शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

सांगली बाजार समिती सभेत गोंधळ --घंटानाद आंदोलन करून प्रशासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:43 IST

तोलाईदारांची तोलाई व्यापाºयांनी माथाडी मंडळाकडे जमा केलेली नाही, ती करण्यात यावी, तसेच धान्य, भुसार विभागातील व्यापारी तोलाईदारांना कामासाठी दुकानात येऊ देत नाहीत, हा प्रकार थांबविण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी मार्केट यार्डातील तोलाईदारांनी बाजार समिती कार्यालयासमोर तीन दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्दे संतप्त तोलाईदारांनी कामकाज रोखले

सांगली : तोलाईदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरुन आदोलकांनी शनिवारी थेट बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत घुसून कामकाज रोखले. अखेर संचालक मंडळ आणि बाजार समिती प्रशासनाने तातडीने व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून तोलाई जमा करण्याची सूचना दिली आहे. तसेच तोलाईदारांना कामासाठी दुकानात येऊ न देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी आंदोलकांना दिले.

तोलाईदारांची तोलाई व्यापाºयांनी माथाडी मंडळाकडे जमा केलेली नाही, ती करण्यात यावी, तसेच धान्य, भुसार विभागातील व्यापारी तोलाईदारांना कामासाठी दुकानात येऊ देत नाहीत, हा प्रकार थांबविण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी मार्केट यार्डातील तोलाईदारांनी बाजार समिती कार्यालयासमोर तीन दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

शनिवारी आंदोलकांनी घंटानाद आंदोलन करुन बाजार समिती प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. संघटनेचे विकास मगदूम, आदगोंडा गौंडाजे, कृष्णात माने, विजय हारूगडे, आलगोंडा तेली, सुभाष ढोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे. तीन दिवसात बाजार समिती प्रशासनाकडून आंदोलकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्यामुळे शनिवारी बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीतच आंदोल घुसले होते.

आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत तेथून बाहेर जाण्यास नकार दिला. अखेर बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी तोलाईदारांच्या प्रश्नावर व्यापाºयांना नोटिसा बजावून तोलाईदारांची तोलाई व्यापाºयांनी माथाडी मंडळाकडे जमा करण्याची सूचना दिली आहे. तसेच कामावर येणाºया तोलाईदारांना एकाही व्यापाºयांनी थांबवू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी व्यापाºयांना सूचना दिल्या आहेत.

बाजार समितीकडून तोलाईदारांच्या सर्व मागण्या मान्य : विकास मगदूमशासनाने २०१४ मध्ये इलेक्ट्रॉनिक काट्यावर शेतीमालाचे वजन करत असताना तोलाई कपात करू नये, असा आदेश पारित करण्यात आला होता. त्यास स्थगिती देण्यात आली होती. यावर सांगली चेंबर आॅफ कॉमर्स व काही व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात रिट दाखल केली होती. त्यावर पुन्हा आदेश होऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणूनच शांततेच्या मार्गाने तीन दिवस आंदोलन सुरू होते. तरीही बाजार समिती प्रशासन लक्ष देत नव्हते. म्हणूनच संचालक मंडळाच्या बैठकीत घुसून कामकाज रोखले. त्यानंतर संचालक मंडळाने व्यापाऱ्यांना तोलाई भरण्याच्या नोटिसा काढल्या आहेत. अन्य मागण्याही मान्य केल्या आहेत, अशी माहिती विकास मगदूम यांनी दिली.

 

टॅग्स :SangliसांगलीStrikeसंप