शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Congress Jan Sangharsh Yatra भाजपने गरिबांचा घासही काढून घेतला : राधाकृष्ण विखे-पाटील - जत येथे जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:23 IST

गेल्या साडेचार वर्षात शासनाने असंख्य प्रश्न या राज्यात निर्माण केले. गरिबांच्या तोंडातील घास काढून घेण्याचे पापही शासनाने केले, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी जत येथे केली.

जत : गेल्या साडेचार वर्षात शासनाने असंख्य प्रश्न या राज्यात निर्माण केले. गरिबांच्या तोंडातील घास काढून घेण्याचे पापही शासनाने केले, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी जत येथे केली.जत तालुका काँग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुय्यम बाजार आवार परिसरात सभा पार पडली. विखे-पाटील म्हणाले की, पैसे वाटा आणि निवडून या, असा एकमेव कार्यक्रम शासन सध्या राबवत आहे. त्याला जनतेने बळी पडू नये. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही याबाबत सतर्क राहावे. शासन शेतकऱ्यांना हमीभाव देत नाही.परंतु हमीभाव न देणाºया व्यापाºयांवर कारवाईसाठी कायदा करत आहे. शेतकºयांना मदत मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

अशोक चव्हाण म्हणाले की, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे शेवटचे हत्यार जातीयवाद हे आहे. भाजप हा देशाला लागलेला भयंकर कॅन्सर आहे. देश व राज्य कॅन्सरमुक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. आगामी निवडणुकीत अमाप पैसा ओतून परत सत्तेत येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी मतदार यादीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात धनगर समाजाला आरक्षण देतो, असा शब्द देऊनही भाजपने तो पाळला नाही. मराठा समाजाच्या तोंडालाही पाने पुसली आहेत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्य सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरत आहे. महिला व दलितांवरील अत्याचारात वाढ होत आहे. लोकशाही पध्दतीने निवडणुका होत नाहीत. घटनेचा अवमान करणाºया सरकारला हद्दपार करा. विश्वजित कदम म्हणाले की, जत मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मानणारा आहे. डॉ. पतंगराव कदम यांची उणीव भरून काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राज्यात आघाडी असो वा नसो, परंतु जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करून तो निवडून आणला जाईल.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पतंगराव कदम यांनी गुड्डापूर (ता. जत) येथे पाणी परिषद घेऊन तालुक्यात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात आमचेच शासन आहे. यापुढील काळात कर्नाटकातून सीमाभागात पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

जत तालुका काँग्रेसचे नेते विक्रम सावंत म्हणाले की, तालुक्यातील पाण्याचा प्रश्न आजवर निकालात निघाला नाही. त्याला सर्वस्वी आमदार विलासराव जगताप कारणीभूत आहेत. तालुक्यातील बावीस गावांतील नागरिकांनी टँकरद्वारे पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी करूनही त्यांना अद्याप टँकर मिळालेला नाही.यावेळी आमदार बसवराज पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार उमाजी सनमडीकर, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार, शैलजा पाटील, विशाल पाटील, पी. एम. पाटील, बाबासाहेब कोडग, दिग्विजय चव्हाण, अभिजित चव्हाण, आप्पासाहेब मासाळ, आकाराम मासाळ, चारुताई टोकस, संतोष पाटील, पृथ्वीराज पाटील, रामगोंडा संत्ती, महादेव पाटील, नाथा पाटील, काका शिंदे, रवींद्र सावंत, इकबाल गवंडी, महादेव कोळी, साहीबू कोळी, ईराण्णा निडोणी, अशोक बन्नेनवार, मुन्ना पखाली, यशवंत हप्पे आदी उपस्थित होते.तालुकाध्यक्ष आप्पासाहेब बिराजदार यांनी स्वागत केले, तर सुजय शिंदे यांनी आभार मानले.जत विधानसभेसाठी ताकद देऊ!सभेत जत विधानसभेचा मुद्दा अनेक नेत्यांनी उपस्थित केला. आमदार सतेज पाटील म्हणाले की, जत विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा, यासाठी प्रदेशाध्यक्षांनी प्रयत्न करावेत. येथील भाजप आमदारांचे कर्तृत्व जनतेला माहिती आहे. विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला आहे, असे समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. तोच धागा पकडत अशोक चव्हाण म्हणाले की, जत विधानसभेची जागा काँग्रेसच्या पारड्यात पाडणार असून, त्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार आहे.जत येथील सभेत अशोक चव्हाण यांनी भाषण केले. यावेळी डावीकडून शुभांगी बन्नेनवार, आ. विश्वजित कदम, आ. सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, आ. मोहनराव कदम, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

 

टॅग्स :SangliसांगलीCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा