शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

काँग्रेस-राष्ट्रवादी युती होईल : पतंगराव कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 15:22 IST

केंद्र आणि राज्यस्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतचा निर्णय होईल. जिल्हास्तरावरही आघाडी शक्य आहे. सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देआता हवा बदलली; लवकरच निर्णयआगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा डेंग्यूबाबत तातडीने उपाययोजना करा

कडेगाव : केंद्र आणि राज्यस्तरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतचा निर्णय होईल. जिल्हास्तरावरही आघाडी शक्य आहे. सांगली महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आमदार डॉ. पतंगराव कदम म्हणाले, काँग्रेस हा तळागाळापर्यंत रुजलेला पक्ष आहे. अनेक जय-पराजय काँग्रेस पक्षाने पचवले आहेत. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाट होती. मात्र आता हवा बदलली आहे. या सरकारचा कारभार जनतेने अनुभवला आहे. त्यामुळे पूर्वीचे दिवसच चांगले होते, अशी लोकांची भावना झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता आली आहे. कडेगाव पलूस तालुक्यातही काँग्रेसने घवघवीत यश मिळविले आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांना जादा अधिकार दिले आहेत.

विकास कामांसाठी आता थेट ग्रामपंचायतीकडे निधी येत आहे. त्यामुळे सरपंचांना प्रभावीपणे काम करण्याची संधी आहे. नवीन सरपंचांना कामकाजाची माहिती मिळावी, यासाठी विशेष कार्यशाळा घेणार आहे.

राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली, पण कार्यवाहीस विलंब होत आहे. कर्जमाफीला जाचक निकष लावल्याने कित्येक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत, असेही कदम यांनी सांगितले. आता जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होत आहेत. या गळीत हंगामातही सोनहिरा कारखाना ऊस दरात अग्रेसर राहील, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

डेंग्यूबाबत तातडीने उपाययोजना कराकडेगाव शहरात डेंग्यूचे ३ रुग्ण आढळून आले आहेत. याची दखल घेऊन शहरात तातडीने उपाययोजना करा, अशा सूचना कदम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे तसेच नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांना दिल्या.

...आता कारभाराकडे लक्षनूतन सरपंच आणि सदस्यांनी पारदर्शक, सक्षम व प्रभावीपणे कारभार करावा. अडचणी आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. गावोगावी प्रचंड विकास कामे झाली आहेत. तरीही राहिलेल्या उणिवा भरून काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष ठेवणार आहे, असेही कदम म्हणाले.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमSangliसांगली