शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

स्वच्छता ठेक्यात गुंतले पदाधिकाऱ्यांचेच हात ! तासगाव नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:43 IST

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहराच्या स्वच्छतेचा ठेका कायम ठेवण्यात पदाधिकाºयांचे हात गुंतले असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजप च्या पक्षीय बैठकीत नगरसेवक जाफर मुजावर यांनीच असा आरोप केल्याने या चर्चेला उधाण आले आहे.गुरुवारी झालेल्या सभेत भाजप आणि राष्टवादी कडून या ठेक्याच्या विषयाला बगल देत, ठेका कायम ठेवण्यासाठी ...

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव शहराच्या स्वच्छतेचा ठेका कायम ठेवण्यात पदाधिकाºयांचे हात गुंतले असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजपच्या पक्षीय बैठकीत नगरसेवक जाफर मुजावर यांनीच असा आरोप केल्याने या चर्चेला उधाण आले आहे.

गुरुवारी झालेल्या सभेत भाजप आणि राष्टवादीकडून या ठेक्याच्या विषयाला बगल देत, ठेका कायम ठेवण्यासाठी एकमत केल्याचे चित्रही पाहायला मिळाले असून ठेक्याला मिळालेल्या अभयाचे गौडबंगाल काय? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तासगाव नगरपालिकेने कोट्यवधी रुपयांचा स्वच्छतेचा ठेका शहरातीलच राष्टÑवादीच्या पदाधिकाºयाला दिला. हा ठेका देताना बहुतांश नियमांची पायमल्ली करण्यात आली. इतके करूनदेखील शहरात स्वच्छतेचा बोजवारा कायम आहे. काही महिन्यांपासून भाजप आणि राष्टÑवादीच्या बहुतांश नगरसेवकांनी या ठेक्याविरोधात आवाज उठवला. त्यावेळी नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांनी स्वच्छ भारत अभियान संपल्यानंतर होणाºया सभेत हा विषय अजेंड्यावर घेण्याचे आश्वासन देऊन विषय लांबणीवर टाकला होता.

नगराध्यक्षांच्या आश्वासनानुसार गुरुवारच्या सभेत हा विषय अजेंड्यावर येईल, अशी अपेक्षा होती. मात्र हा विषय अजेंड्यावर नसल्याने भाजपच्याच काही नगरसेवकांनी मोठा रोष व्यक्त केला होता. ठेका रद्द करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्याची मागणी करूनदेखील विषय ऐरणीवर येत नसल्याने नगरसेवक जाफर मुजावर यांनी पक्षीय बैठकीत, यामागे ठेकेदाराशी लागेबांधे आहेत काय? असा गंभीर आरोप केला होता.

गुरुवारी झालेल्या सभेत स्वच्छता आणि ठेका या विषयावर पदाधिकाऱ्यांसह कोणत्याच नगरसेवकाने चर्चा केली नाही. त्यामुळे ठेक्याला मिळणारे अभय आणि ठेकेदाराची पाठराखण चांगलीच चर्चेत आली आहे.ठेकेदार हा राष्टवादीचा पदाधिकारी असल्याने राष्टवादीकडून होणारी पाठराखण राजकीय असू शकते. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून ठेकेदाराची पाठराखण का केली जात आहे? हा प्रश्न कायम असून, पदाधिकाऱ्यांच्या सोयीमुळे शहरातील नागरिकांना मात्र स्वच्छतेबाबत गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.जॅकवेलचाही ठेकापाणी पुरवठ्याचे जॅकवेल ठेका पध्दतीने चालविण्यास देण्याचा ठरावही सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. राष्टÑवादीने या ठरावाला विरोध केला. त्यानंतर ठराव मताला टाकून बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर झाला. यावेळी घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाकडून मंजूर झालेला ३ कोटी ५४ लाखांचा निधी खर्च करण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान