाºयांना आयुक्तांनी पाठीशी घालू नये, अन्यथा त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करू, असा इशारा जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले, पूरग्रस्तांच्या जेवण बिलाबाबत आयुब पटेल यांनी माहिती अधिकार कायद्याखाली माहिती घेतली असता, त्यात जेवणाच्या बिलात घोळ उघडकीस आला आहे. पूरग्रस्तांना महापालिकेने जेवण दिल्याचा दावा केला जात आहे. पण त्यासाठी सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनीच पूरग्रस्तांना जेवण दिले होते. तरी देखील ६५ लाखांचा खर्च जेवणावर दाखविला आहे. सध्या काही बिले आम्हाला माहिती अधिकारात दिली आहेत. त्यात बोगसगिरी दिसून येते. जेवणाचा पुरवठा करणाºया केटरर्सच्या लेटरहेडवर पत्ता, मोबाईल नंबर नाही. त्यांचा जीएसटी नंबरही दिसून येत नाही.

बिलाची आकडेवारी पाहता, दहा लाखांचा जीएसटी या केटरर्सनी बुडविला आहे. सर्व बिलांवर एकसारखेच शिक्के आहेत. काहींचा व्यवसाय पुरामुळे बंद आहे. तरी देखील त्यांची बिले जोडली आहेत. केटरर्सनी तीन लाख, सहा लाखाची बिले दिली आहेत. पण अंकात मात्र दहा लाखांची तफावत आहे. त्याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी जीएसटी अधिकारी, अन्न व औषध प्रशासनकडे करणार आहोत.

महापालिकेतील सत्ताधाºयांनी पूरग्रस्तांच्या मदतीवर डल्ला मारला आहे. हा अत्यंत किळसवाणा प्रकार या मंडळींनी केला आहे. तरीही सांगलीचे आमदार यावर काही बोलत नाहीत. आयुक्तांनी भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी दावा दाखल करणार असल्याचा इशारा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिला.यावेळी आयुब पटेल, जयंत जाधव, महालिंग हेगडे, सुधीर नवले, राजेंद्र पाटील, रमेश डफळापुरे, बापू कोळेकर, मयूर लोखंडे, बाबासाहेब पुणेकर आदी उपस्थित होते.‘आरएसएस’ने जाहीर खुलासा करावापूरग्रस्तांच्या पुनर्वसन केंद्रामध्ये आरएसएसने जेवणाचा पुरवठा केला असल्याची जाहिरात भाजपने केली होती. दुसरीकडे या केंद्रात महापालिकेने पूरग्रस्तांसाठी जेवण दिल्याचे सांगून बिले अदा केली आहेत. मग महापालिकेचे अधिकारी खोटे बोलतात, की आरएसएस? याबाबत आता नागरिकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे आरएसएसने याबाबतचा जाहीर खुलासा करावा, असे आव्हान अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिले.

टॅग्स :Sangliसांगलीfraudधोकेबाजी