शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

फळमार्केटमध्ये स्वच्छतेचा बोजवारा

By admin | Updated: November 18, 2015 00:14 IST

सांगलीत सुविधांचा अभाव : बाहेरून ‘झकास’ आणि आतून मात्र ‘भकास’

सांगली : वर्षाला पाच कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मार्केटच्या परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य व त्याची विल्हेवाट न लावल्याने बकालपणा आला आहे. बाहेरून ‘झकास’ दिसणारे मार्केट आतमधून ‘भकास’ झाल्याने व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर रस्त्यावर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विष्णुअण्णा पाटील फळ मार्केट आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक बाजारपेठेत फळांची आवक-जावक होण्यासाठी या फळ मार्केटला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नेहमीच व्यापाऱ्यांसह शेतकरी व वाहनांची मोठी गर्दी मार्केटमध्ये दिसून येते. व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये फळांची खरेदी-विक्री व्यवहार होत असतात, तर दक्षिणेकडील शेडमध्ये कांद्यासह इतर फळांची आवक होते. या शेड परिसरात व्यापाऱ्यांनी स्वत: काही प्रमाणात स्वच्छता ठेवली असली तरी फळांची आवरणे आणि पाल्यामुळे बाहेर अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे मधोमध असलेला कचरा जाळण्यात येत असला तरी परिसरात असणारी व्यापाऱ्यांची दुकाने लक्षात घेता, त्या कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावण्याची मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे. मार्केटच्या पूर्वेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व कचऱ्यातून खताची निर्मिती करण्याच्या हेतूने पत्र्याच्या शेडमध्ये गांडूळ खताचे दोन प्लांट तयार करण्यात आले असले तरी ते बंद अवस्थेत आहेत. त्या शेजारीच मार्केटमधील कुजलेली खराब फळे व त्याची आवरण व फळांच्या पेटीमध्ये वापरण्यात येणाऱ्या गवताचा ढीग लागला आहे. कुजलेली फळे तेथेच टाकून देण्यात आल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. पाऊस झाल्यानंतर याचा त्रास होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यासह कर्नाटकातील अनेक व्यापारी आणि शेतकऱ्यांचा फळमार्केटमध्ये राबता असताना, त्यांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह नसल्याने अडचण निर्माण होत आहे. स्वच्छतागृह नसल्यानेही परिसरातील घाणीत व दुर्गंधीत वाढच होत आहे. बाजार समितीला दरवर्षी कोटींचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळमार्केटमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी) गांडूळ खताचा प्रकल्प धूळ खात...फळमार्केटमध्ये पूर्वेला कचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती करण्याचा छोटा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. मात्र, देखभालीअभावी तो बंद आहे. मार्केटमध्ये निर्माण होणारा कचरा व टाकाऊ फळांची संख्या लक्षात घेता बाजार समितीच्या प्रशासनाने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे आवश्यक आहे.