शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

corona virus : जनता कर्फ्यूला आता पोलिसांचे बळ : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 13:51 IST

सांगली शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भाजी बाजारासह विविध ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना  कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे जनता कर्फ्यूला आता पोलिसांचे बळ : जयंत पाटील गर्दी टाळण्यासाठी कडक कारवाई, रस्त्यावरील बाजाराला प्रतिबंध

सांगली : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. बेड, आॅक्सिजन, व्हेटिलेंटरची कमतरता असल्याने प्रशासनालाही मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणांचा शोध घेतला जाणार आहे. भाजी बाजारासह विविध ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना  कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी, उद्योजकांची बैठक झाली. यावेळी जनता कर्फ्यू, वाढता संसर्ग, बेडची व्यवस्था यावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पाटील म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात भाजी विक्रीच्या ठिकाणी होणारी गर्दी हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी अशा गर्दीच्या ठिकाणांचा शोध घेऊन तिथे पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यावरील बाजार बंद केले जातील, असेही सांगितले.व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, जनता कर्फ्यू निष्फळ ठरला आहे. त्यामुळे असोसिएशनने केलेल्या मागणीनुसार संचारबंदी, जिल्हाबंदीसह संपूर्ण लॉकडाऊन केले, तर कोरोनाची स्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल. दरम्यान, व्यापारी महासंघाने लॉकडाऊनला विरोध केला. जिल्ह्यात शंभर टक्के बंद राहणार असेल तर आम्ही दुकाने बंद ठेवू, अशी भूमिका घेतली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, शिवसेनेचे बजरंग पाटील, शंभोराज काटकर, अतुल शहा, विराज कोकणे, राजेंद्र पवार, आप्पा कोरे, राकेश मिरजे, शरद शहा, सचिन पाटील, शिवाजी पाटील, संजय आराणके, प्रसाद मदभावीकर, शैलेश पवार, अजित सूर्यवंशी, युसूफ जमादार, रत्नाकर नांगरे उपस्थित होते....तर संपूर्ण लॉकडाऊनचा पर्यायजनता कर्फ्यू माझ्यासाठी नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आता गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यात अपयश आल्यास संपूर्ण जिल्हा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल. लॉकडाऊनबाबत लोकप्रतिनिधी, व्यापारी, उद्योजकांशी चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली