शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्ह्यात ४११ जणांना कोरोना; चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम असून शनिवारी पुन्हा एकदा सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ४११ जणांना कोरोनाचे निदान ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम असून शनिवारी पुन्हा एकदा सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ४११ जणांना कोरोनाचे निदान होतानाच चारजणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात तब्बल १५८ नवे रुग्ण आढळले आहेत.

पाच महिन्यातील सर्वाधिक बाधितांची संख्या शनिवारी नोंदली गेली असल्याने कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. कडेगाव, मिरज, वाळवा आणि तासगाव तालुक्यातील चारजणांचा मृत्यू झाला आहे. २२७ जण कोरोनामुक्त झाले असलेतरी रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी ठरत आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआर अंतर्गत १९९० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात १५९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १५६८ जणांच्या तपासणीतून २७९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढवले असतानाच पॉझिटिव्हचेही प्रमाण वाढत आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ५१७ जण अत्यवस्थ असून त्यातील ४७२ जण ऑक्सिजनवर तर ४५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर ५, कोल्हापूर १०, सातारा ७, कर्नाटक ३ आणि पुणे, रत्नागिरी येथील प्रत्येकी एकास कोरोनाचे निदान झाले आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ५५०६७

उपचार घेत असलेले ३५६५

कोरोनामुक्त झालेले ४९६६१

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८४१

शनिवारी दिवसभरात

सांगली १११

मिरज ४७

वाळवा ६१

खानापूर ३४

मिरज तालुका २८

जत २७

पलूस २५

तासगाव २०

कडेगाव १८

आटपाडी १६

कवठेमहांकाळ, शिराळा प्रत्येकी १२