शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

काळी खण सुशोभिकरण भूमिपूजनावर काँग्रेसचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST

सांगली : शहरातील काळी खण सुशोभिकरणाचा प्रारंभ रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पण या कार्यक्रमावर काँग्रेस ...

सांगली : शहरातील काळी खण सुशोभिकरणाचा प्रारंभ रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पण या कार्यक्रमावर काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासह नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. सुशोभिकरणाशी राष्ट्रवादीचा काडीमात्र संबंध नसतानाही केवळ श्रेयासाठी उद्घाटने घेण्याचा सपाटा लावला आहे. या कामाचा पाठपुरावा करणाऱ्या नगरसेवकांनाही निमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

काळी खण सुशोभिकरणासाठी एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. जिल्हा नियोजन समितीतील दलित वस्ती सुधार योजनेतून या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तत्कालीन महापौर गीता सुतार यांच्या काळात त्याला मान्यता देण्यात आली. काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी या कामाचा पाठपुरावा केला होता. आयुक्त नितीन कापडणीस यांनी काळी खण सुशोभिकरणासाठी पुढाकार घेतला होता. पण सत्ताबदल होताच राष्ट्रवादी शहरातील विविध विकासकामे हायजॅक करत आहे. सत्ताबाह्य मंडळींनी सत्तेचा वापर करीत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसलाही डावलले असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, समाजकल्याण सभापती स्नेहल सावंत, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, उपायुक्त राहुल रोकडे, नियोजन समिती सदस्य संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दिन बागवान, शेखर माने आदी उपस्थित होते. काँग्रेसचे उपमहापौर उमेश पाटील वगळता सर्वच नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर अनुपस्थित होते.

चौकट

कोट

राष्ट्रवादीकडून मनमानी : निंबाळकर

काळी खण सुशोभिकरणासाठी आम्ही तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर गीता सुतार यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर झाला. पण या कामाचे श्रेय लाटण्याचा उद्योग राष्ट्रवादीकडून सुरू आहे. भूमिपूजनाला किमान वाॅर्डातील चारही नगरसेवकांना निमंत्रण देण्याची आवश्यकता होती. निमंत्रण पत्रिकेवर नेत्या जयश्रीताई पाटील यांचेही नाव घातले नाही. ही राष्ट्रवादीची मनमानी असल्याचा आरोप नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी केला.