शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

मिरज ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण

By admin | Updated: January 25, 2015 00:43 IST

२२ ग्रामपंचायतींची निवडणूक

मिरज : मिरज तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींची निवडणूक सप्टेंबरमध्ये होणार असून या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाली आहे. लोकसंख्या वाढल्याने चार गावात एक प्रभाग व दोन सदस्य वाढले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील डोंगरवाडी, लक्ष्मीवाडी, लिंगनूर, मल्लेवाडी, शिंदेवाडी, आरग, भोसे, एरंडोली, कळंबी, कवलापूर, मालगाव, शिपूर, तानंग, चाबुकस्वारवाडी, विजयनगर, अंकली, ढवळी, इनामधामणी, कर्नाळ, कवठेपिरान, म्हैसाळ, तुंग या ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबरपर्यंत संपत आहे. या ग्रामपंचायती काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. ग्रामपंचायतींची जुनी प्रभाग रचना बदलण्यात आली असून, लोकसंख्येत वाढ झाल्याने प्रत्येक प्रभागाची मतदारसंख्या वाढली आहे. अंकली, कळंबी, इनामधामणी व कर्नाळ या चार गावांच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने या गावात एक प्रभाग वाढला आहे. एका प्रभागातील दोन सदस्यांची संख्या वाढल्याने या गावांतील राजकीय परिस्थिती बदलणार आहे. नवीन प्रभाग रचनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून निवडणूक सूचनेपूर्वी आरक्षित प्रभाग निश्चित होणार आहेत.