शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

सांगलीत महापालिका निवडणुकीचे कॉंग्रेसकडून रणशिंग, भाजपच्या पायाखालची वाळू घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:29 IST

भाजपचे आता सर्वच ठिकाणी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांचे नेते आता भेटवस्तू वाटपाची भाषा करू लागले आहेत, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.

ठळक मुद्देसांगलीत महापालिका निवडणुकीचे कॉंग्रेसकडून रणशिंगभाजपच्या पायाखालची वाळू घसरली

सांगली : भाजपचे आता सर्वच ठिकाणी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांचे नेते आता भेटवस्तू वाटपाची भाषा करू लागले आहेत, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले. येथील प्रभाग क्र. ३७ मध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या व जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यानिमित्ताने त्यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर हारुण शिकलगार, स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, डॉ. जितेश कदम, गुंठेवारी समिती सभापती शालन चव्हाण, नगरसेवक राजेश नाईक, दिलीप पाटील, पुष्पलता पाटील, रोहिणी पाटील, अश्विनी खंडागळे, बाळासाहेब गोंधळे, युवा नेते मयूर पाटील, अजित सूर्यवंशी, इचलकरंजीचे नगरसेवक रवींद्र माने, संजय तेलनाडे, जयसिंगपूरचे बजरंग खामकर, प्रकाश झेले, सतीश सारडा, सावकार शिराळे, आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. कदम म्हणाले, भाजपने भूलथापा देऊन राज्यात व केंद्रात सत्ता मिळविली होती; परंतु गेल्या तीन-चार वर्षांत एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. उलट जातीयवाद, धर्मवादाद्वारे भाजपने देशाचे वाटोळेच केले आहे. त्यामुळे जनतेने त्यांचा हिशोब करून गुजरात, नांदेड, राजस्थानच्या निवडणुकांमध्ये हिसका दाखविला आहे.

आता सांगली महापालिका निवडणुकीच्यादृष्टीनेही अशाच पद्धतीने आयात कार्यकर्त्यांवर सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. जनतेला भेटवस्तूंसह खोटी आश्वासने देऊन समोर येत आहेत; परंतु काँगे्रेसने पाच वर्षांत शहरात विकासकामांद्वारे आश्वासन पाळले आहे. सध्या विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आगामी महापालिका निवडणूक ही त्याची सुरुवात असेल.श्रीमती पाटील यांचा कदम यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे नेते दिवंगत मदन पाटील यांनी दिलेल्या संकल्प नाम्यातील ९0 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण केली आहेत. प्रभाग ३७ मध्येच तीन कोटी रुपयांची विकास कामे होत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेसलाच नागरिकांनी सत्ता द्यावी, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले.पृथ्वीराज पाटील म्हणाले, काँग्रेस विकासकामांतून बोलते. विचार आणि कामांच्या जोरावरच निवडणुकीला समोर जाते; पण जनतेचा भ्रमनिरास करणारा जातीयवादी भाजप खुलेआम भेटवस्तू आणि फोडाफोडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची स्वप्ने पाहत आहे. कार्यक्रमाचे संयोजन विजय आवळे, शिरीष सूर्यवंशी, शुभम बनसोडे, प्रीतम रेवणकर, आकाश चोरमले, डॉ. चेतन पाटील, समीर साखरे, विनायक पाटील आदींनी केले.हवा फक्त कॉंग्रेसची!शिकलगार म्हणाले, काँग्रेसने मनपाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. उलट भाजपच्या थापेबाजांची हवा संपली आहे. यापुढे विकासाच्या जोरावर फक्त काँग्रेसचीच हवा राहील.

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका