शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना निर्बंधामुळे भाजीपाला दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेल्या कडक निर्बंधांचा भाजीपाला बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. आठवडा बाजार बंद, त्यात नियमांमुळे ...

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेल्या कडक निर्बंधांचा भाजीपाला बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. आठवडा बाजार बंद, त्यात नियमांमुळे आवकेवर परिणाम झाल्याने सरासरी २० रुपयांनी भाज्यांचे दर वाढले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद असल्याने किराणा मालासह फळांनाही अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुढीपाडव्याला आंब्याला असणारी मागणी लक्षात घेता, आंब्याची आवक किंचित वाढली आहे.

सध्या शहरात वाहनांमधूनच भाज्यांची विक्री हाेत आहे, तर फळविक्रेते रस्त्यावर असले तरी, नागरिकच बाहेर नसल्याने विक्रीवर परिणाम झाल्याने फळेही वाहनांतून विक्री केली जात आहेत. तरीही अपेक्षित ग्राहक नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या आठवड्यात किराणा मालाचे दर स्थिर आहेत. पण आवकेवर परिणाम झाल्याने पुढील काही दिवसात दर वाढण्याची शक्यता आहे.

चौकट

भाज्या महागल्या

आठवडा बाजार बंद, त्यात कडक निर्बंध यामुळे सध्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामस्वरूप दरही वाढले आहेत. वांगी, दोडका, गवारीचे दर ६० ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत, तर पालेभाज्या १५ रुपयांवर पोहोचल्या आहेत.

चौकट

फळांना मागणी कमी

बाजार बंद असल्याने फळ विक्रेत्यांना ग्राहक कमी आहेत. या आठवड्यात कलिंगड, टरबुजाची आवक चांगली होती. मात्र, विक्रेत्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही वाहनातून फळविक्री करण्यात येत आहे.

चौकट

किराणाचे दर स्थिर

नवीन गहू, तांदळासह इतर शेतीमाल सध्या बाजारात येत असला तरी, निर्बंधामुळे आवकेवर परिणाम झाला आहे. गव्हाचे दर काहीसे उतरले असले तरी, जुन्या गव्हाचे दर वाढलेलेच आहेत. अत्यावश्यक सेवेत किराणा दुकानदार असले तरी, या आठवड्यात अपेक्षित व्यवसाय झाला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोट

कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधामुळे सध्या व्यवसायावरच परिणाम झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात किराणा मालाचे दर स्थिर असून खाद्यतेलाची आवक मात्र, अपेक्षेपेक्षा कमी होत आहे.

- बापू सोनुरे, व्यापारी

कोट

लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाला मिळत नाही. तसेच इतर कारणांसाठीही बाहेर पडता येत नाही. त्यामुळे मिळत असलेले साहित्य जादा दराने मिळत आहे.

- पूजा जाधव, गृहिणी

कोट

या आठवड्यात आंब्याची आवक वाढत आहे. मात्र, विक्रीसाठी ठेवूनही ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही. आता गुढीपाडव्याला का होईना, ग्राहक मिळतील, अशी अपेक्षा आहे.

- रामचंद्र बने, फळविक्रेते