शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

फळमार्केटमध्ये स्वच्छतेचा बोजवारा

By admin | Updated: November 18, 2015 00:14 IST

सांगलीत सुविधांचा अभाव : बाहेरून ‘झकास’ आणि आतून मात्र ‘भकास’

सांगली : वर्षाला पाच कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मार्केटच्या परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य व त्याची विल्हेवाट न लावल्याने बकालपणा आला आहे. बाहेरून ‘झकास’ दिसणारे मार्केट आतमधून ‘भकास’ झाल्याने व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर रस्त्यावर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विष्णुअण्णा पाटील फळ मार्केट आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक बाजारपेठेत फळांची आवक-जावक होण्यासाठी या फळ मार्केटला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नेहमीच व्यापाऱ्यांसह शेतकरी व वाहनांची मोठी गर्दी मार्केटमध्ये दिसून येते. व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या शेडमध्ये फळांची खरेदी-विक्री व्यवहार होत असतात, तर दक्षिणेकडील शेडमध्ये कांद्यासह इतर फळांची आवक होते. या शेड परिसरात व्यापाऱ्यांनी स्वत: काही प्रमाणात स्वच्छता ठेवली असली तरी फळांची आवरणे आणि पाल्यामुळे बाहेर अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे मधोमध असलेला कचरा जाळण्यात येत असला तरी परिसरात असणारी व्यापाऱ्यांची दुकाने लक्षात घेता, त्या कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावण्याची मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे. मार्केटच्या पूर्वेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व कचऱ्यातून खताची निर्मिती करण्याच्या हेतूने पत्र्याच्या शेडमध्ये गांडूळ खताचे दोन प्लांट तयार करण्यात आले असले तरी ते बंद अवस्थेत आहेत. त्या शेजारीच मार्केटमधील कुजलेली खराब फळे व त्याची आवरण व फळांच्या पेटीमध्ये वापरण्यात येणाऱ्या गवताचा ढीग लागला आहे. कुजलेली फळे तेथेच टाकून देण्यात आल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. पाऊस झाल्यानंतर याचा त्रास होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यासह कर्नाटकातील अनेक व्यापारी आणि शेतकऱ्यांचा फळमार्केटमध्ये राबता असताना, त्यांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह नसल्याने अडचण निर्माण होत आहे. स्वच्छतागृह नसल्यानेही परिसरातील घाणीत व दुर्गंधीत वाढच होत आहे. बाजार समितीला दरवर्षी कोटींचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळमार्केटमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी) गांडूळ खताचा प्रकल्प धूळ खात...फळमार्केटमध्ये पूर्वेला कचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती करण्याचा छोटा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. मात्र, देखभालीअभावी तो बंद आहे. मार्केटमध्ये निर्माण होणारा कचरा व टाकाऊ फळांची संख्या लक्षात घेता बाजार समितीच्या प्रशासनाने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे आवश्यक आहे.