शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
3
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
4
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
5
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
6
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
7
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
8
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
9
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
10
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
11
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
12
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
13
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
14
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
15
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
16
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
17
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
18
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
19
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
20
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल

कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी समिती -: सुरेश खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 20:06 IST

मिरज : ब्रम्हनाळ येथील दुर्घटनेसाठी प्रशासन जबाबदार नाही. मात्र या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे ...

ठळक मुद्देब्रम्हनाळ दुर्घटनेस प्रशासन जबाबदार नाही; चौकशी होणार

मिरज : ब्रम्हनाळ येथील दुर्घटनेसाठी प्रशासन जबाबदार नाही. मात्र या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले. यापुढे महापुरापासून बचावासाठी पूरग्रस्त गावात बोटी उपलब्ध करून देण्यात येणार असून, कृष्णेच्या पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.

महापुरात ब्रम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या १७ जणांच्या मृत्यूस प्रशासनातील अधिकारी जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मंत्री खाडे यांना विचारणा केल्यानंतर, या दुर्घटनेस प्रशासन जबाबदार नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, किल्लारी येथील भूकंपानंतर झालेल्या मदतकार्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात प्रशासनाने पूरग्रस्तांसाठी चांगल्या प्रकारे मदतकार्य केले.

पुराचे पाणी शिरल्यानंतर सर्वच ठिकाणी प्रशासनाने तातडीने बोटी उपलब्ध करून दिल्या. पुराची पातळी वाढत असताना पूरग्रस्त गावांतील अनेक ग्रामस्थांनी सुरुवातीस स्थलांतरास नकार दिला. पुराचे पाणी घरात शिरल्यानंतर मात्र सर्वांची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू झाली. ब्रम्हनाळ येथे बोटीत क्षमतेपेक्षा जास्त ग्रामस्थ बसल्याने दुर्घटना घडली. या दुर्घटनेची शासकीय पातळीवर चौकशी करण्यात येणार आहे.

पूरग्रस्त गावांना शासनाकडून बोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुरामुळे जिल्ह्यातील सुमारे ४५० किलोमीटर रस्ते बाधित झाले असून या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम तातडीने विनानिविदा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवापूर्वी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा आदेश प्रशासनाला देण्यात आला आहे.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झालेल्या दलित कुुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत. यासाठी दलित कुटुंबांचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सुरेश खाडे यांनी सांगितले.अलमट्टी धरण जबाबदार नाहीसांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुराला अलमट्टी धरण जबाबदार नाही. कृष्णा, वारणा व पंचगंगा या नद्यांना एकाचवेळी पूर आल्याने पाणी पुढे वाहून न जाता पात्राबाहेर पडले. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कृष्णेचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याच्या योजनेचाही फेरआढावा घेण्यात येईल. पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचेही मंत्री खाडे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरriverनदीGovernmentसरकार