शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सांगली जिल्ह्यातील ९७९८ वीज ग्राहकांकडून महावितरणविरोधात तक्रारी

By अशोक डोंबाळे | Updated: July 6, 2024 17:22 IST

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून ९७७४ तक्रारी निकाली : सर्वाधिक ४८२२ वीज पुरवठा खंडितच्या तक्रारींचा समावेश

सांगली : जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी महावितरणकडे गेल्या तीन महिन्यात ९ हजार ७९८ तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या ४ हजार ८२२ तक्रारींचा समावेश आहे. महावितरणकडे आलेल्या तक्रारींपैकी ९ हजार ७७४ तक्रारींची गंभीर दखल घेऊन अधिकाऱ्यांनी तत्काळ सोडविल्या आहेत.ग्राहक समाधानास प्राधान्य देऊन महावितरणने ग्राहकांना घरबसल्या वीज सेवेबाबत ऑनलाइन तक्रारी दाखल करण्यासाठी संकेतस्थळ, मोबाइल ॲप, टोल फ्री क्रमांक, ई-मेल, एसएमएस, ऊर्जा चॅटबॉट, मिस्ड कॉल सेवा असे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय नजीकच्या शाखा, उपविभाग कार्यालयात भेट देऊन ग्राहक तक्रार दाखल करू शकतात.सांगली जिल्ह्यात एप्रिल ते जून २०२४ या तीन महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांनी विविध पर्यायाद्वारे महावितरणकडे खंडित वीजपुरवठा, वीजदेयक व इतर वीज सेवा-सुविधेबाबतच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. जिल्ह्यात ग्राहकांच्या खंडित वीजपुरवठ्याच्या ४ हजार ८२२, वीज देयक विषयक ४ हजार ५३५ व वीज सुविधेबाबतच्या ४४१ अशा एकूण ९ हजार ७९८ दाखल तक्रारींपैकी ९ हजार ७७४ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. ग्राहकांनी तक्रारी व माहितीसाठी महावितरणचे अधिकृत संकेतस्थळावरील ग्राहक पोर्टल, महावितरण मोबाइल ॲप, सेवेतील टोल फ्री क्रमांक, ऊर्जा चॅटबॉट, ई-मेल आयडी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.

ग्राहकांना तत्काळ सुविधा : धर्मराज पेठकरग्राहकांना मूलभूत सुविधा तात्काळ देण्यासाठी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्राधान्य आहे. त्यानुसार आम्ही २४ तास कार्यरत आहे. वीज ग्राहकांच्या एकाही तक्रारीकडे आम्ही दुर्लक्ष करत नाही. म्हणून मागील तीन महिन्यात आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्के वीज ग्राहकांच्या तक्रारींची सोडवणूक केली आहे, अशी माहिती महावितरणच्या सांगली विभागाचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरण