शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : एमआयडीसीतील अत्यावश्यक सेवेतील ९५ उद्योग अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 15:33 IST

कोरोनाच्या संसर्गाचा धोका असूनही जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कुपवाड, मिरज एमआयडीसी आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील ९५ उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या अत्यावश्यक सेवेतील या उद्योगांना कोरोनाबरोबरच कामगारांच्या टंचाईचा फटका बसला आहे. सध्या या औद्योगिक क्षेत्रात केवळ सात ते आठच उद्योग सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आणि संचारबंदीमुळे कामगार कामावर येत नसल्याचे चित्र आहे. तसेच उद्योजकांनाही या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक आणि उत्पादित मालाच्या विक्रीचा प्रश्न भेडसावत आहे.

ठळक मुद्देएमआयडीसीतील अत्यावश्यक सेवेतील ९५ उद्योग अडचणीतजीवनावश्यक सेवेतील उद्योगांची अवस्था इकडे आड-तिकडे विहीर

कुपवाड : कोरोनाच्या संसर्गाचा धोका असूनही जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कुपवाड, मिरज एमआयडीसी आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील ९५ उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या अत्यावश्यक सेवेतील या उद्योगांना कोरोनाबरोबरच कामगारांच्या टंचाईचा फटका बसला आहे. सध्या या औद्योगिक क्षेत्रात केवळ सात ते आठच उद्योग सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आणि संचारबंदीमुळे कामगार कामावर येत नसल्याचे चित्र आहे. तसेच उद्योजकांनाही या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक आणि उत्पादित मालाच्या विक्रीचा प्रश्न भेडसावत आहे.कोरोना या गंभीर विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात बंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. या बंदीतून मिरज, कुपवाड एमआयडीसी आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेतील ९५ उद्योगांना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. या अत्यावश्यक सेवेत कुपवाड एमआयडीसीत ६१, मिरज एमआयडीसीत ३३ आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील एका उद्योगाचा समावेश शासनाने केला आहे.नागरिकांना संचारबंदीच्या कालावधीतही जीवनावश्यक आणि अत्यावश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित व्हावा, या उद्देशाने या उद्योगांना प्रतिबंधात्मक आदेशातून वगळण्यात आले होते. परंतु या उद्योगांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देऊनही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात अत्यंत कठीण समस्यांचा सामना करावा लागला आहे.

कुपवाड, मिरज आणि सांगलीतील या अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवेतील उद्योगांची अवस्था इकडे आड-तिकडे विहीर अशी झाली आहे. कोरोनासारखा गंभीर आजार असल्याने आणि संचारबंदीच्या कालावधीतील भीतीमुळे कामगार कामावर येईनात, अशी स्थिती आहे. उद्योग किमान दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यासाठी कामगार कामावर येणे गरजेचे आहे.कामगारांना कामावर येण्यासाठी विनंती केली आहे. तरीही कामगार कोरोना आणि संचारबंदीच्या भीतीमुळे कामावर येत नाहीत. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करावा की कामगारांच्या आरोग्याची काळजी करावी, अशा अडचणीतही हे उद्योजक अडकून पडले आहेत. त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली