शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

कोरोना निर्बंधामुळे भाजीपाला दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेल्या कडक निर्बंधांचा भाजीपाला बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. आठवडा बाजार बंद, त्यात नियमांमुळे ...

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू असलेल्या कडक निर्बंधांचा भाजीपाला बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. आठवडा बाजार बंद, त्यात नियमांमुळे आवकेवर परिणाम झाल्याने सरासरी २० रुपयांनी भाज्यांचे दर वाढले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद असल्याने किराणा मालासह फळांनाही अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुढीपाडव्याला आंब्याला असणारी मागणी लक्षात घेता, आंब्याची आवक किंचित वाढली आहे.

सध्या शहरात वाहनांमधूनच भाज्यांची विक्री हाेत आहे, तर फळविक्रेते रस्त्यावर असले तरी, नागरिकच बाहेर नसल्याने विक्रीवर परिणाम झाल्याने फळेही वाहनांतून विक्री केली जात आहेत. तरीही अपेक्षित ग्राहक नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या आठवड्यात किराणा मालाचे दर स्थिर आहेत. पण आवकेवर परिणाम झाल्याने पुढील काही दिवसात दर वाढण्याची शक्यता आहे.

चौकट

भाज्या महागल्या

आठवडा बाजार बंद, त्यात कडक निर्बंध यामुळे सध्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामस्वरूप दरही वाढले आहेत. वांगी, दोडका, गवारीचे दर ६० ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत, तर पालेभाज्या १५ रुपयांवर पोहोचल्या आहेत.

चौकट

फळांना मागणी कमी

बाजार बंद असल्याने फळ विक्रेत्यांना ग्राहक कमी आहेत. या आठवड्यात कलिंगड, टरबुजाची आवक चांगली होती. मात्र, विक्रेत्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही वाहनातून फळविक्री करण्यात येत आहे.

चौकट

किराणाचे दर स्थिर

नवीन गहू, तांदळासह इतर शेतीमाल सध्या बाजारात येत असला तरी, निर्बंधामुळे आवकेवर परिणाम झाला आहे. गव्हाचे दर काहीसे उतरले असले तरी, जुन्या गव्हाचे दर वाढलेलेच आहेत. अत्यावश्यक सेवेत किराणा दुकानदार असले तरी, या आठवड्यात अपेक्षित व्यवसाय झाला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोट

कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधामुळे सध्या व्यवसायावरच परिणाम झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात किराणा मालाचे दर स्थिर असून खाद्यतेलाची आवक मात्र, अपेक्षेपेक्षा कमी होत आहे.

- बापू सोनुरे, व्यापारी

कोट

लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाला मिळत नाही. तसेच इतर कारणांसाठीही बाहेर पडता येत नाही. त्यामुळे मिळत असलेले साहित्य जादा दराने मिळत आहे.

- पूजा जाधव, गृहिणी

कोट

या आठवड्यात आंब्याची आवक वाढत आहे. मात्र, विक्रीसाठी ठेवूनही ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही. आता गुढीपाडव्याला का होईना, ग्राहक मिळतील, अशी अपेक्षा आहे.

- रामचंद्र बने, फळविक्रेते