शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जनता कर्फ्यूला आता पोलिसांचे बळ : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 13:51 IST

सांगली शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. भाजी बाजारासह विविध ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना  कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे जनता कर्फ्यूला आता पोलिसांचे बळ : जयंत पाटील गर्दी टाळण्यासाठी कडक कारवाई, रस्त्यावरील बाजाराला प्रतिबंध

सांगली : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. बेड, आॅक्सिजन, व्हेटिलेंटरची कमतरता असल्याने प्रशासनालाही मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणांचा शोध घेतला जाणार आहे. भाजी बाजारासह विविध ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना  कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी, उद्योजकांची बैठक झाली. यावेळी जनता कर्फ्यू, वाढता संसर्ग, बेडची व्यवस्था यावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पाटील म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात भाजी विक्रीच्या ठिकाणी होणारी गर्दी हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी अशा गर्दीच्या ठिकाणांचा शोध घेऊन तिथे पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यावरील बाजार बंद केले जातील, असेही सांगितले.व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, जनता कर्फ्यू निष्फळ ठरला आहे. त्यामुळे असोसिएशनने केलेल्या मागणीनुसार संचारबंदी, जिल्हाबंदीसह संपूर्ण लॉकडाऊन केले, तर कोरोनाची स्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल. दरम्यान, व्यापारी महासंघाने लॉकडाऊनला विरोध केला. जिल्ह्यात शंभर टक्के बंद राहणार असेल तर आम्ही दुकाने बंद ठेवू, अशी भूमिका घेतली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, शिवसेनेचे बजरंग पाटील, शंभोराज काटकर, अतुल शहा, विराज कोकणे, राजेंद्र पवार, आप्पा कोरे, राकेश मिरजे, शरद शहा, सचिन पाटील, शिवाजी पाटील, संजय आराणके, प्रसाद मदभावीकर, शैलेश पवार, अजित सूर्यवंशी, युसूफ जमादार, रत्नाकर नांगरे उपस्थित होते....तर संपूर्ण लॉकडाऊनचा पर्यायजनता कर्फ्यू माझ्यासाठी नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आता गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यात अपयश आल्यास संपूर्ण जिल्हा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल. लॉकडाऊनबाबत लोकप्रतिनिधी, व्यापारी, उद्योजकांशी चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली