शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी समिती -: सुरेश खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 20:06 IST

मिरज : ब्रम्हनाळ येथील दुर्घटनेसाठी प्रशासन जबाबदार नाही. मात्र या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे ...

ठळक मुद्देब्रम्हनाळ दुर्घटनेस प्रशासन जबाबदार नाही; चौकशी होणार

मिरज : ब्रम्हनाळ येथील दुर्घटनेसाठी प्रशासन जबाबदार नाही. मात्र या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले. यापुढे महापुरापासून बचावासाठी पूरग्रस्त गावात बोटी उपलब्ध करून देण्यात येणार असून, कृष्णेच्या पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.

महापुरात ब्रम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या १७ जणांच्या मृत्यूस प्रशासनातील अधिकारी जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मंत्री खाडे यांना विचारणा केल्यानंतर, या दुर्घटनेस प्रशासन जबाबदार नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, किल्लारी येथील भूकंपानंतर झालेल्या मदतकार्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी चांगल्या प्रकारे मदतकार्य केले.

पुराचे पाणी शिरल्यानंतर सर्वच ठिकाणी प्रशासनाने तातडीने बोटी उपलब्ध करून दिल्या. पुराची पातळी वाढत असताना पूरग्रस्त गावांतील अनेक ग्रामस्थांनी सुरुवातीस स्थलांतरास नकार दिला. पुराचे पाणी घरात शिरल्यानंतर मात्र सर्वांची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू झाली. ब्रम्हनाळ येथे बोटीत क्षमतेपेक्षा जास्त ग्रामस्थ बसल्याने दुर्घटना घडली. या दुर्घटनेची शासकीय पातळीवर चौकशी करण्यात येणार आहे.

पूरग्रस्त गावांना शासनाकडून बोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुरामुळे जिल्ह्यातील सुमारे ४५० किलोमीटर रस्ते बाधित झाले असून या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम तातडीने विनानिविदा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवापूर्वी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा आदेश प्रशासनाला देण्यात आला आहे.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झालेल्या दलित कुुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत. यासाठी दलित कुटुंबांचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सुरेश खाडे यांनी सांगितले.अलमट्टी धरण जबाबदार नाहीसांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुराला अलमट्टी धरण जबाबदार नाही. कृष्णा, वारणा व पंचगंगा या नद्यांना एकाचवेळी पूर आल्याने पाणी पुढे वाहून न जाता पात्राबाहेर पडले. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कृष्णेचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याच्या योजनेचाही फेरआढावा घेण्यात येईल. पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरriverनदीGovernmentसरकार