शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सांगली जिल्ह्यात ऊसतोडी बंदला संमिश्र प्रतिसाद : पोलिसांचे कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:41 IST

सांगली : मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ, शिराळा, पलूस तालुक्यातील ऊसतोडी स्वाभिमानी शेतकरी संघटना व रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ...

ठळक मुद्दे मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ तालुक्यातील तोडी रोखल्या मिरज पूर्व भागातही कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांनी ऊसतोडी सुरु केल्या होत्या

सांगली : मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ, शिराळा, पलूस तालुक्यातील ऊसतोडी स्वाभिमानी शेतकरी संघटना व रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद पाडल्या.

गांधीगिरीनेही कारखानदार तोडी बंद ठेवत नसल्यामुळे, आक्रमक झालेल्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मजुरांना उसाच्या फडातून हाकलून लावले. दरम्यान, संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष असून आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

ऊस दराचा तोडगा निघत नाही तोपर्यंत कारखानदारांनी गळीत हंगाम चालू करु नयेत, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे. मात्र याविरोधातील भूमिका शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटनेने घेतली आहे. संघटनांतील फुटीचा फायदा साखर कारखानदारांनी उठवत गळीत हंगाम सुरु केले आहेत. गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटना, शेतकरी सेना यांनी जिल्ह्यातील ऊसतोडी बंद पाडल्या होत्या. गुरुवारी बहुतांशी संघटनांनी मजुरांना गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी मार्गाने ऊसतोडी बंद ठेवण्यासाठी विनंती केली होती.

संघटनांच्या या विनंतीला काही कारखान्यांनी प्रतिसाद देत गाळप बंद ठेवले असले तरी, बहुतांशी कारखान्यांनी शुक्रवारी गळीत हंगाम चालूच ठेवला होता. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात अनेक ठिकाणी ऊसतोडी बंद पाडल्या.

रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव येथील अथणी शुगर, दत्त इंडिया कारखान्याच्या ऊसतोडी बंद पाडून मजुरांना उसाच्या फडातून हाकलून लावले. कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग, हिंगणगाव, हरोली येथीलही दत्त इंडिया कारखान्याच्या ऊसतोडी बंद पाडल्या. मिरज पूर्व भागातही कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांनी ऊसतोडी सुरु केल्या होत्या. पण, तेथील तोडीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडल्या.

शेतकºयांची ऊस तोडण्यास सहमती असेल तर संघटनांनी ऊसतोडी बंद पाडू नयेत, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. यामुळे पोलिसांनी ऊसतोडी रोखणाºया संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या भूमिकेवर संघटनांच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.तोडगा निघेपर्यंत तोडी घेऊ नयेत : मानेशेतकºयांच्या हितासाठी आम्ही आंदोलने करत आहे. पोलीस संघटनांचे आंदोलन मोडीत काढण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे ऊस दराचा तोडगा निघेपर्यंत शेतकºयांनीच कारखान्यांना ऊस घालू नये, असे आवाहन रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक माने यांनी केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगलीFarmer strikeशेतकरी संप