शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांचा सर्व पक्षांसोबत भ्रष्टाचार

By admin | Updated: March 22, 2017 23:37 IST

मेधा पाटकर : वाळव्यात नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

वाळवा : सहकाराला खासगीकरणाकडे नेण्याचा मार्ग महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी बनवला आहे. त्यातील काहीजण आज तुरुंगात आहेत. सर्व पक्षांना सत्तेत सामावून घेऊन भ्रष्टाचार करायचा, असाच यांचा पवित्रा असल्याचे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी बुधवारी केले. भ्रष्टाचारमुक्त संस्था चालविणारी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत. राजकीय मूल्यहीनतेची तत्त्वे देशाच्या मानगुटीवर बसली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पाचव्या स्मृतिदिनी आयोजित जाहीर सभेत प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्यासह अ‍ॅड. सुभाष पाटील, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, कार्यक्रमाचे निमंत्रक वैभव नायकवडी, संकुलाच्या मार्गदर्शिका व क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या पत्नी कुसूमताई नायकवडी, प्रा. डॉ. बाबूराव गुरव प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते. पाटकर म्हणाल्या की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची जमीन विक्री राजकीय खरेदीदारांनीच केली आहे, परंतु क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांनी सहकारी तत्त्वाला कोठेही भगदाड पडू नये, याची जाणीव ठेवूनच हुतात्मा कारखान्याची उभारणी केली आहे. ‘हुतात्मा’ची वाटचाल अत्यंत प्रेरणादायी आहे. जेथे ऊस पिकत नाही, तेथे साखर कारखाने आणि त्याद्वारे भूजल हडप करणे, याला आमचा कायमचा विरोध राहील.भाई वैद्य म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीनंतर घटनेवर हल्ला करून देशाला यादवी युध्दाकडे नेले जात आहे. भाजप, नरेंद्र मोदी सत्तेवर नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्तेवर आला आहे. त्यांनी प्रारंभापासूनच घटनेला विरोध केला आहे. २०२४ नंतर पुढे निवडणुका होणार नाहीत, तर लष्कराच्या साहाय्याने हिटलरशाही सुरू होईल. त्यासाठी राजकारणाचा पट बदलून नव्याने मांडावा लागेल. सर्व पक्षांनी वास्तवतेचे भान ठेवणे गरजेचे आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले की, शेतकरी आत्महत्या करीत असताना ज्यांच्या पोटातील पाणीसुध्दा हालत नाही, ते श्रमजीवी शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. शेतकरी संघटनेचे नेते म्हणवून घेणारे आता सरकारजमा झाले आहेत. वैभव नायकवडी व सौ. नंदिनी नायकवडी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या विस्तारीकरण बांधकामाचा प्रारंभ मेधा पाटकर व भाई वैद्य यांच्याहस्ते करण्यात आला. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले. प्रा. राजा माळगी, प्रा. डॉ. जे. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)व्यवस्था : विषमतेवर आधारितमेधा पाटकर म्हणाल्या की, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी येणे म्हणजे जातीयवादाचे, धर्मांध शक्तींचे उफाळून येणे होय. ३५ लाख कोटीच्या घरातील भांडवलदारांना सूट मिळते, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही. कर्जमाफी देऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी विषमतेवर आधारित व्यवस्था उलटून टाकली पाहिजे. ३१ वर्षे लढून सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पूर्णपणे मिटलेले नाहीत. धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त यांचा प्रश्न हिणवून चालणार नाही.वाळवा येथे बुधवारी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मृतिदिनानिमित्त जाहीर सभेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून अ‍ॅड. सुभाष पाटील, अरूण लाड, वैभव नायकवडी, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, भाई वैद्य, कुसूमताई नायकवडी, प्रा. डॉ. बाबूराव गुरव उपस्थित होते.