शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Congress Jan Sangharsh Yatra भाजपने गरिबांचा घासही काढून घेतला : राधाकृष्ण विखे-पाटील - जत येथे जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:23 IST

गेल्या साडेचार वर्षात शासनाने असंख्य प्रश्न या राज्यात निर्माण केले. गरिबांच्या तोंडातील घास काढून घेण्याचे पापही शासनाने केले, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी जत येथे केली.

जत : गेल्या साडेचार वर्षात शासनाने असंख्य प्रश्न या राज्यात निर्माण केले. गरिबांच्या तोंडातील घास काढून घेण्याचे पापही शासनाने केले, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी जत येथे केली.जत तालुका काँग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुय्यम बाजार आवार परिसरात सभा पार पडली. विखे-पाटील म्हणाले की, पैसे वाटा आणि निवडून या, असा एकमेव कार्यक्रम शासन सध्या राबवत आहे. त्याला जनतेने बळी पडू नये. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही याबाबत सतर्क राहावे. शासन शेतकऱ्यांना हमीभाव देत नाही.परंतु हमीभाव न देणाºया व्यापाºयांवर कारवाईसाठी कायदा करत आहे. शेतकºयांना मदत मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

अशोक चव्हाण म्हणाले की, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे शेवटचे हत्यार जातीयवाद हे आहे. भाजप हा देशाला लागलेला भयंकर कॅन्सर आहे. देश व राज्य कॅन्सरमुक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. आगामी निवडणुकीत अमाप पैसा ओतून परत सत्तेत येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी मतदार यादीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात धनगर समाजाला आरक्षण देतो, असा शब्द देऊनही भाजपने तो पाळला नाही. मराठा समाजाच्या तोंडालाही पाने पुसली आहेत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्य सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरत आहे. महिला व दलितांवरील अत्याचारात वाढ होत आहे. लोकशाही पध्दतीने निवडणुका होत नाहीत. घटनेचा अवमान करणाºया सरकारला हद्दपार करा. विश्वजित कदम म्हणाले की, जत मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मानणारा आहे. डॉ. पतंगराव कदम यांची उणीव भरून काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राज्यात आघाडी असो वा नसो, परंतु जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करून तो निवडून आणला जाईल.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पतंगराव कदम यांनी गुड्डापूर (ता. जत) येथे पाणी परिषद घेऊन तालुक्यात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात आमचेच शासन आहे. यापुढील काळात कर्नाटकातून सीमाभागात पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

जत तालुका काँग्रेसचे नेते विक्रम सावंत म्हणाले की, तालुक्यातील पाण्याचा प्रश्न आजवर निकालात निघाला नाही. त्याला सर्वस्वी आमदार विलासराव जगताप कारणीभूत आहेत. तालुक्यातील बावीस गावांतील नागरिकांनी टँकरद्वारे पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी करूनही त्यांना अद्याप टँकर मिळालेला नाही.यावेळी आमदार बसवराज पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार उमाजी सनमडीकर, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार, शैलजा पाटील, विशाल पाटील, पी. एम. पाटील, बाबासाहेब कोडग, दिग्विजय चव्हाण, अभिजित चव्हाण, आप्पासाहेब मासाळ, आकाराम मासाळ, चारुताई टोकस, संतोष पाटील, पृथ्वीराज पाटील, रामगोंडा संत्ती, महादेव पाटील, नाथा पाटील, काका शिंदे, रवींद्र सावंत, इकबाल गवंडी, महादेव कोळी, साहीबू कोळी, ईराण्णा निडोणी, अशोक बन्नेनवार, मुन्ना पखाली, यशवंत हप्पे आदी उपस्थित होते.तालुकाध्यक्ष आप्पासाहेब बिराजदार यांनी स्वागत केले, तर सुजय शिंदे यांनी आभार मानले.जत विधानसभेसाठी ताकद देऊ!सभेत जत विधानसभेचा मुद्दा अनेक नेत्यांनी उपस्थित केला. आमदार सतेज पाटील म्हणाले की, जत विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा, यासाठी प्रदेशाध्यक्षांनी प्रयत्न करावेत. येथील भाजप आमदारांचे कर्तृत्व जनतेला माहिती आहे. विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला आहे, असे समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. तोच धागा पकडत अशोक चव्हाण म्हणाले की, जत विधानसभेची जागा काँग्रेसच्या पारड्यात पाडणार असून, त्यासाठी वैयक्तिक लक्ष देणार आहे.जत येथील सभेत अशोक चव्हाण यांनी भाषण केले. यावेळी डावीकडून शुभांगी बन्नेनवार, आ. विश्वजित कदम, आ. सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, आ. मोहनराव कदम, राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

 

टॅग्स :SangliसांगलीCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा