शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

जिल्ह्यात ४७८ दिवसांपासून कोरोनाचे ठाण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात ४७८ दिवसांपासून कोरोनाचे ठाण कायम आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात ४७८ दिवसांपासून कोरोनाचे ठाण कायम आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडला. आतापर्यंत एक लाख ५९ हजार १६९ पेक्षा अधिकजण बाधित झाले, तर ४,३०२ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाला उतार लागला असताना, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या मात्र चिंता वाढविणारी आहे.

गेल्यावर्षी २३ मार्चला जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण इस्लामपूर येथे आढळला. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत गेली. गेल्यावर्षी शिराळा तालुक्यातील मणदूर, जत तालुक्यातील बिळूर ही गावे ‘हॉटस्पॉट’ ठरली होती. दुसऱ्या लाटेत वाळवा तालुका ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. मागील वर्षी १९ एप्रिलला विजयनगर (सांगली) येथे पहिला कोरोना मृत्यू नोंदला गेला. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत कोरोनास्थिती आटोक्यात होती, त्यानंतर पुन्हा रुग्ण वाढू लागले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक म्हणजे १२७९ रुग्णांची नोंद झाली होती, तर १७ सप्टेंबर २०२०रोजी ३२ मृत्यू झाले होते. ते पहिल्या लाटेतील सर्वाधिक मृत्यू होते. दुसऱ्या लाटेत ६ मे २०२१रोजी सर्वाधिक २३२८ रुग्ण आढळून आले, तर त्याच दिवशी सर्वाधिक ५८ मृत्यूंची नोंद झाली.

पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. दुसऱ्या लाटेत मात्र, गावपातळीवरही कोविड सेंटरच्या माध्यमातून उपचाराची सोय झाल्याने रुग्णांचे हाल थांबले.

जिल्ह्यात सध्या सरासरी नऊशे ते हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत, तर सरासरी २० मृत्यूची नोंद होत आहे.

सध्या लागू करण्यात आलेल्या निर्बंधांना कोणीही जुमानत नसल्याचे चित्र असून, त्यामुळेच बाधितांची संख्या अद्याप कायम आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांवर स्थिर आहे.

चौकट

जिल्ह्याला उपलब्ध झालेले एकूण डोस : ८,८९६३० कोविशिल्ड, ९०,५४० कोव्हॅक्सिन, एकूण ९,८०,१७०

पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या : ७,३८,९९५ (२४.०६ टक्के)

दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या : २,१२,८०१ (६.९२ टक्के)

चौकट

जिल्ह्यातील सद्यस्थिती

जिल्ह्यातील एकूण बाधित १,५९,१६९

कोरोनामुक्त झालेले १,४४,७६२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४,३०२

चौकट

पहिल्या लाटेतील वयानुसार कोरोना मृत्यू

२० ते ४० : ६८

४० ते ४९ : २०९

५० ते ५९ : ३५५

६० ते ६९ : ५२९

७० ते ७९ : ४३८

८० ते ८९ : १५२

९० वर्षांपुढील : ३३

चौकट

दुसऱ्या लाटेतील वयोगटानुसार एकूण मृत्यू

वय मृत्यूसंख्या

२० ते ४० : १७३

४० ते ४९ : २५२

५० ते ५९ : ४१४

६० ते ६९ : ५७८

७० ते ७९ : ४४२

८० ते ८९ : १८२

९० पुढील : २१

कोट

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग अद्याप कायम आहे. नागरिकांनी मास्कच्या वापरासह गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. संसर्ग होईल, अशा ठिकाणांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत, तरीही नागरिकांनीही स्वत:हून काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे.

डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

काेट

कोरोना रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता, मास्कचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळण्यासह नागरिकांनी स्वत: खबरदारी घ्यावी. विनाकारण बाहेर फिरल्यामुळेही संसर्ग वाढत असल्याचे आढळले आहे. कोरोना अद्याप संपला नाही, हे सर्वांनी ध्यानात घेऊन आपली काळजी घेतल्यास संसर्ग टळणार आहे.

- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक