शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

पश्चिम महाराष्ट्रातील अस्तित्वाची कॉँग्रेसला चिंता; दोनच जागा निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:27 IST

काँग्रेस-राष्ट वादी आघाडीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असताना, सांगलीच्या जागेवरून कॉँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रस्सीखेच सुरू झाली आहे.

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असताना, सांगलीच्या जागेवरून कॉँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्टÑात काँग्रेसला केवळ तीनच जागा वाट्याला आल्या असताना, सांगलीचीही जागा गेली तर पश्चिम महाराष्टÑातील पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी भीती सांगली कॉँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे व्यक्त केली आहे.सांगली जिल्हा कॉँग्रेसतर्फे देण्यात आलेल्या या पत्रावर आमदार विश्वजित कदम, आ. मोहनराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मित्रपक्ष असलेल्या राष्टÑवादीच्या वाट्याला पश्चिम महाराष्टÑातील एकूण सात जागा आल्या आहेत. कॉँग्रेसच्या वाट्याला असलेल्या तीनपैकी पुणे व सोलापूरची जागा निश्चित आहे. हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली आहे. आता सांगलीच्या जागेसाठी कॉँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दावेदारी सुरू झाली आहे. ही जागा कॉँग्रेसकडून गेल्यास पश्चिम महाराष्टÑातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सांगलीऐवजी महाराष्टÑातील अन्य ठिकाणच्या जागेची तडजोड करून जागावाटपाचा तिढा सोडवावा, अशी मागणी या पत्रात केली आहे.सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर दादा व कदम घराण्यातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. आता ही जागा कोणाला जाणार, याकडे लक्ष लागले आहे.घोरपडे, दिलीप पाटील यांच्या नावांची चर्चास्वाभिमानीकडून माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष व जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले दिलीपतात्या पाटील यांचाही उमेदवारीसाठी विचार सुरू आहे.तसेच भाजपाच्या उमेदवारीवरून मतभेद असून, खा. संजय पाटील यांच्या कार्यपद्धतीबद्दल काही पदाधिकारी व आमदारांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. उमेदवारीबाबत २ दिवसांत निर्णय घेऊ, असे पार्लमेंटरी बोर्डातील सदस्यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस