शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

कोयना-अलमट्टीत पाण्याबाबत समन्वय ठेवा--जिल्हाधिकाºयांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:18 AM

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सध्याचा पावसाचा जोर पाहता, सांगली जिल्ह्यात २००५ प्रमाणे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अधिकाºयांनी सतर्क रहावे, तसेच सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण व अलमट्टी धरणाच्या अधिकाºयांशी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी गुरुवारी दिल्या.अलमट्टी धरणाची पाणी पातळी नियंत्रणाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या अधिकाºयांची आंतरराज्यीय ...

ठळक मुद्दे : सांगलीत आंतरराज्य पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची बैठकही पूरस्थिती आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रमाण मानून फ्लड लाईन सर्वेक्षण करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सध्याचा पावसाचा जोर पाहता, सांगली जिल्ह्यात २००५ प्रमाणे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अधिकाºयांनी सतर्क रहावे, तसेच सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण व अलमट्टी धरणाच्या अधिकाºयांशी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी गुरुवारी दिल्या.

अलमट्टी धरणाची पाणी पातळी नियंत्रणाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या अधिकाºयांची आंतरराज्यीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार संजयकाका पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञा. आ. बागडे, अलमट्टी धरणाचे कार्यकारी अभियंता एम. एस. इनामदार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रावण उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, सांगलीत २००५ मध्ये आलेला पूर हा १०० वर्षांतून एकदा आलेला पूर होता. त्यामुळे ही पूरस्थिती आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रमाण मानून फ्लड लाईन सर्वेक्षण करण्यात आले आहे. कोयना ते सांगली हे अंतर १७५ किलोमीटर आहे. कोयना धरणातून २५००० क्युसेक वेगाने पाणी सोडले, तर ते सांगलीत पोहोचण्यास २७ तास लागतात. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी कोयना व अलमट्टी धरणाच्या अधिकाºयांशी दैनंदिन समन्वय व सुसंवाद ठेवून पाणी पातळी धोकापातळीच्या वर जाऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी व आवश्यक नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी १३ आॅक्टोबरला होणाºया राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनाच्या नियोजनाबाबतही चर्चा झाली.बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह अलमट्टी व कोयना धरणाचे अधिकारी, सांगलीचे जिल्हा परिषद बांधकाम विभाग, छोटे पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, महावितरण, परिवहन विभाग, तसेच वन विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.दोन्ही राज्यांतील अधिकारी रोज संपर्कातअधीक्षक अभियंता हणमंत गुणाले म्हणाले, सांगली पाटबंधारे विभागाकडून खबरदारीची उपाययोजना म्हणून कोयना व अलमट्टी धरणाच्या अधिकाºयांकडून दररोज पाऊस, धरणाची पाणीपातळी, पाण्याचा करण्यात येणारा विसर्ग, धोकापातळी यांची माहिती घेतली जाते. सर्व धरणांची ही माहिती एकत्रितरित्या घेतली जाते. या विभागाने कृष्णा खोºयासाठी पूरस्थिती नकाशा तयार केला आहे. धरणे भरली तर पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून परस्परांच्या संपर्कात आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी अलमट्टी धरण व कोयना धरणाच्या अधिकाºयांनी धरणाची क्षमता, सद्यस्थितीतील पाणीपातळी, धोकापातळी यांची माहिती दिली.