शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वशी ग्रामपंचायतीचा विकास कामात भ्रष्टाचार

By admin | Updated: June 16, 2014 12:14 IST

वशी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला.

कुरळप : वशी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. सत्ताधार्‍यांनी हा भ्रष्टाचार केला असून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनीही कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
पाटील म्हणाले, तंटामुक्त समितीच्या बक्षिसात १ लाखाचा भ्रष्टाचार केला असून बक्षीस रकमेचा सरकारी नियम धाब्यावर बसवून मनमानी खर्च केला आहे. बर्‍याच खर्ची पावत्यांवर सरपंच, ग्रामसेवक यांच्या स्वाक्षर्‍या नाहीत. २0 हजाराचे डिजिटल फलक लावले, परंतु प्रत्यक्षात फलक कुठेच लावले नाहीत. इकोव्हिलेजमध्ये २ लाखाचा भ्रष्टाचार केला असून सौरदिवे खरेदीसाठी अडीच लाखापैकी २५ हजाराच्या पावत्याच नाहीत. याशिवाय तीन वर्षात मोठे दिवे, दिवाबत्ती व खरेदीची बिले नाहीत. झाडांच्या संवर्धनासाठी तब्बल झाडांच्या रकमेइतकाच भांगलण, पाणी घालणे, संरक्षण खर्च दाखवण्यात आला आहे. इकोव्हिलेजमध्ये ९0 टक्के बोगसगिरी आहे.
रस्ता काँक्रिटीकरणावर ९९ हजाराचा खर्च दाखविला असून त्याची प्रशासकीय मंजुरी, मूल्यांकन नाही. राष्ट्रीय पेयजलची बोगस व निकृष्ट कामे असून मुख्य पाईपलाईन दीड फुटाने केली आहे. माहिती अधिकारामध्ये सव्वा कोटीच्या कामांची माहिती केवळ एका पानावर दिली आहे. याचबरोबर पाणी योजनेच्या अध्यक्ष, सचिव निवडी बोगस असून ग्रामसभेद्वारे न करता सोयीस्कर पध्दतीने केल्या आहेत. निवडीमध्ये एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना प्राधान्य देण्यात आले आहे. ही माहिती तीन महिने उशिरा देण्यात आली आहे.
-----
गावाच्या पाणीपट्टीमध्ये हुकूमशाहीने अडीचपट वाढ केली असून ग्रामसभा अथवा ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता ती ४00 रुपयांवरुन १ हजार रुपये करण्यात आली आहे. (वार्ताहर) वशी गावच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने सरकारच्या एक नाही तर सर्वच योजनांच्या निधीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. सरकारी नियम पायदळी तुडवून लाखोंचा भ्रष्टाचार करणार्‍यांवर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा येत्या १५ दिवसात ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसणार आहे.
- सुनील पाटील, वशी.