शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus : लॉकडाऊनमुळे ८१ दिवसांनी घडली बाप-लेकींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:12 IST

कामधंद्यासाठी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील दोन मुली लॉकडाऊनमुळे राजापूर तालुक्यात अडकल्या. या मुलींना परत आणण्यासाठी बापाने प्रयत्न सुरू केले. त्याला नगरसेवक अभिजित भोसले यांची साथ मिळाली. मित्रांच्या मदतीने या मुलींना कोल्हापूर आणि नंतर सांगलीच्या सीमेवर आणण्यात आले. तेथून पोलिसांना विनंती करून या मुलींना सांगलीत आणण्यात आले. या बाप-लेकींची तब्बल ८१ दिवसांनंतर भेट झाली आणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे ८१ दिवसांनी घडली बाप-लेकींची भेटआणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या

सांगली : कामधंद्यासाठी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील दोन मुली लॉकडाऊनमुळे राजापूर तालुक्यात अडकल्या. या मुलींना परत आणण्यासाठी बापाने प्रयत्न सुरू केले. त्याला नगरसेवक अभिजित भोसले यांची साथ मिळाली. मित्रांच्या मदतीने या मुलींना कोल्हापूर आणि नंतर सांगलीच्या सीमेवर आणण्यात आले. तेथून पोलिसांना विनंती करून या मुलींना सांगलीत आणण्यात आले. या बाप-लेकींची तब्बल ८१ दिवसांनंतर भेट झाली आणि त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.मंगळवेढा तालुक्यातील धुळाप्पा केंगार हे कुटुंबासह काही महिन्यांपूर्वी राजापूर तालुक्यात रस्त्याच्या कामावर होते. तेथे जावडे गावातील माध्यमिक आश्रमशाळेत त्यांच्या दोन मुली शिक्षण घेत होत्या. वर्षा व सुवर्णा या दोन मुली सातवी व तिसरीच्या वर्गात होत्या. लॉकडाऊनपूर्वी धुळाप्पा हे सांगलीत हनुमाननगरमध्ये राहण्यास आले, पण मुली शिक्षणासाठी राजापूरलाच राहिल्या.

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला अन् मुलींची भेट या कुटुंबाला दुर्मिळ झाली. तिकडे मुलींनाही घरची आठवण होत होती. त्याही दररोज दूरध्वनी करून परत नेण्याची मागणी करीत होत्या. त्यांच्या आर्त हाकेने बापाच्या हृदयाची घालमेल होत होती. मुलींना परत आणण्यासाठी शासकीय पास काढावा लागतो, वाहनांची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी येणाऱ्या खर्चाची तजवीज केंगार यांच्याकडे नव्हती. त्यामुळे मुलींचंी कधी भेट होणार, याचीच चिंता त्यांना होती.केंगार यांनी नगरसेवक अभिजित भोसले यांची भेट घेतली व मुलींना परत आणा, अशी साद घातली. भोसले यांनी राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर परिसरातील मित्रांशी संपर्क साधला. राजापूरहून कोल्हापूर अथवा सांगलीला कोण येणार आहे का, याची चौकशी केली. अखेर चार दिवसांच्या प्रयत्नानंतर राजापूर येथील मेहबूब मठद हे कोल्हापूरला कामानिमित्त येणार होते. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वाहनातून या दोन्ही मुलींना कोल्हापूरपर्यंत आणण्याची विनंती केली. मठद यांनीही सहमती दर्शविली.

दोन्ही मुली त्यांच्या वाहनातून कोल्हापूरपर्यंत आल्या. तेथून भोसले यांचे मित्र सुमित पाटील यांनी या मुलींना कोल्हापुरातून सांगलीच्या सीमेपर्यंत म्हणजे अंकलीपर्यंत आणले. पण सीमेवर पोलिसांनी मुलींना अडविले. नगरसेवक भोसले, केंगार हेही सीमेवर होते. त्यांनी कोल्हापूर पोलिसांना विनंती केली.

अखेर माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनी करून पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर या मुलींची तपासणी करून त्यांना वडिलांच्या ताब्यात दिले. सांगली पोलिसांनीही मुलींची रजिस्टरवर नोंद करून होम क्वारंटाईनच्या सूचना दिल्या. अखेर ८१ दिवसांनंतर मुलींशी भेट झाल्याने बापाचे डोळेही पाणावले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली