शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

‘म्हैसाळ’चे पाणी सोडण्यात गोंधळ : सांगली जिल्हा परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:52 IST

म्हैसाळ सिंचन योजनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन शेतकºयांना कळत नाही. पाणी सोडण्याबाबत आणि पाणीपट्टी वसुलीत अधिकाºयांचा सावळा गोंधळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव

ठळक मुद्देजलव्यवस्थापन समिती सभेत सदस्यांचा आरोपदुष्काळग्रस्तांना वीज बिल माफीचा ठराव

सांगली : म्हैसाळ सिंचन योजनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन शेतकºयांना कळत नाही. पाणी सोडण्याबाबत आणि पाणीपट्टी वसुलीत अधिकाºयांचा सावळा गोंधळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी सदस्यांनी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत केली.

आवर्तनाचे वेळापत्रक शेतकºयांना कळविण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिले. दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांच्या शेती पंपाची सर्व बिले माफ करण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला. समितीची सभा अध्यक्ष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉ. सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तम्मणगौडा रवी-पाटील, ब्रम्हदेव पडळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, सदस्य चंद्रकांत पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

म्हैसाळ सिंचन योजनेची पाणी सुरु होण्याची व बंद होण्याची वेळ निश्चित नाही. या कारणांनी शेतकºयांना पिकाचे व पुढील कामाचे नियोजन करता येत नाही. याबाबत शेतकºयांच्या तक्रारी येत असल्याचे सदस्य चंद्रकांत पाटील यांनी मांडले. पाण्याच्या आवर्तनाबद्दल नियोजन नसल्याने शेतकºयांतून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित अधिकाºयांनी याबाबत योग्य ती उपाययोजना करून आवर्तनाचे वेळापत्रक कळवावे, अशा सूचना अध्यक्ष देशमुख यांनी दिल्या.

कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाºया शेततळी काढण्यात येतात. मात्र त्यासाठी लागणारा कागद खरेदीसाठीचे अनुदान लवकर मिळत नसल्याने शेतकºयांची अडचण होती. अनुदानाची वाट पाहत कागद घालण्याचे काम व पाण्याचे पुढील नियोजन विस्कळीत होते. त्यामुळे शेतकºयांना कागद खरेदीस मंजुरी देण्यात यावी. ज्यावेळी अनुदान येईल. त्यावेळी अनुदान देताना कागद खरेदीची बिलांची खात्री करून अनुदान द्यावे. कागद खरेदी केली का नाही, याची जरूर पाहणी करावी, कागदपत्रांचा मेळ घालावा, मात्र त्यासाठी अडवणूक न करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकºयांना कागद खरेदीस मंजुरी मिळावी, असा ठराव करण्यात आला.बंधाºयाच्या अंदाजपत्रकात चुका नकोत

कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना त्यामधून साठविण्यात येणाºया पाण्याची क्षमता, त्यापासून ओलिताखाली येणाºया जमिनीचे क्षेत्र याचा विचार करून अंदाजपत्रक करण्यात यावे. अंदाजपत्रक योग्य पध्दतीने करावे, त्यामध्ये कोणत्याही चुका नकोत, अशा सूचना संग्रामसिंह देशमुख यांनी अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषदFarmerशेतकरीwater transportजलवाहतूक