शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कहर; प्रेतं इतकी की, कैलासरथही नाही नशीबी; शववाहिकेतूनच न्यावे लागते स्मशानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 13:02 IST

नियमांमुळे प्लॅस्टिक पिशवीत बांधून होतात अंत्यसंस्कार

सोलापूर : कोरोना महामारीमुळे दिवसेंदिवस मृत्यूंची संख्या वाढत आहे. या मृतांचे अंत्यसंस्कारही नियमानुसार प्लॅस्टिकच्या लांब पिशवीत बांधून केले जातात. त्यामुळेे पारंपरिक पध्दतीने मृतदेहाला अखेरचा सन्मानही देता येत नाही. शिवाय कैलासरथातूनही स्मशानातून नेता येत नाही. त्यामुळे बहुतांश कैलास रथ जागेवर थांबूनच आहेत.

सामान्य स्थितीत कैलास रथांची मागणी कमी असणं, ही बाब उत्तम आहे; पण एकीकडे मृतांची संख्या वाढत असताना दुर्दवाने नातेवाईकांना साधं कैलासरथातूनही मृतांना स्मशानात नेता येत नाही. कोरोनामुळे कैलास रथाची मागणी ५० टक्क्यांनी घटली आहे, असे रथ चालकांनी सांगितले. सोलापुरात एकूण १२ ते १३ खासगी कैलास रथ चालक आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेहास अंतिम संस्कारासाठी शववाहिकांद्वारे घेऊन जातात, असेही त्याने सांगितले.

तसा सन्मानही नाही!

पूर्वी एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला तर प्रत्येक धर्मानुसार त्या त्या पध्दतीने अंत्यसंस्कार केले जातात. मृत व्यक्तीच्या घरापासून स्मशानापर्यंतम जाण्यासाठी कैलास रथास फुलाची आरास करत, रथाच्या समोर भजनही असे. हलगीनाद असायचा; पण कोरोना मृतांना हा सन्मान मिळत नाही.

 

गेल्या अठरा वर्षांपासून कैलास रथाची सेवा देत आहे, मात्र मागणी घटली आहे, पूर्वी दिवसागणिक दोन-तीन ऑर्डर मिळायच्या मात्र सध्या तेही मिळेनात, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- दत्तात्रय आवार - कैलास रथ चालक

 

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू