शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

कोरोनाचा कहर; प्रेतं इतकी की, कैलासरथही नाही नशीबी; शववाहिकेतूनच न्यावे लागते स्मशानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 13:02 IST

नियमांमुळे प्लॅस्टिक पिशवीत बांधून होतात अंत्यसंस्कार

सोलापूर : कोरोना महामारीमुळे दिवसेंदिवस मृत्यूंची संख्या वाढत आहे. या मृतांचे अंत्यसंस्कारही नियमानुसार प्लॅस्टिकच्या लांब पिशवीत बांधून केले जातात. त्यामुळेे पारंपरिक पध्दतीने मृतदेहाला अखेरचा सन्मानही देता येत नाही. शिवाय कैलासरथातूनही स्मशानातून नेता येत नाही. त्यामुळे बहुतांश कैलास रथ जागेवर थांबूनच आहेत.

सामान्य स्थितीत कैलास रथांची मागणी कमी असणं, ही बाब उत्तम आहे; पण एकीकडे मृतांची संख्या वाढत असताना दुर्दवाने नातेवाईकांना साधं कैलासरथातूनही मृतांना स्मशानात नेता येत नाही. कोरोनामुळे कैलास रथाची मागणी ५० टक्क्यांनी घटली आहे, असे रथ चालकांनी सांगितले. सोलापुरात एकूण १२ ते १३ खासगी कैलास रथ चालक आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेहास अंतिम संस्कारासाठी शववाहिकांद्वारे घेऊन जातात, असेही त्याने सांगितले.

तसा सन्मानही नाही!

पूर्वी एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला तर प्रत्येक धर्मानुसार त्या त्या पध्दतीने अंत्यसंस्कार केले जातात. मृत व्यक्तीच्या घरापासून स्मशानापर्यंतम जाण्यासाठी कैलास रथास फुलाची आरास करत, रथाच्या समोर भजनही असे. हलगीनाद असायचा; पण कोरोना मृतांना हा सन्मान मिळत नाही.

 

गेल्या अठरा वर्षांपासून कैलास रथाची सेवा देत आहे, मात्र मागणी घटली आहे, पूर्वी दिवसागणिक दोन-तीन ऑर्डर मिळायच्या मात्र सध्या तेही मिळेनात, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- दत्तात्रय आवार - कैलास रथ चालक

 

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू