शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

हमीभाव केंद्रांवर गोंधळाचीच हमी! : शेतकऱ्यांत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:44 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उडीद, मूग व सोयाबीनचे बिल पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना, आॅनलाईन सात-बारा उताऱ्यातील अडचणी अद्याप कायम आहेत.

ठळक मुद्दे आॅनलाईन अडचणी : शेतकऱ्यांत अस्वस्थताखरेदी केंद्रासाठी प्रस्ताव आलेला नसल्याने शेतकºयांना इतरत्र शेतीमाल न्यावा लागणार

सांगली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उडीद, मूग व सोयाबीनचे बिल पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना, आॅनलाईन सात-बारा उताऱ्यातील अडचणी अद्याप कायम आहेत. त्यातच जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यास प्रस्तावच दाखल झाले नसल्याने केवळ तीन ठिकाणी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. शेतकºयांना नोंदणीसाठी दिलेली मुदतवाढही बुधवार, दि. २४ रोजी संपणार असल्याने नोंदणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग व उडीद हमीभाव केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी प्रसिध्दी देऊनही जिल्हाभरातून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केंद्र अपेक्षित असताना, केवळ सांगली, तासगाव व विटा येथेच खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

उर्वरित ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी एकाही संस्थेकडून प्रस्ताव आलेला नसल्याने त्या भागातील शेतकºयांची मोठी पंचाईत झाली आहे.जिल्ह्यात सांगली येथे विष्णुअण्णा पाटील खरेदी-विक्री संघ, खानापूर तालुका खरेदी-विक्री संघ, विटा व आर. आर. पाटील खरेदी -विक्री संघ तासगाव या तीनच ठिकाणी नोेंदणी सुरू आहे. याउलट जतसारख्या ठिकाणी उडदाची अधिक नोंदणी अपेक्षित असताना त्याठिकाणी एकाही संस्थेने केंद्र सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिलेला नाही. तसेच वाळवा तालुक्यातही सोयाबीनचे क्षेत्र चांगले असताना तेथेही खरेदी केंद्रासाठी प्रस्ताव आलेला नसल्याने शेतकºयांना इतरत्र शेतीमाल न्यावा लागणार आहे.

खरेदी केंद्राची अडचण असतानाच शेतीमालाच्या नोंदणीसाठी आॅनलाईन सात-बारा उतारा सक्तीचा करण्यात आला आहे. सर्व्हरमधील अडचणीमुळे उतारा मिळण्यास अडचणी येत असल्याने अनेक शेतकºयांना नोंदणीस अडचणी येत होत्या. या आठवड्यात मात्र, सात-बारा उताºयातील अडचण बºयापैकी दूर झाली आहे. त्यात शिथिलता देण्याबाबतही आदेश अधिकाºयांनी दिले आहेत.नोंदणीसाठी मुदतवाढ : मिळणार का?उडीद, मूग व सोयाबीनच्या आॅनलाईन नोंदणीसाठी सुरूवातीला १० आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. तोपर्यंत एकही नोंदणी न झाल्याने ही मुदत वाढवीत उडीद व मुगासाठी २४ आॅक्टोबरपर्यंत, तर सोयाबीनला ३१ आॅक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. नोंदणीसाठी शेतकºयांचा प्रतिसाद व कागदपत्रांच्या अडचणी लक्षात घेता, पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा शेतकºयांतून व्यक्त होत आहे. 

थेट विक्रीस प्राधान्य...केंद्र सरकारने शेतमालाला हमीभाव देण्याची घोषणा करत दर जाहीर केले असले तरी, दर पदरात पाडून घेण्यासाठी शेतकºयांचे हाल होत आहेत. परिणामी नोंदणी करून शेतमाल विक्री करण्यापेक्षा थेट व्यापाºयांकडेच माल विक्रीसाठी नेण्याची शेतकºयांची मानसिकता निर्माण झाली आहे. त्यातच सांगली मार्केट यार्डात सोयाबीनला फक्त हमीभावाइतका दर मिळत असल्याने शेतकºयांनी नोंदणीपेक्षा थेट विक्रीस प्राधान्य दिले आहे. सोयाबीनला ३३९९ रुपये प्रती क्विंटल, उडीद ५६०० रुपये प्रती क्विंटल, तर मुगाला ६९७५ रुपये प्रती क्विंटल हमीभावाप्रमाणे दर मिळणार आहे.

जिल्हाभरातून केवळ ८७ शेतकऱ्यांनीच केली नोंदणीसांगलीत सोयाबीनसाठी एकाही शेतकºयाने नोंदणी केलेली नाही, तर उडिदाची ६०, तर मुगाची केवळ ३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तासगावला सोयाबीनला ३, उडिदासाठी २, तर मुगासाठी एकाही शेतकºयाची नोंद नाही. विटा येथे सोयाबीनची २, उडीद १४, तर मुगाची ३ शेतकºयांनी आजवर नोंदणी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसा