शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानाला लोकचळवळ बनविले -निशिकांत भोसले-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:50 IST

इस्लामपूर शहराला १५ कोटीचा निधी - केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानांतर्गत इस्लामपूर नगरपालिकेने केलेली कामगिरी प्रेरक आहे. -चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

ठळक मुद्देस्वच्छतेचे काम करणाºया स्वच्छता कर्मचाºयांचाही या यशामध्ये मोलाचा वाटा आहे.

युनूस शेख ।केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानांतर्गत इस्लामपूर नगरपालिकेने २०१८ मध्ये पश्चिम भारतातील महाराष्टÑ, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश अशा पाच राज्यांतून ९ वा क्रमांक पटकाविला, तर २०१९ मध्ये ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात प्रथक क्रमांक पटकावण्याची देदिप्यमान कामगिरी केली. या अभियानातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे शहराला १५ कोटी रूपयांचा निधी मिळणार असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

प्रश्न : स्वच्छता अभियानात इस्लामपूर पालिकेने मिळविलेल्या यशाचे श्रेय कुणाला द्याल?उत्तर : स्वच्छतेच्या अभियानाला लोकचळवळ बनवून घरा-घरात आणि प्रत्येकाच्या मना-मनात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात यशस्वी ठरल्यानेच, पश्चिम भारतातील पाच राज्यांतून अव्वल दर्जाची कामगिरी करण्याचा बहुमान इस्लामपूर शहराला मिळाला. शहरवासीयांसह समाजातील प्रत्येक घटकाची साथ आणि प्रत्यक्ष स्वच्छतेसाठी राबलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अतुलनीय योगदान, हे या यशामागील खरे सूत्रधार आहेत.

प्रश्न : स्वच्छता अभियानात यशस्वी होण्यासाठी काय योजना केल्या?उत्तर : या अभियानाच्या माध्यमातून ‘कचराकुंडीमुक्त शहर’ म्हणून नावारूपाला आणता आले. १५ हजारहून अधिक घरांमध्ये डस्टबिनचे वाटप केले. दैनंदिन आठ टन इतका ओला कचरा संकलित होऊ लागला. त्यावर प्रक्रिया करीत कंपोस्ट खत निर्मिती केली. त्याला शासनाने ‘हरित ब्रॅन्ड’ या नावाने मान्यता दिली. जिथे नागरिक उघड्यावर कचरा टाकायचे, तेथे विरंगुळ्यासाठी बैठक व्यवस्था केली. त्या परिसरात रांगोळी रेखाटली. या गांधीगिरीमुळे उघड्यावर पडणारा कचरा शेवटी कचरा संकलन करणाºया घंटागाड्यांमध्ये पडू लागला. तसेच जवळपास दीड हजार कुटुंबांनी कंपोस्ट खत निर्मिती करून अभियानाच्या यशामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.शहरवासीयांचा उत्स्फूर्त सहभागअभियानात १७ हजार शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने काढलेली ‘स्वच्छता रॅली’ शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारी ठरली. त्यानंतर वेळोवेळी सर्वच समाजघटकांसोबत चर्चा, बैठका घेत अभियानाची गती वाढविण्यात यश आले.कर्मचाऱ्यांची साथ मोलाचीस्वच्छतेसाठी शहराचे चार विभाग करून हे अभियान राबविले. व्यापारी पेठेत दिवसातून दोनवेळा स्वच्छता केली. नगरपालिकेने मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी प्रशासन प्रमुख या नात्याने सर्व घटकांना सोबत घेत प्रत्येक उपक्रम चांगल्या पध्दतीने राबविला. या अभियानात पालिकेतील सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तर सहभागी झालेच, मात्र प्रत्यक्ष स्वच्छतेचे काम करणाºया स्वच्छता कर्मचाºयांचाही या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSangliसांगली