शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

स्वच्छता अभियानाला लोकचळवळ बनविले -निशिकांत भोसले-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:50 IST

इस्लामपूर शहराला १५ कोटीचा निधी - केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानांतर्गत इस्लामपूर नगरपालिकेने केलेली कामगिरी प्रेरक आहे. -चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

ठळक मुद्देस्वच्छतेचे काम करणाºया स्वच्छता कर्मचाºयांचाही या यशामध्ये मोलाचा वाटा आहे.

युनूस शेख ।केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानांतर्गत इस्लामपूर नगरपालिकेने २०१८ मध्ये पश्चिम भारतातील महाराष्टÑ, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश अशा पाच राज्यांतून ९ वा क्रमांक पटकाविला, तर २०१९ मध्ये ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात प्रथक क्रमांक पटकावण्याची देदिप्यमान कामगिरी केली. या अभियानातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे शहराला १५ कोटी रूपयांचा निधी मिळणार असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

प्रश्न : स्वच्छता अभियानात इस्लामपूर पालिकेने मिळविलेल्या यशाचे श्रेय कुणाला द्याल?उत्तर : स्वच्छतेच्या अभियानाला लोकचळवळ बनवून घरा-घरात आणि प्रत्येकाच्या मना-मनात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात यशस्वी ठरल्यानेच, पश्चिम भारतातील पाच राज्यांतून अव्वल दर्जाची कामगिरी करण्याचा बहुमान इस्लामपूर शहराला मिळाला. शहरवासीयांसह समाजातील प्रत्येक घटकाची साथ आणि प्रत्यक्ष स्वच्छतेसाठी राबलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अतुलनीय योगदान, हे या यशामागील खरे सूत्रधार आहेत.

प्रश्न : स्वच्छता अभियानात यशस्वी होण्यासाठी काय योजना केल्या?उत्तर : या अभियानाच्या माध्यमातून ‘कचराकुंडीमुक्त शहर’ म्हणून नावारूपाला आणता आले. १५ हजारहून अधिक घरांमध्ये डस्टबिनचे वाटप केले. दैनंदिन आठ टन इतका ओला कचरा संकलित होऊ लागला. त्यावर प्रक्रिया करीत कंपोस्ट खत निर्मिती केली. त्याला शासनाने ‘हरित ब्रॅन्ड’ या नावाने मान्यता दिली. जिथे नागरिक उघड्यावर कचरा टाकायचे, तेथे विरंगुळ्यासाठी बैठक व्यवस्था केली. त्या परिसरात रांगोळी रेखाटली. या गांधीगिरीमुळे उघड्यावर पडणारा कचरा शेवटी कचरा संकलन करणाºया घंटागाड्यांमध्ये पडू लागला. तसेच जवळपास दीड हजार कुटुंबांनी कंपोस्ट खत निर्मिती करून अभियानाच्या यशामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.शहरवासीयांचा उत्स्फूर्त सहभागअभियानात १७ हजार शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने काढलेली ‘स्वच्छता रॅली’ शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारी ठरली. त्यानंतर वेळोवेळी सर्वच समाजघटकांसोबत चर्चा, बैठका घेत अभियानाची गती वाढविण्यात यश आले.कर्मचाऱ्यांची साथ मोलाचीस्वच्छतेसाठी शहराचे चार विभाग करून हे अभियान राबविले. व्यापारी पेठेत दिवसातून दोनवेळा स्वच्छता केली. नगरपालिकेने मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी प्रशासन प्रमुख या नात्याने सर्व घटकांना सोबत घेत प्रत्येक उपक्रम चांगल्या पध्दतीने राबविला. या अभियानात पालिकेतील सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तर सहभागी झालेच, मात्र प्रत्यक्ष स्वच्छतेचे काम करणाºया स्वच्छता कर्मचाºयांचाही या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSangliसांगली