शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

सांगलीत महापालिका निवडणुकीचे कॉंग्रेसकडून रणशिंग, भाजपच्या पायाखालची वाळू घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:29 IST

भाजपचे आता सर्वच ठिकाणी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांचे नेते आता भेटवस्तू वाटपाची भाषा करू लागले आहेत, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.

ठळक मुद्देसांगलीत महापालिका निवडणुकीचे कॉंग्रेसकडून रणशिंगभाजपच्या पायाखालची वाळू घसरली

सांगली : भाजपचे आता सर्वच ठिकाणी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. पायाखालची वाळू घसरल्यामुळेच त्यांचे नेते आता भेटवस्तू वाटपाची भाषा करू लागले आहेत, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले. येथील प्रभाग क्र. ३७ मध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या व जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यानिमित्ताने त्यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर हारुण शिकलगार, स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, डॉ. जितेश कदम, गुंठेवारी समिती सभापती शालन चव्हाण, नगरसेवक राजेश नाईक, दिलीप पाटील, पुष्पलता पाटील, रोहिणी पाटील, अश्विनी खंडागळे, बाळासाहेब गोंधळे, युवा नेते मयूर पाटील, अजित सूर्यवंशी, इचलकरंजीचे नगरसेवक रवींद्र माने, संजय तेलनाडे, जयसिंगपूरचे बजरंग खामकर, प्रकाश झेले, सतीश सारडा, सावकार शिराळे, आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. कदम म्हणाले, भाजपने भूलथापा देऊन राज्यात व केंद्रात सत्ता मिळविली होती; परंतु गेल्या तीन-चार वर्षांत एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. उलट जातीयवाद, धर्मवादाद्वारे भाजपने देशाचे वाटोळेच केले आहे. त्यामुळे जनतेने त्यांचा हिशोब करून गुजरात, नांदेड, राजस्थानच्या निवडणुकांमध्ये हिसका दाखविला आहे.

आता सांगली महापालिका निवडणुकीच्यादृष्टीनेही अशाच पद्धतीने आयात कार्यकर्त्यांवर सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. जनतेला भेटवस्तूंसह खोटी आश्वासने देऊन समोर येत आहेत; परंतु काँगे्रेसने पाच वर्षांत शहरात विकासकामांद्वारे आश्वासन पाळले आहे. सध्या विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आगामी महापालिका निवडणूक ही त्याची सुरुवात असेल.श्रीमती पाटील यांचा कदम यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे नेते दिवंगत मदन पाटील यांनी दिलेल्या संकल्प नाम्यातील ९0 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण केली आहेत. प्रभाग ३७ मध्येच तीन कोटी रुपयांची विकास कामे होत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेसलाच नागरिकांनी सत्ता द्यावी, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले.पृथ्वीराज पाटील म्हणाले, काँग्रेस विकासकामांतून बोलते. विचार आणि कामांच्या जोरावरच निवडणुकीला समोर जाते; पण जनतेचा भ्रमनिरास करणारा जातीयवादी भाजप खुलेआम भेटवस्तू आणि फोडाफोडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची स्वप्ने पाहत आहे. कार्यक्रमाचे संयोजन विजय आवळे, शिरीष सूर्यवंशी, शुभम बनसोडे, प्रीतम रेवणकर, आकाश चोरमले, डॉ. चेतन पाटील, समीर साखरे, विनायक पाटील आदींनी केले.हवा फक्त कॉंग्रेसची!शिकलगार म्हणाले, काँग्रेसने मनपाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. उलट भाजपच्या थापेबाजांची हवा संपली आहे. यापुढे विकासाच्या जोरावर फक्त काँग्रेसचीच हवा राहील.

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका