शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

CoronaVirus Lockdown : एमआयडीसीतील अत्यावश्यक सेवेतील ९५ उद्योग अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 15:33 IST

कोरोनाच्या संसर्गाचा धोका असूनही जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कुपवाड, मिरज एमआयडीसी आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील ९५ उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या अत्यावश्यक सेवेतील या उद्योगांना कोरोनाबरोबरच कामगारांच्या टंचाईचा फटका बसला आहे. सध्या या औद्योगिक क्षेत्रात केवळ सात ते आठच उद्योग सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आणि संचारबंदीमुळे कामगार कामावर येत नसल्याचे चित्र आहे. तसेच उद्योजकांनाही या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक आणि उत्पादित मालाच्या विक्रीचा प्रश्न भेडसावत आहे.

ठळक मुद्देएमआयडीसीतील अत्यावश्यक सेवेतील ९५ उद्योग अडचणीतजीवनावश्यक सेवेतील उद्योगांची अवस्था इकडे आड-तिकडे विहीर

कुपवाड : कोरोनाच्या संसर्गाचा धोका असूनही जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कुपवाड, मिरज एमआयडीसी आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील ९५ उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या अत्यावश्यक सेवेतील या उद्योगांना कोरोनाबरोबरच कामगारांच्या टंचाईचा फटका बसला आहे. सध्या या औद्योगिक क्षेत्रात केवळ सात ते आठच उद्योग सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आणि संचारबंदीमुळे कामगार कामावर येत नसल्याचे चित्र आहे. तसेच उद्योजकांनाही या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक आणि उत्पादित मालाच्या विक्रीचा प्रश्न भेडसावत आहे.कोरोना या गंभीर विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात बंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. या बंदीतून मिरज, कुपवाड एमआयडीसी आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेतील ९५ उद्योगांना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. या अत्यावश्यक सेवेत कुपवाड एमआयडीसीत ६१, मिरज एमआयडीसीत ३३ आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील एका उद्योगाचा समावेश शासनाने केला आहे.नागरिकांना संचारबंदीच्या कालावधीतही जीवनावश्यक आणि अत्यावश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित व्हावा, या उद्देशाने या उद्योगांना प्रतिबंधात्मक आदेशातून वगळण्यात आले होते. परंतु या उद्योगांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देऊनही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात अत्यंत कठीण समस्यांचा सामना करावा लागला आहे.

कुपवाड, मिरज आणि सांगलीतील या अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवेतील उद्योगांची अवस्था इकडे आड-तिकडे विहीर अशी झाली आहे. कोरोनासारखा गंभीर आजार असल्याने आणि संचारबंदीच्या कालावधीतील भीतीमुळे कामगार कामावर येईनात, अशी स्थिती आहे. उद्योग किमान दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यासाठी कामगार कामावर येणे गरजेचे आहे.कामगारांना कामावर येण्यासाठी विनंती केली आहे. तरीही कामगार कोरोना आणि संचारबंदीच्या भीतीमुळे कामावर येत नाहीत. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करावा की कामगारांच्या आरोग्याची काळजी करावी, अशा अडचणीतही हे उद्योजक अडकून पडले आहेत. त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली