जिल्ह्यात २०४६ जणांना कोरोना; ५८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:28 AM2021-05-08T04:28:11+5:302021-05-08T04:28:11+5:30

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी २०४६ जणांना कोराेनाचे निदान झाले. परजिल्ह्यातील १३ जणांसह जिल्ह्यातील ४५ जणांचा मृत्यू झाला, तर ११६९ ...

Corona to 2046 people in the district; 58 killed | जिल्ह्यात २०४६ जणांना कोरोना; ५८ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात २०४६ जणांना कोरोना; ५८ जणांचा मृत्यू

Next

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी २०४६ जणांना कोराेनाचे निदान झाले. परजिल्ह्यातील १३ जणांसह जिल्ह्यातील ४५ जणांचा मृत्यू झाला, तर ११६९ जण कोरोनामुक्त झाले. मात्र रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आटपाडी, जत, खानापूर, मिरज, वाळवा तालुक्यांत दोनशेवर रुग्ण सापडत आहेत. शुक्रवारी ४५ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली ३, मिरज ६, तासगाव तालुक्यांत ७, जत ६, वाळवा ५, कडेगाव, पलूस आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी ४, शिराळा २, खानापूर, आटपाडी प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २९८० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ११२९ जण बाधित आढळले तर रॅपिड अँटिजनच्या ३८३६ जणांच्या तपासणीतून १००८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६ हजार ७३४ झाली असून त्यातील २५८७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २३३९ जण ऑक्सिजनवर तर २३८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील ९१ नवे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातील सर्वाधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ८७६९३

उपचार घेत असलेले १६७३४

कोरोनामुक्त झालेले ६८४०३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २५५६

शुक्रवारी दिवसभरात

सांगली शहर १५६

मिरज शहर १४१

मिरज तालुका २८६

वाळवा २८०

जत २६५

खानापूर २२७

आटपाडी २१८

तासगाव १३६

कवठेमहांकाळ ९२

पलूस ९१

कडेगाव ८९

शिराळा ६५

Web Title: Corona to 2046 people in the district; 58 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.