शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

सांगलीत राष्ट्रवादीला केवळ २० जागांची आॅफर आघाडीचा गुंता : जागा वाटपात दोन्ही कॉँग्रेसचे घोडे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:29 AM

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे घोडे जागा वाटपात अडले आहे. राष्ट्रवादीने ४३-३३ जागांचा दिलेला प्रस्ताव मंगळवारी काँग्रेसने फेटाळून लावला. काँग्रेसकडून ५८-२० जागांचा नवा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे घोडे जागा वाटपात अडले आहे. राष्ट्रवादीने ४३-३३ जागांचा दिलेला प्रस्ताव मंगळवारी काँग्रेसने फेटाळून लावला. काँग्रेसकडून ५८-२० जागांचा नवा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे पाठविण्यात आला आहे. जागा वाटपाचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालला असून, काँग्रेसने सुधारित प्रस्ताव न दिल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. दोन्ही पक्षांकडून ताणाताणी सुरू झाल्याने, पहिल्या टप्प्यावर आघाडी फिसकटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीअंतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्ह्यात भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी करण्यावर वरिष्ठ नेत्यांत एकमत झाले. पण जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आघाडीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सुरूवातीपासूनच काँग्रेसकडे हात पुढे केला आहे. पण काँग्रेस नेतृत्वाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.

गेल्याच आठवड्यात आघाडीसंदर्भात काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्यासोबत दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक झाली. यात राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी जागा वाटपाचा प्रस्ताव दिला होता. त्यात राष्ट्रवादीने ४३, तर काँग्रेसने ३३ जागा लढवाव्यात, अशी मागणी केली होती. पण या प्रस्तावाला काँग्रेसने नकार दिला.

सोमवारी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा झाली. या बैठकीला शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, राजेश नाईक आदींसह प्रमुख नगरसेवक उपस्थित होते. सध्या काँग्रेसचे ४३ नगरसेवक आहेत. असे असताना राष्ट्रवादीकडून जादा जागांची मागणी अवास्तव आहे, असा सूर बैठकीतून पुढे आला. उलट राष्ट्रवादीचे २४ संख्याबळ असले तरी, चिन्हावर केवळ १८ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना २० जागाच द्याव्यात. काँग्रेसची ताकद मोठी असल्याने ५८ जागा लढवाव्यात, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी पृथ्वीराज पाटील यांनी याबाबत जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, युवक काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील यांनाही ५८-२० च्या प्रस्तावाची माहिती दिली.

त्यानंतर हा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे पाठविला. काँग्रेसच्या या प्रस्तावावर राष्ट्रवादीतून नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे १८ व सहा अपक्ष असे २४ संख्याबळ असताना काँग्रेसने २० जागा देऊन चेष्टा केल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादीनेही काँग्रेसचा हा प्रस्ताव धुडकावला आहे.आमने-सामने चर्चा : पृथ्वीराज पाटीलपृथ्वीराज पाटील म्हणाले, राष्ट्रवादीकडून ताकदीपेक्षा जादा जागांची मागणी केली होती. उलट महापालिका हद्दीत काँग्रेसची ताकद मोठी आहे. राष्ट्रवादीने सध्याच्या त्यांच्याकडील जागांपेक्षा दुप्पट जागांची मागणी करणे चुकीचे आहे. त्यांना आम्ही २० जागांचा प्रस्ताव देऊ केला आहे. याबाबत संजय बजाज यांच्याशी चर्चा केली. आता दोन्ही पक्षांचे नेते आमने-सामने बसून जागा वाटपावर चर्चा करतील. 

..अन्यथा स्वबळावर लढू : संजय बजाजमहापालिकेत राष्ट्रवादीचे विद्यमान २४ नगरसेवक आहेत. काँग्रेसने दिलेला २० जागांचा प्रस्ताव चुकीचा आहे. हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. भाजपला रोखण्यासाठी दोन्ही पक्षाची आघाडी व्हावी, अशी आमची भूमिका आहे. शहरात राष्ट्रवादीची ताकद असून, सन्मानजनक प्रस्ताव आला तरच आम्ही आघाडीवर चर्चा करू, अन्यथा स्वबळावर लढण्यास आम्ही सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणElectionनिवडणूक