शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

अंकलखोपमध्ये काँग्रेस उमेदवारीसाठी उड्या!

By admin | Updated: January 6, 2017 23:14 IST

खुला मतदारसंघ : भाजप, राष्ट्रवादीच्या गटात अद्याप ‘शांती ही शांती’; पाच वर्षांत अनेक बदल

राजेंद्र खामकर ल्ल अंकलखोपपलूस तालुक्यातील अंकलखोप जिल्हा परिषद गट खुला झाल्याने कॉँग्रेसमधून अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे कॉँग्रेस नेते पेचात पडले आहेत. इच्छुकांनी पक्षाकडे शुल्क भरून अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे भाजप व राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या कमी असून, पक्ष ज्याला तिकीट देईल, त्याच्यामागे शक्ती उभी करण्याचा मनोदय उमेदवारांनी व्यक्त केला आहे.कॉँग्रेस पक्षाकडे तब्बल १२ ते १३ उमेदवारांनी मागणी नोंदवली असून त्यामध्ये माजी ल्हिा परिषद सदस्य दादासाहेब सूर्यवंशी, सतीश पाटील, हणमंत पाटील, अजित शिरगावकर, विशाल सूर्यवंशी, उदयसिंह सूर्यवंशी, प्रल्हाद पाटील, ए. के. चौगुले, सुधीर चौगुले, धैर्यशील पाटील, अरविंद सूर्यवंशी, संतगावचे अरुण सावंत, धनगावचे सतपाल साळुंखे यांचा समावेश आहे. भाजपमधून राजकुमार पाटील, नितीन नवले, सुरेंद्र चौगुले, नागठाणेचे विजय पाटील, बुर्लीचे प्रमोद मिठारी, धनगावचे दीपक भोसले यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीमधून अंकलखोपचे उमेश जोशी, विकास पाटील, आमणापूरचे पोपट फडतरे यांच्यावर पक्षाची मदार आहे. २०१२ च्या निवडणुकीत अंकलखोप गट स्त्री राखीव होता. यामध्ये राष्ट्रवादी व कॉँग्रेस अशी लढत होऊन कॉँग्रेसच्या शीलाताई सूर्यवंशी यांनी राष्ट्रवादीच्या सुमन सूर्यवंशी यांचा केवळ शंभर मतांनी पराभव केला होता. राष्ट्रवादीच्या हातातून ही जागा थोडक्यात गेली होती. मतदार संघाच्या पुनर्रचनेनुसार यावेळी बुर्ली गावाचा समावेश अंकलखोप मतदारसंघात झाल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. अंकलखोप जिल्हा परिषद गटात अंकलखोप, नागठाणे, संतगाव, सूर्यगाव, आमणापूर, बुर्ली, धनगाव, ब्रह्मानंदनगर या गावांचा समावेश आहे. पाच वर्षात अनेक स्थित्यंतरे झाल्याने कॉँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादीचे नेते अरुण लाड कोणता पत्ता टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंकलखोप पंचायत समिती गण व आमणापूर गण खुल्या गटातील महिलांसाठी राखीव आहेत. असे पाहिल्यांदाच झाले आहे. तिन्ही पक्षांच्यावतीने मतदारांची दुसऱ्या क्रमांकाची संख्या असणाऱ्या नागठाणे गावातून महिलांची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे अंकलखोप पंचायत समितीसाठी नागठाणेला प्राधान्यक्रम देतील, असे दिसते.आमणापूरमध्ये प्रत्येकवेळी आर. एम. पाटील यांच्या घराला पक्षाने संधी दिली आहे. यावेळीही त्यांच्या घरातील महिलेला उमेदवारी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. आमणापूरच्या भाजपच्या कार्यकर्त्यानी आता महिलेची उमेदवारी गावातूनच मिळावी, अशी भूमिका घेतली आहे. अंकलखोप जिल्हा परिषद गटामध्ये कधी राष्ट्रवादीला, तर कधी कॉँग्रेसला विजय मिळाला होता. यावेळी भाजपचा नव्याने प्रवेश झाला आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक तिरंगी होणार आहे. कॉँग्रेसमध्ये अनेक इच्छुक असले तरी, तिकीट मात्र एकालाच मिळणार आहे.