शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

‘म्हैसाळ’चे पाणी सोडण्यात गोंधळ : सांगली जिल्हा परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:52 IST

म्हैसाळ सिंचन योजनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन शेतकºयांना कळत नाही. पाणी सोडण्याबाबत आणि पाणीपट्टी वसुलीत अधिकाºयांचा सावळा गोंधळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव

ठळक मुद्देजलव्यवस्थापन समिती सभेत सदस्यांचा आरोपदुष्काळग्रस्तांना वीज बिल माफीचा ठराव

सांगली : म्हैसाळ सिंचन योजनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन शेतकºयांना कळत नाही. पाणी सोडण्याबाबत आणि पाणीपट्टी वसुलीत अधिकाºयांचा सावळा गोंधळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी सदस्यांनी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत केली.

आवर्तनाचे वेळापत्रक शेतकºयांना कळविण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिले. दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांच्या शेती पंपाची सर्व बिले माफ करण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला. समितीची सभा अध्यक्ष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी-पाटील, ब्रम्हदेव पडळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, सदस्य चंद्रकांत पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

म्हैसाळ सिंचन योजनेची पाणी सुरु होण्याची व बंद होण्याची वेळ निश्चित नाही. या कारणांनी शेतकºयांना पिकाचे व पुढील कामाचे नियोजन करता येत नाही. याबाबत शेतकºयांच्या तक्रारी येत असल्याचे सदस्य चंद्रकांत पाटील यांनी मांडले. पाण्याच्या आवर्तनाबद्दल नियोजन नसल्याने शेतकºयांतून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित अधिकाºयांनी याबाबत योग्य ती उपाययोजना करून आवर्तनाचे वेळापत्रक कळवावे, अशा सूचना अध्यक्ष देशमुख यांनी दिल्या.

कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाºया शेततळी काढण्यात येतात. मात्र त्यासाठी लागणारा कागद खरेदीसाठीचे अनुदान लवकर मिळत नसल्याने शेतकºयांची अडचण होती. अनुदानाची वाट पाहत कागद घालण्याचे काम व पाण्याचे पुढील नियोजन विस्कळीत होते. त्यामुळे शेतकºयांना कागद खरेदीस मंजुरी देण्यात यावी. ज्यावेळी अनुदान येईल. त्यावेळी अनुदान देताना कागद खरेदीची बिलांची खात्री करून अनुदान द्यावे. कागद खरेदी केली का नाही, याची जरूर पाहणी करावी, कागदपत्रांचा मेळ घालावा, मात्र त्यासाठी अडवणूक न करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकºयांना कागद खरेदीस मंजुरी मिळावी, असा ठराव करण्यात आला.बंधाºयाच्या अंदाजपत्रकात चुका नकोत

कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना त्यामधून साठविण्यात येणाºया पाण्याची क्षमता, त्यापासून ओलिताखाली येणाºया जमिनीचे क्षेत्र याचा विचार करून अंदाजपत्रक करण्यात यावे. अंदाजपत्रक योग्य पध्दतीने करावे, त्यामध्ये कोणत्याही चुका नकोत, अशा सूचना संग्रामसिंह देशमुख यांनी अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषदFarmerशेतकरीwater transportजलवाहतूक