शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

वशी ग्रामपंचायतीचा विकास कामात भ्रष्टाचार

By admin | Updated: June 16, 2014 12:14 IST

वशी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला.

कुरळप : वशी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. सत्ताधार्‍यांनी हा भ्रष्टाचार केला असून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनीही कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
पाटील म्हणाले, तंटामुक्त समितीच्या बक्षिसात १ लाखाचा भ्रष्टाचार केला असून बक्षीस रकमेचा सरकारी नियम धाब्यावर बसवून मनमानी खर्च केला आहे. बर्‍याच खर्ची पावत्यांवर सरपंच, ग्रामसेवक यांच्या स्वाक्षर्‍या नाहीत. २0 हजाराचे डिजिटल फलक लावले, परंतु प्रत्यक्षात फलक कुठेच लावले नाहीत. इकोव्हिलेजमध्ये २ लाखाचा भ्रष्टाचार केला असून सौरदिवे खरेदीसाठी अडीच लाखापैकी २५ हजाराच्या पावत्याच नाहीत. याशिवाय तीन वर्षात मोठे दिवे, दिवाबत्ती व खरेदीची बिले नाहीत. झाडांच्या संवर्धनासाठी तब्बल झाडांच्या रकमेइतकाच भांगलण, पाणी घालणे, संरक्षण खर्च दाखवण्यात आला आहे. इकोव्हिलेजमध्ये ९0 टक्के बोगसगिरी आहे.
रस्ता काँक्रिटीकरणावर ९९ हजाराचा खर्च दाखविला असून त्याची प्रशासकीय मंजुरी, मूल्यांकन नाही. राष्ट्रीय पेयजलची बोगस व निकृष्ट कामे असून मुख्य पाईपलाईन दीड फुटाने केली आहे. माहिती अधिकारामध्ये सव्वा कोटीच्या कामांची माहिती केवळ एका पानावर दिली आहे. याचबरोबर पाणी योजनेच्या अध्यक्ष, सचिव निवडी बोगस असून ग्रामसभेद्वारे न करता सोयीस्कर पध्दतीने केल्या आहेत. निवडीमध्ये एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना प्राधान्य देण्यात आले आहे. ही माहिती तीन महिने उशिरा देण्यात आली आहे.
-----
गावाच्या पाणीपट्टीमध्ये हुकूमशाहीने अडीचपट वाढ केली असून ग्रामसभा अथवा ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता ती ४00 रुपयांवरुन १ हजार रुपये करण्यात आली आहे. (वार्ताहर) वशी गावच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने सरकारच्या एक नाही तर सर्वच योजनांच्या निधीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. सरकारी नियम पायदळी तुडवून लाखोंचा भ्रष्टाचार करणार्‍यांवर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा येत्या १५ दिवसात ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसणार आहे.
- सुनील पाटील, वशी.