शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
3
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
4
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
5
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
6
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
7
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
8
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
9
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
10
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
11
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
12
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
13
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
14
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
15
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
16
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
17
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
18
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
19
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
20
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...

कोरोना योद्ध्याला कासेगाव पोलिसांची दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

कासेगाव : शिराळा उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना स्वखर्चाने उकडलेली अंडी देण्यासाठी निघालेल्या जिल्हा बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यास कासेगाव पोलिसांनी अडवून ...

कासेगाव : शिराळा उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना स्वखर्चाने उकडलेली अंडी देण्यासाठी निघालेल्या जिल्हा बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यास कासेगाव पोलिसांनी अडवून दमदाटी व अर्वाच्च शिवीगाळ केली. तू अंडी दिली नाहीस तर कोरोना झालेले मरतील काय, तुला त्यांचा फारच पुळका आलेला आहे, तुझ्याकडे पैसा जास्त झाला असेल तर आम्हाला दे, अशी भाषा पोलिसांनी वापरली. या घटनेची कासेगाव परिसरात चर्चा सुरू आहे.

कासेगाव येथील अशोक धोंडिराम माने हे शिराळा येथे जिल्हा बँकेत विभागीय अधिकारी आहेत. गतवर्षी त्यांच्या आईचे कोरोनाने निधन झाले. हे दुःख कोणाच्या वाट्यास येऊ नये या हेतूने कोरोनाबाधित रुग्णांना अशोक माने गेल्या दोन महिन्यांपासून उकडलेली अंडी पुरवत आहेत. शिराळा येथे बँकेत कामावर जाताना दररोज घरातूनच ते १०० उकडलेली अंडी घेऊन जातात. रविवारी, दि. २३ रोजी बँकेला सुट्टी असतानाही केवळ अंडी देण्यासाठी ते शिराळा येथे त्यांच्या चारचाकी गाडीतून गेले. परतत असताना वाटेगाव रस्त्यावर कासेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अमर जाधव व विजय पाटील यांनी त्यांना अडविले. कागदपत्रे दाखवा म्हटल्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्रे दाखवली. त्यांनी सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. तुला काय? अंडी द्यायचा ठेका दिला आहे का, तू अंडी दिली नाहीस तर कोरोना झालेले मरतील काय? असे म्हणत अर्वाच्च शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एकाने गाडीची चावी काढून घेतली. गाडीत बस, नाहीतर मारत पोलीस ठाण्यात नेईन, अशी दमदाटी त्यांनी केली. वैतागून माने यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांना फोन केला. त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आल्यानंतर मात्र त्या दोघांनी माने यांना सोडून दिले. या घटनेनंतर घरी आल्यानंतर माने यांना भोवळ आली व उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉक्टरकडे नेले. उपचार घेतल्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.

चौकट

‘लोकमत’ने केले होते कौतुक

१८ मे च्या ‘ लोकमत’मध्ये 'तो बनला पौष्टिक अन्नदाता' मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल ‘लोकमत’ने घेतली होती.

चौकट

अमर, अकबर, अँथोनी पुन्हा चर्चेत

कासेगाव पोलीस ठाण्याचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते यांचे काम व प्रतिमा चांगली असली तरी काही युवा पोलीस मात्र वेगळेच कारनामे करीत आहेत. अर्थपूर्ण तडजोडी करून प्रकरण मिटविण्यात पोलीस ठाण्यातील अमर, अकबर, अँथोनी पुढे असतात. यातील अमर हा कायम आघाडीवर असतो, तर अकबर व अँथोनी हे त्याला साहाय्य करीत असतात. या कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस प्रमुखांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.