शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सांगलीत महापालिका निवडणुकीचे कॉंग्रेसकडून रणशिंग, भाजपच्या पायाखालची वाळू घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:29 IST

भाजपचे आता सर्वच ठिकाणी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांचे नेते आता भेटवस्तू वाटपाची भाषा करू लागले आहेत, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.

ठळक मुद्देसांगलीत महापालिका निवडणुकीचे कॉंग्रेसकडून रणशिंगभाजपच्या पायाखालची वाळू घसरली

सांगली : भाजपचे आता सर्वच ठिकाणी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांचे नेते आता भेटवस्तू वाटपाची भाषा करू लागले आहेत, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले. येथील प्रभाग क्र. ३७ मध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या व जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यानिमित्ताने त्यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर हारुण शिकलगार, स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, डॉ. जितेश कदम, गुंठेवारी समिती सभापती शालन चव्हाण, नगरसेवक राजेश नाईक, दिलीप पाटील, पुष्पलता पाटील, रोहिणी पाटील, अश्विनी खंडागळे, बाळासाहेब गोंधळे, युवा नेते मयूर पाटील, अजित सूर्यवंशी, इचलकरंजीचे नगरसेवक रवींद्र माने, संजय तेलनाडे, जयसिंगपूरचे बजरंग खामकर, प्रकाश झेले, सतीश सारडा, सावकार शिराळे, आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. कदम म्हणाले, भाजपने भूलथापा देऊन राज्यात व केंद्रात सत्ता मिळविली होती; परंतु गेल्या तीन-चार वर्षांत एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. उलट जातीयवाद, धर्मवादाद्वारे भाजपने देशाचे वाटोळेच केले आहे. त्यामुळे जनतेने त्यांचा हिशोब करून गुजरात, नांदेड, राजस्थानच्या निवडणुकांमध्ये हिसका दाखविला आहे.

आता सांगली महापालिका निवडणुकीच्यादृष्टीनेही अशाच पद्धतीने आयात कार्यकर्त्यांवर सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. जनतेला भेटवस्तूंसह खोटी आश्वासने देऊन समोर येत आहेत; परंतु काँगे्रेसने पाच वर्षांत शहरात विकासकामांद्वारे आश्वासन पाळले आहे. सध्या विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आगामी महापालिका निवडणूक ही त्याची सुरुवात असेल.श्रीमती पाटील यांचा कदम यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे नेते दिवंगत मदन पाटील यांनी दिलेल्या संकल्प नाम्यातील ९0 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण केली आहेत. प्रभाग ३७ मध्येच तीन कोटी रुपयांची विकास कामे होत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेसलाच नागरिकांनी सत्ता द्यावी, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले.पृथ्वीराज पाटील म्हणाले, काँग्रेस विकासकामांतून बोलते. विचार आणि कामांच्या जोरावरच निवडणुकीला समोर जाते; पण जनतेचा भ्रमनिरास करणारा जातीयवादी भाजप खुलेआम भेटवस्तू आणि फोडाफोडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची स्वप्ने पाहत आहे. कार्यक्रमाचे संयोजन विजय आवळे, शिरीष सूर्यवंशी, शुभम बनसोडे, प्रीतम रेवणकर, आकाश चोरमले, डॉ. चेतन पाटील, समीर साखरे, विनायक पाटील आदींनी केले.हवा फक्त कॉंग्रेसची!शिकलगार म्हणाले, काँग्रेसने मनपाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. उलट भाजपच्या थापेबाजांची हवा संपली आहे. यापुढे विकासाच्या जोरावर फक्त काँग्रेसचीच हवा राहील.

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका