शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

corona in sangli : कोरोना मुक्ती ही सर्व यंत्रणांच्या सामूहीक प्रयत्नाचे यश :अभिजित चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 20:20 IST

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २६ वर गेल्याने सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण होते. मात्र, नियमांची काटेकोर अंंमलबजावणी केल्याने जिल्ह्यातील २५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. सर्व यंत्रणेचे समन्वय व केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळेच हे यश मिळाले असून आता जिल्ह्यातील जनतेने गाफील न राहता सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केले.

ठळक मुद्देकोरोना मुक्ती ही सर्व यंत्रणांच्या सामूहीक प्रयत्नाचे यश :अभिजित चौधरीकोरोना रूग्ण घटलेतरी दक्षता आवश्यकच

सांगली : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २६ वर गेल्याने सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण होते. मात्र, नियमांची काटेकोर अंंमलबजावणी केल्याने जिल्ह्यातील २५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. सर्व यंत्रणेचे समन्वय व केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळेच हे यश मिळाले असून आता जिल्ह्यातील जनतेने गाफील न राहता सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केले.जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचे २६ रूग्ण होते. यातील २४ जण निगेटिव्ह आले आहेत. तर बालकाचे नमूने दुसर्‍यांदा तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या बालकाचा पहिले नमुने निगेटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील २५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल शनिवारी रात्रीपर्यंत येणे अपेक्षीत आहे. असे झाल्यास मिरज शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षाता आता केवळ एका रूग्णावर उपचार सुरू राहणार असून लवकरच हा रूग्णही कोरोनामुक्त होईल.कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या नियमांचे प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे पालन केल्यानेच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. प्रशासनातील प्रत्येक घटकाने या कालावधीत अत्यंत जबाबदारीने काम केले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात राहू शकली व आहे ते रूग्णही बरे झाले आहेत.कोरोना बाधितांची संख्या घटली म्हणून जिल्ह्यातील जनतेने आता अजिबात गाफिल राहू नये उलट अधिक सर्तकता बाळगली पाहिजे. प्रशासनाकडूनही योग्य ते नियंत्रण कायम असणार आहे. नियमीतपणे हात धुणे व सोशल डिस्टस्टटींग पाळणे अजूनही गरजेचे आहे.सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वसामान्यांना याची झळ बसू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या चढ्या भावाने विक्री सुरू असल्याचे प्रकार लक्षात आल्याने त्यांच्यावर कारवाईचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून याबाबतही जनतेने निश्‍चिंत रहावे असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळूंखे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली