शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बिगरशेती आढावा बैठकीत वादंग

By admin | Updated: December 9, 2014 23:27 IST

२७ प्रकरणे निकाली : अनावश्यक ‘एनओसी’च्या मागणीची तक्रार

सांगली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज (मंगळवार) झालेल्या बिगरशेती आढावा बैठकीत वादंग झाले. अनावश्यक ‘ना हरकत’ दाखले व कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक व बिगरशेतीसाठी प्रस्ताव दाखल केलेल्यांनी केला. दरम्यान, आज समितीपुढे ठेवण्यात आलेल्या ५५ पैकी २७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीला जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रवीण साळुंखे, महसूल विभागाचे तहसीलदार देवदत्त ठोमरे, महापालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, टी. पी. साळवी आदी उपस्थित होते. आजच्या आढावा बैठकीत समितीपुढे बिगरशेतीचे रखडलेले ५५ प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक प्रस्तावाचे वाचन करण्यात आले. रखडलेल्या प्रस्तावांमध्ये कोणत्या ना कोणत्या ‘ना हरकत’ दाखल्याची गरज असल्याचे सांगण्यात येत होते. बिगरशेतीसाठी सोळाहून अधिक ना हरकत दाखले जोडावे लागतात. यामधील अनेक दाखले अनावश्यक असल्याची तक्रार नागरिकांनी केली. सार्वजनिक बांधकाम, वीज मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र लवकर दिले जात नाही. केवळ कागदपत्रांच्या आधारावर दाखले देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. दाखला कोणाचा व कोणता, याबाबतही पुरेशी माहिती दिली जात नसल्याच्याही तक्रारी यावेळी करण्यात आल्या.महापालिकेच्या विकास आराखड्याचा नकाशा सर्व विभागांना देण्यात यावा, असे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी बेलदार यांनी दिले. आजच्या बैठकीत ५५ पैकी २७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. हे प्रस्ताव आता महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पाच प्रकरणांबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. उर्वरित प्रकरणांबाबत आवश्यक दाखले जोडण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. यावेळी कमाल जमीन धारणा कायदा विभाग, बांधकाम, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शुक्रवारी गुंठेवारी आढावा बैठकगुंठेवारी नियमितीकरणाबाबत रखडलेल्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. गुंठेवारी नियमितीकरणाबाबत शासनाचे स्पष्ट आदेश नसल्याची चर्चा असून, शुक्रवारी होणाऱ्या या बैठकीकडे गुंठेवारी भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. गुंठेवारीची सुमारे २० हजार प्रकरणे प्रलंबित आहेत.बिगरशेती प्रकरणांना मंजुरी मिळत नाही, अशा तक्रारी नागरिकांनी आ. सुधीर गाडगीळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या होत्या. गाडगीळ यांनी मंत्र्यांकडे निवेदन सादर करून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली होती. त्यानुसार नुकतेच शासनाकडून जिल्हा प्रशासनाला बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आदेश आले होते.