शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

काँग्रेस-राष्ट्रवादी युती होईल : पतंगराव कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 15:22 IST

केंद्र आणि राज्यस्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतचा निर्णय होईल. जिल्हास्तरावरही आघाडी शक्य आहे. सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देआता हवा बदलली; लवकरच निर्णयआगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा डेंग्यूबाबत तातडीने उपाययोजना करा

कडेगाव : केंद्र आणि राज्यस्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतचा निर्णय होईल. जिल्हास्तरावरही आघाडी शक्य आहे. सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आमदार डॉ. पतंगराव कदम म्हणाले, काँग्रेस हा तळागाळापर्यंत रुजलेला पक्ष आहे. अनेक जय-पराजय काँग्रेस पक्षाने पचवले आहेत. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाट होती. मात्र आता हवा बदलली आहे. या सरकारचा कारभार जनतेने अनुभवला आहे. त्यामुळे पूर्वीचे दिवसच चांगले होते, अशी लोकांची भावना झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता आली आहे. कडेगाव पलूस तालुक्यातही काँग्रेसने घवघवीत यश मिळविले आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना जादा अधिकार दिले आहेत.

विकास कामांसाठी आता थेट ग्रामपंचायतीकडे निधी येत आहे. त्यामुळे सरपंचांना प्रभावीपणे काम करण्याची संधी आहे. नवीन सरपंचांना कामकाजाची माहिती मिळावी, यासाठी विशेष कार्यशाळा घेणार आहे.

राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली, पण कार्यवाहीस विलंब होत आहे. कर्जमाफीला जाचक निकष लावल्याने कित्येक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत, असेही कदम यांनी सांगितले. आता जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होत आहेत. या गळीत हंगामातही सोनहिरा कारखाना ऊस दरात अग्रेसर राहील, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

डेंग्यूबाबत तातडीने उपाययोजना कराकडेगाव शहरात डेंग्यूचे ३ रुग्ण आढळून आले आहेत. याची दखल घेऊन शहरात तातडीने उपाययोजना करा, अशा सूचना कदम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे तसेच नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांना दिल्या.

...आता कारभाराकडे लक्षनूतन सरपंच आणि सदस्यांनी पारदर्शक, सक्षम व प्रभावीपणे कारभार करावा. अडचणी आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. गावोगावी प्रचंड विकास कामे झाली आहेत. तरीही राहिलेल्या उणिवा भरून काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष ठेवणार आहे, असेही कदम म्हणाले.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमSangliसांगली