शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

corona virus : जनता कर्फ्यूला आता पोलिसांचे बळ : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 13:51 IST

सांगली शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भाजी बाजारासह विविध ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना  कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे जनता कर्फ्यूला आता पोलिसांचे बळ : जयंत पाटील गर्दी टाळण्यासाठी कडक कारवाई, रस्त्यावरील बाजाराला प्रतिबंध

सांगली : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. बेड, आॅक्सिजन, व्हेटिलेंटरची कमतरता असल्याने प्रशासनालाही मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणांचा शोध घेतला जाणार आहे. भाजी बाजारासह विविध ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना  कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी, उद्योजकांची बैठक झाली. यावेळी जनता कर्फ्यू, वाढता संसर्ग, बेडची व्यवस्था यावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पाटील म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात भाजी विक्रीच्या ठिकाणी होणारी गर्दी हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी अशा गर्दीच्या ठिकाणांचा शोध घेऊन तिथे पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यावरील बाजार बंद केले जातील, असेही सांगितले.व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, जनता कर्फ्यू निष्फळ ठरला आहे. त्यामुळे असोसिएशनने केलेल्या मागणीनुसार संचारबंदी, जिल्हाबंदीसह संपूर्ण लॉकडाऊन केले, तर कोरोनाची स्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल. दरम्यान, व्यापारी महासंघाने लॉकडाऊनला विरोध केला. जिल्ह्यात शंभर टक्के बंद राहणार असेल तर आम्ही दुकाने बंद ठेवू, अशी भूमिका घेतली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, शिवसेनेचे बजरंग पाटील, शंभोराज काटकर, अतुल शहा, विराज कोकणे, राजेंद्र पवार, आप्पा कोरे, राकेश मिरजे, शरद शहा, सचिन पाटील, शिवाजी पाटील, संजय आराणके, प्रसाद मदभावीकर, शैलेश पवार, अजित सूर्यवंशी, युसूफ जमादार, रत्नाकर नांगरे उपस्थित होते....तर संपूर्ण लॉकडाऊनचा पर्यायजनता कर्फ्यू माझ्यासाठी नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आता गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यात अपयश आल्यास संपूर्ण जिल्हा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल. लॉकडाऊनबाबत लोकप्रतिनिधी, व्यापारी, उद्योजकांशी चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली