शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सहकार क्षेत्राची राज्यभर वाताहत

By admin | Updated: September 6, 2015 23:15 IST

आनंदराव आडसूळ : सहकारी बँक कर्मचारी मेळाव्यात टीका

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र हे राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्याच ताब्यात आहे. परंतु त्या सहकार क्षेत्राची सध्या वाताहत सुरू आहे, अशी टीका बॅँक एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष आणि खासदार आनंदराव आडसूळ यांनी केली. येथील मराठा समाज कार्यालयात रविवारी सहकारी बॅँकेतील कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. व्यासपीठावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे माजी अध्यक्ष डी. के. पाटील उपस्थित होते. खा. आडसूळ म्हणाले, विविध बॅँकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असून, कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या घामाला दाम तसेच सन्मान मिळालाच पाहिजे. परंतु तसे होत नसेल तर प्रसंगी न्यायासाठी बाह्या वर सरकल्या तरी हरकत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांनी नेहमी बॅँकेतील सभासदांचे प्रतिनिधी म्हणून कार्यशील राहिले पाहिंजे. कर्मचारी हा बॅँकेची प्रामाणिकपणे सेवा करतो. साहजीकच त्यांच्या हक्काचे दाम त्याला मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु कित्येक ठिकाणी ते होताना दिसत नाही. त्यामुळेच संघटनांची आवश्यकता आहे. सहकार चळवळीतून सामान्यांचा उत्कर्ष व्हायला पाहिजे, ही संकल्पना आपल्या मनात पक्की बसली पाहिजे व त्यानुसारच संचालक मंडळांचा व्यवहार असणे अपेक्षित आहे. आपली जिल्हा बॅँक नियमानुसार चालली नसल्यामुळेच त्यावर प्रशासक नेमण्यात आला होता. परंतु प्रशासक असतानाही बॅँकेचे कामकाज कर्मचाऱ्यांनीच भक्कमपणे सांभाळले होते. ज्यांच्यामुळे बॅँक अवसायक बनली, त्यांनाच पुन्हा सभासदांनी निवडून दिले आहे. हीच परिस्थिती राज्यातही इतरत्र दिसते. ती दुर्दैवी असल्याचेही आडसूळ यांनी सांगितले. डी. के. पाटील म्हणाले की, बॅँक कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी वारंवार आपण आवाज उठविला आहे. आपल्या न्याय्य हक्कासाठी कर्मचाऱ्यांनी नेहमी संघर्ष केला पाहिजे, परंतु त्याचवेळी संचालकांचादेखील आदर केला पाहिजे. कर्मचाऱ्यांनी कधीही स्वाभिमानाला तिलांजली देऊ नये. यावेळी कार्यक्रमास संघटनेचे कार्याध्यक्ष नरेंद्र सावंत, सरचिटणीस प्रदीप पाटील, चंद्रशेखर गवळी, पदाधिकारी, सहकारी संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)देण्या-घेण्याला महत्त्व!पूर्वी बॅँकेत नोकरी हवी असेल तर ‘नाती-गोती’ उपयोगाला येत होती. सध्या मात्र देण्या-घेण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ही वस्तुस्थिती कोणीच नाकारु शकत नाही. मुळात नोकरी हवी असेल तर पैसे कशाला लागतात, हे अनाकलनीय कोडे आहे, असे मत खा. आडसूळ यांनी यावेळी व्यक्त केले.