शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus InSangli : जिल्ह्यातील आठजणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 18:12 IST

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दोन दिवसांत तब्बल आठने वाढ झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आष्टा येथील झोळंबी वसाहत, शिराळा तालुक्यातील मोरेगाव, तर आटपाडी तालुक्यातील जांभुळणी व नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील चारजण कोरोनाबाधित झाले होते, तर रविवारी आणखी चारजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात नांगोळेतील बाधिताचा मुलगा, बनपुरी (ता. आटपाडी), खिरवडे (ता. शिराळा) व मुंबईतील धारावी येथून मालगाव (ता. मिरज) येथे आलेल्या वृध्देचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील आठजणांना कोरोनाची लागणतिघेजण कोरोनामुक्त : मिरजेत ३४ जणांवर उपचार

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दोन दिवसांत तब्बल आठने वाढ झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आष्टा येथील झोळंबी वसाहत, शिराळा तालुक्यातील मोरेगाव, तर आटपाडी तालुक्यातील जांभुळणी व नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील चारजण कोरोनाबाधित झाले होते, तर रविवारी आणखी चारजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात नांगोळेतील बाधिताचा मुलगा, बनपुरी (ता. आटपाडी), खिरवडे (ता. शिराळा) व मुंबईतील धारावी येथून मालगाव (ता. मिरज) येथे आलेल्या वृध्देचा समावेश आहे.मुंबईहून विटा येथे आलेल्या ७२ वर्षीय वृध्दाचा मिरजेत उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला होता. कोरोना संशयावरून त्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात रविवारी रात्री त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार झोळंबी वसाहत, आष्टा येथील तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुंबईहून कुटुंबासह ही व्यक्ती आष्टा येथे आली होती. त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर मिरजेत दाखल करण्यात आले होते. २१ मे रोजी मुंबईहून नांगोळे येथे आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्याच्या २२ वर्षीय मुलाचाही अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे.

शिराळा तालुक्यातील मोरेगाव येथील तसेच जांभुळणी (ता. आटपाडी) येथील व्यक्तीचाही अहवाल शनिवारी मध्यरात्री पॉझिटिव्ह आला होता. रविवारी आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे मुंबईहून आलेल्या १५ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिराळा तालुक्यातील खिरवडे येथे मुंबईहून आलेल्या ५६ वर्षीय व्यक्तीही कोरोनाबाधित झाली आहे.मिरज तालुक्यातील मालगाव येथे धारावीतून आलेल्या ७५ वर्षांच्या वृध्देलाही कोरोना निदान झाले आहे. शनिवारी मुंबईतील धारावी येथून बसने २२ जण आले होते. त्याची माहिती मिळताच प्रशासनाने या सर्वांना तातडीने क्वारंटाईन करत त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील २० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर वृध्देचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एक अहवाल प्रलंबित आहे.

दरम्यान, सध्या उपचार घेत असलेल्या तीन पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८२ झाली असून, यातील ३४ जणांवर मिरजेत उपचार सुरू आहेत, तर ४६ जण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.भिकवडी, अंकलेचे कोरोनामुक्तजिल्ह्यातील भिकवडी खुर्द (ता. कडेगाव) येथील दोघेजण यांच्यासह अंकले (ता. जत) येथील एकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तिघेजण कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोनातून बचावला, क्षयरोगाने मृत्यूशहरातील साखर कारखाना परिसरात असलेल्या लक्ष्मीनगर येथील कोरोनामुक्त रुग्णाचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. कोरोनाचे निदान झाल्याने त्याच्यावर मिरज कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात त्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला असला तरी, त्यास फफ्फुसाचा क्षयरोग असल्याने त्याच्यावर तिथेच व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. कोरोनातून मुक्त झाला असला तरी त्याला क्षयरोग असल्याने तिथेच उपचार सुरू होते. रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली