शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

CoronaVirus Lockdown : काही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सिंंगला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 15:29 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. पण काही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सिंंगला हरताळ फासला जात आहे. सकाळ होताच काही नागरिक भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यात उत्साही तरुणांचाही समावेश आहे. अजूनही या नागरिकांना कोरोनाच्या गंभीरतेची जाणीव झालेली दिसत नाही.

ठळक मुद्देकाही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सिंंगला हरताळसुरक्षित अंतर राखण्याच्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सूचना

सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. पण काही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सिंंगला हरताळ फासला जात आहे. सकाळ होताच काही नागरिक भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यात उत्साही तरुणांचाही समावेश आहे. अजूनही या नागरिकांना कोरोनाच्या गंभीरतेची जाणीव झालेली दिसत नाही.कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्याच्या प्रादुर्भावामुळे होत असलेल्या आजारावर अद्यापही औषध अथवा लस शोधण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखणे, हाच सध्याच्या घडीला त्यावरील उपाय आहे. त्यासाठी शासन आणि प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे २५ रुग्ण सापडले आहेत. महापालिका क्षेत्रात सध्या एकही रुग्ण नसला तरी, जवळपास तीनशे जणांना होम क्वारंटाईन केले आहे. महापालिकेने किराणा, भाजीपाला, दूध घरपोच करण्याचे नियोजनही केले आहे. तरीही बहुतांश सांगलीकर सकाळच्या टप्प्यात खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत.गावठाणमधील गल्ली-बोळात आणि उपनगरांमध्ये काही किराणा दुकानांसमोर सर्कल तयार करून सुरक्षित अंतर ठेवले जात आहे, तर काही दुकानात या नियमाला हरताळ फासला जात आहे. तीच अवस्था भाजीपाला खरेदीच्यावेळी होत आहे. एकाच ठिकाणी तीन ते चार भाजीपाला विक्रेते एकत्र येत आहेत. तिथे एकाचवेळी नागरिकांची अधिक गर्दी होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंंग पाळले जात नाही.

उपनगरे, झोपडपट्टी आणि छोट्या गल्ली-बोळांमध्ये नागरिक घराबाहेर एकत्रित गप्पा मारताना आणि रस्त्यावरून फिरताना दिसून येतात. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिल्या जात असल्या तरी, नागरिकांनी मात्र ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली