शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून राज्याच्या तिजोरीवर दरोडा : पूनम महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 23:18 IST

सांगली : पंधरा वर्षे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या काँग्रेस व राष्ट्रवादीकडे होत्या. मॅनेजर असलेल्या मतदारांनाही चाव्या दिलेल्या नाहीत. तिजोरीवर दरोडा टाकून जनतेची स्वप्न लुटली,

ठळक मुद्देसांगलीत भाजप युवा मोर्चा संवाद परिषद, कुणाशीही मधुचंद्र होऊ दे, राजकारणाच्या चिखलात कमळ उगविणारच

सांगली : पंधरा वर्षे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या काँग्रेस व राष्ट्रवादीकडे होत्या. मॅनेजर असलेल्या मतदारांनाही चाव्या दिलेल्या नाहीत. तिजोरीवर दरोडा टाकून जनतेची स्वप्न लुटली, असा घणाघात भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनम महाजन यांनी गुरुवारी सांगलीत केला.

भाजप युवा मोर्चाच्यावतीने आयोजित संवाद परिषदेत त्या बोलत होत्या. केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात राज्यात विरोधकांकडून सभा, यात्रा काढल्या जात आहेत; पण आम्ही कामातून सत्तेवर आलो आहोत. विरोधकांनी थोडं दमाने घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगाविला.

महाजन म्हणाल्या की, आज राज्यात कुणाचा कुणाशाही मधुचंद्र सुरू आहे. इंजिन घडाळ्याकडे चालले आहे. कुणी हात दाखवित आहे. कुणाकडे धनुष्यबाण चालले आहे. या राजकारणाच्या चिखलात भाजपचे कमळ जोरात उमललेले असेल, असे भाष्यही केले. दरोडे घालणाºयांकडून काय अपेक्षा ठेवायच्या? असा सवालही केला.

दादा, ताई, भाऊ यावर भाजप चालत नाही. कार्यकर्त्यांच्या कामावर पक्ष चालतो. म्हणून चहावाला देशाचे पंतप्रधान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्रातून लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होत आहे. कौशल्य विकास कार्यक्रमातून ३० लाख युवकांना नोकरी देणार आहोत. उलट विरोधकांनी जातीपातीचे राजकारण सुरू केले आहे. बँक घोटाळ्याचे आरोप करणाºयांचे २००४ पासून घोटाळे उघड झाले तर पळताभुई थोडी होईल. पकोडा विकणे चुकीचे नाही. तुम्ही सारेच पकोडा खाता का इटलीचा पिझ्झा? असे म्हणत काँग्रेसला टोला लगाविला.

प्रारंभी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. यावेळी खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. योगेश टिळेकर, पृथ्वीराज देशमुख यांची भाषणे झाली. कार्यक्रमास आ. सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, संग्रामसिंह देशमुख, भगवानराव साळुंखे, शेखर इनामदार, दिनकरतात्या पाटील उपस्थित होते.संजयकाकांचे कौतुक, महापौरांना टोलाखा. संजयकाका पाटील यांच्या कामाचे पूनम महाजन यांनी कौतुक केले. कोट्यवधींचा निधी आणणारा खासदार असा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सांगलीच्या प्रश्नांवर संजयकाकांशी चर्चा करतात, असे सांगितले.भाजपच्या आमदारांनी रस्त्यासाठी ६० कोटीचा निधी आणला. येथील महापौरांनी काहीच केले नाही. त्यांच्या मनातच खड्डे आहेत, असा टोला महाजन यांनी लगाविला,

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगली